शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी उत्पन्न आले निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST

जळगाव आगार : दिवसभरात झाल्या फक्त १०० फेऱ्या जळगाव : कोरोनामुळे आधीच एस. टी. महामंडळाचे उत्पन्न आधीच निम्म्यावर आले ...

जळगाव आगार : दिवसभरात झाल्या फक्त १०० फेऱ्या

जळगाव : कोरोनामुळे आधीच एस. टी. महामंडळाचे उत्पन्न आधीच निम्म्यावर आले असताना, शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सध्या कोरोना काळातील सरासरीच्या उत्पन्नापेक्षा निम्मेच उतपन्न आले असल्याची माहिती आगार प्रशासनातर्फे देण्यात आली. प्रवाशांची संख्या कमी असल्याने आगार प्रशासनातर्फे फक्त १०० फेऱ्या करण्यात आल्या.

गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू लागल्याने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आता तर शनिवारी व रविवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे याचा एस. टी. महामंडळाच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. बाजारपेठ बंद असल्याने परिणामी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी जळगाव आगारातर्फे महत्त्वाच्या उत्पन्न मिळणाऱ्या मार्गांवरच बसेस सोडण्यात आल्या. त्यात प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे दिवसभरात १०० ते १२५ फेऱ्या झाल्या. या सर्व फेऱ्यांचे उत्पन्न साडेतीन ते चार लाखांपर्यंत आले असल्याचा अंदाज आगार प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला. दरम्यान, दोन दिवसांच्या या लॉकडाऊनमुळे रविवारीही उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

इन्फो

-आगारातील एकूण बसेस १००

-पहिल्या दिवशी किती बसेस धावल्या ५०

- फेऱ्या किती १००

- साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले

इन्फो :

पहिल्याच दिवशी दोन लाखांचा तोटा

सध्या कोरोना काळात जळगाव आगार प्रशासनाला ६ ते ७ लाखांचे उत्पन्न येत आहे. कोरोनापूर्वी १० ते १२ लाखांच्या घरात उत्पन्न येत होते. दरम्यान, शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी फक्त साडेतीन ते चार लाखांच्या घरात उत्पन्न आले. त्यामुळे २ लाखांचा फटका महामंडळ प्रशासनाला बसला. तर रविवारीही जर एवढेच उत्पन्न आले तर महामंडळ प्रशासनाला चार लाखांचा फटका बसणार आहे.

इन्फो :

कोरोनामुळे ५० टक्के कर्मचारी कामावर

सध्या कोरोना मुळे बसफेऱ्या कमी असल्याने महामंडळ प्रशासनातर्फे चालक व वाहक कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती केली आहे. चालक व वाहक हे अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे त्यांना कर्तव्यावर नेहमी हजर राहणे क्रमप्राप्त आहे. मात्र, कोरोनामुळे फेऱ्या कमी होत असल्याने आगार प्रशासनातर्फे या चालक -वाचकांनाही ५० टक्के कामावर बोलविण्यात येत आहे.

इन्फो :

सध्या कोरोनामुळे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून, दोन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे तर उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. मात्र, ज्या मार्गावर प्रवासी मिळतील, त्या मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी तत्काळ बसेस सोडत आहोत. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देता, येतील यावर नियोजन सुरू आहे.

दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी