शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पहिल्याच दिवशी २५० जणांवर पोलिसांचा कायद्याचा दंडूका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:43 IST

जळगाव : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीला मास्क सक्तीचा केला आहे, इतकेच काय तर लग्न समारंभ ...

जळगाव : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीला मास्क सक्तीचा केला आहे, इतकेच काय तर लग्न समारंभ व अंत्यविधीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी गुरुवारपासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी जिल्हाभरात सायंकाळी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा दंडूका उगारला. २५० जणांकडून १ लाख १५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.

पोलीस दलाकडून दुपारपासूनच चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस वाहनातून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले जात होते. शहरात टॉवर चौकात पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, बहिणाबाई उद्यानाजवळ जिल्हा पेठचे निरीक्षक विलास शेंडे, खोटे नगरात महामार्गावर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक रविकांत सोनवणे व अजिंठा चौकात एमआयडीसीचे प्रताप शिकारे आदी अधिकारी स्वत: रस्त्यावर उतरले होते तर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा हे देखील पांडे चौकात स्वत: थांबून नागरिकांवर कारवाई करीत होते. चाळीसगाव परिमंडळात फक्त चारच जणांवर कारवाई झाली. जळगाव शहरात सर्वाधिक २०५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकट्या टॉवर चौकात १३५ जणांवर कारवाई झाली. काही ठिकाणी ५०० तर काही ठिकाणी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे यापुढेही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहिती चंद्रकांत गवळी यांनी दिली.

अशी आहे पोलीस स्टेशननिहाय कारवाई

जळगाव शहर : १३५

जिल्हा पेठ : २५

एमआयडीसी :२५

जळगाव तालुका : २०

रावेर : ४

यावल : १५

मुक्ताईनगर :१५

बोदवड :०५

वरणगाव : ०२

सावदा : ०४