शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पहूर पेठ ग्रामपंचायत वसुंधरा अभियानात राज्यस्तरावर उत्तेजनार्थ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

राज्य शासनाने २०२०-२१या वर्षात माझी वसुंधरा अभिमान स्पर्धा राबविली. यात राज्यातील २९१ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. दहा हजार लोकसंख्यावरील गावे ...

राज्य शासनाने २०२०-२१या वर्षात माझी वसुंधरा अभिमान स्पर्धा राबविली. यात राज्यातील २९१ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. दहा हजार लोकसंख्यावरील गावे यात सहभागी झाले . पर्यावरण दिनाच्या निमित्ताने स्पर्धेचा निकाल मुंबई येथील मंत्रालयातून ऑनलाइन जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संजय बनसोडे, विभागाच्या प्रधान मनीषा म्हैसकर यांची ऑनलाइन उपस्थिती होती.

निसर्गाशी संबंधित अग्नी, वायू, जल, भूमी व आकाश या पंच तत्त्वावर आधारित उल्लेखनीय कामगिरी पेठ ग्रामपंचायतीने आठ महिन्यांत केली. यासाठी सरपंच नीता पाटील, उपसरपंच श्यामराव सावळे, माजी जि. प. सभापती व विद्यमान ज्येष्ठ सदस्य प्रदीप लोढा, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, जीवन पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. आर. लोखंडे, गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, ग्रामविकास अधिकारी डी. पी. टेमकर यांचे मार्गदर्शन लाभले.

जामनेर पालिका नाशिक विभागात पहिली

जामनेर : माझी वसुंधरा अभियान २०२०-२१ अंतर्गत घेण्यात आलेल्या नगर परिषद गटात जामनेर पालिकेस तृतीय क्रमांक व नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळाला. शनिवारी झालेल्या ऑनलाइन पुरस्कार वितरण सोहळ्यात नगराध्यक्ष साधना महाजन, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे सहभागी झाले होते. सुरज पाटील, अनुजा जैस्वाल, दत्तू जोहरे, संदीप काळे उपस्थित होते.