शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी उत्पन्न आले निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST

जळगाव आगार : दिवसभरात झाल्या फक्त १०० फेऱ्या जळगाव : कोरोनामुळे आधीच एस. टी. महामंडळाचे उत्पन्न आधीच निम्म्यावर आले ...

जळगाव आगार : दिवसभरात झाल्या फक्त १०० फेऱ्या

जळगाव : कोरोनामुळे आधीच एस. टी. महामंडळाचे उत्पन्न आधीच निम्म्यावर आले असताना, शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सध्या कोरोना काळातील सरासरीच्या उत्पन्नापेक्षा निम्मेच उतपन्न आले असल्याची माहिती आगार प्रशासनातर्फे देण्यात आली. प्रवाशांची संख्या कमी असल्याने आगार प्रशासनातर्फे फक्त १०० फेऱ्या करण्यात आल्या.

गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू लागल्याने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आता तर शनिवारी व रविवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे याचा एस. टी. महामंडळाच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. बाजारपेठ बंद असल्याने परिणामी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी जळगाव आगारातर्फे महत्त्वाच्या उत्पन्न मिळणाऱ्या मार्गांवरच बसेस सोडण्यात आल्या. त्यात प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे दिवसभरात १०० ते १२५ फेऱ्या झाल्या. या सर्व फेऱ्यांचे उत्पन्न साडेतीन ते चार लाखांपर्यंत आले असल्याचा अंदाज आगार प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला. दरम्यान, दोन दिवसांच्या या लॉकडाऊनमुळे रविवारीही उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

इन्फो

-आगारातील एकूण बसेस १००

-पहिल्या दिवशी किती बसेस धावल्या ५०

- फेऱ्या किती १००

- साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले

इन्फो :

पहिल्याच दिवशी दोन लाखांचा तोटा

सध्या कोरोना काळात जळगाव आगार प्रशासनाला ६ ते ७ लाखांचे उत्पन्न येत आहे. कोरोनापूर्वी १० ते १२ लाखांच्या घरात उत्पन्न येत होते. दरम्यान, शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी फक्त साडेतीन ते चार लाखांच्या घरात उत्पन्न आले. त्यामुळे २ लाखांचा फटका महामंडळ प्रशासनाला बसला. तर रविवारीही जर एवढेच उत्पन्न आले तर महामंडळ प्रशासनाला चार लाखांचा फटका बसणार आहे.

इन्फो :

कोरोनामुळे ५० टक्के कर्मचारी कामावर

सध्या कोरोना मुळे बसफेऱ्या कमी असल्याने महामंडळ प्रशासनातर्फे चालक व वाहक कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती केली आहे. चालक व वाहक हे अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे त्यांना कर्तव्यावर नेहमी हजर राहणे क्रमप्राप्त आहे. मात्र, कोरोनामुळे फेऱ्या कमी होत असल्याने आगार प्रशासनातर्फे या चालक -वाचकांनाही ५० टक्के कामावर बोलविण्यात येत आहे.

इन्फो :

सध्या कोरोनामुळे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून, दोन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे तर उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. मात्र, ज्या मार्गावर प्रवासी मिळतील, त्या मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी तत्काळ बसेस सोडत आहोत. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देता, येतील यावर नियोजन सुरू आहे.

दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी