शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी उत्पन्न आले निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST

जळगाव आगार : दिवसभरात झाल्या फक्त १०० फेऱ्या जळगाव : कोरोनामुळे आधीच एस. टी. महामंडळाचे उत्पन्न आधीच निम्म्यावर आले ...

जळगाव आगार : दिवसभरात झाल्या फक्त १०० फेऱ्या

जळगाव : कोरोनामुळे आधीच एस. टी. महामंडळाचे उत्पन्न आधीच निम्म्यावर आले असताना, शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सध्या कोरोना काळातील सरासरीच्या उत्पन्नापेक्षा निम्मेच उतपन्न आले असल्याची माहिती आगार प्रशासनातर्फे देण्यात आली. प्रवाशांची संख्या कमी असल्याने आगार प्रशासनातर्फे फक्त १०० फेऱ्या करण्यात आल्या.

गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू लागल्याने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आता तर शनिवारी व रविवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे याचा एस. टी. महामंडळाच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. बाजारपेठ बंद असल्याने परिणामी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी जळगाव आगारातर्फे महत्त्वाच्या उत्पन्न मिळणाऱ्या मार्गांवरच बसेस सोडण्यात आल्या. त्यात प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे दिवसभरात १०० ते १२५ फेऱ्या झाल्या. या सर्व फेऱ्यांचे उत्पन्न साडेतीन ते चार लाखांपर्यंत आले असल्याचा अंदाज आगार प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला. दरम्यान, दोन दिवसांच्या या लॉकडाऊनमुळे रविवारीही उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

इन्फो

-आगारातील एकूण बसेस १००

-पहिल्या दिवशी किती बसेस धावल्या ५०

- फेऱ्या किती १००

- साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले

इन्फो :

पहिल्याच दिवशी दोन लाखांचा तोटा

सध्या कोरोना काळात जळगाव आगार प्रशासनाला ६ ते ७ लाखांचे उत्पन्न येत आहे. कोरोनापूर्वी १० ते १२ लाखांच्या घरात उत्पन्न येत होते. दरम्यान, शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी फक्त साडेतीन ते चार लाखांच्या घरात उत्पन्न आले. त्यामुळे २ लाखांचा फटका महामंडळ प्रशासनाला बसला. तर रविवारीही जर एवढेच उत्पन्न आले तर महामंडळ प्रशासनाला चार लाखांचा फटका बसणार आहे.

इन्फो :

कोरोनामुळे ५० टक्के कर्मचारी कामावर

सध्या कोरोना मुळे बसफेऱ्या कमी असल्याने महामंडळ प्रशासनातर्फे चालक व वाहक कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती केली आहे. चालक व वाहक हे अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे त्यांना कर्तव्यावर नेहमी हजर राहणे क्रमप्राप्त आहे. मात्र, कोरोनामुळे फेऱ्या कमी होत असल्याने आगार प्रशासनातर्फे या चालक -वाचकांनाही ५० टक्के कामावर बोलविण्यात येत आहे.

इन्फो :

सध्या कोरोनामुळे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून, दोन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे तर उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. मात्र, ज्या मार्गावर प्रवासी मिळतील, त्या मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी तत्काळ बसेस सोडत आहोत. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देता, येतील यावर नियोजन सुरू आहे.

दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी