शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात आधी सुप्रीम कॉलनीवासियांना मिळणार ‘अमृत’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:18 IST

वाघुर जलवाहिनीला अमृतच्या मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम आजपासून : पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलला लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

वाघुर जलवाहिनीला अमृतच्या मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम आजपासून : पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव :गेल्या तीन वर्षांपासून शहरात अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. गुरुवारपासून अमृतची जलवाहिनी वाघुरच्या मुख्य वहिनीला जोडण्याचे काम सुरु होणार असून, अमृत अंतर्गत सर्वात आधी सुप्रीम कॉलनीवासीयांना ‘अमृत’चे पाणी मिळणार आहे. या कामांतर्गत सध्याच्या वाघूर जलवाहिनीला प्रिस्ट्स सिमेंट पाईप असून तो काढून त्याठिकाणी ५०० मिमीचा एमएस पाईप जोडला जाणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवावा लागणार असून, गुरुवारी होणारा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अमृतचे काम सुरु आहे. यामुळे रस्त्यांचा खोदकामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देखील सहन करावा लागला होता. मात्र, आता हे काम ८० टक्के पुर्ण झाले असून, पहिल्या टप्प्यात सुप्रिम कॉलनी वासीयांना अमृतचे पाणी मिळणार आहे. सुप्रीम कॉलनीवासीय अनेक वर्षांपासून पाण्याचा समस्येपासून ग्रस्त होते. आता आठवडाभरात या भागात अमृत अंतर्गत पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.

महापौरांनी केली पाहणी

सुप्रीम कॉलनीवासीयांना आजवर कधीही नियमित पाणीपुरवठा झालेला नसून अमृत योजनेंतर्गत परिसरासाठी नव्याने यंत्रणा बसविण्यात आली असून पाणी साठवण टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. सुप्रीम कॉलनीवासीयांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी महापौर भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे, भूषण जाधव, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, बाबा साळुंखे, योगेश बोरोले, शामकांत भांडारकर, मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

आज होणार नाही पाणी पुरवठा

अमृतची जलवाहिनी वाघूरच्या जलवाहिनीला जोडण्यासाठी एक व्हॉल्व्ह बसविण्यात आला असून वाघूरच्या मुख्य वाहिनीला जोडणी करण्यास गुरुवारी सुरुवात होणार आहे. वाघूरच्या जलवाहिनीला ५०० मिमी व्यासाची लाईन जोडली जाणार असल्याने सुप्रिम कॉलनीतील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. दरम्यान, या कामाळे एक दिवस पाणी पुरवठा थांबविण्यात आला असला तरी शुक्रवारपासून शहरात रोटेशननुसार सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे.