शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

सर्वात आधी सुप्रीम कॉलनीवासियांना मिळणार ‘अमृत’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:18 IST

वाघुर जलवाहिनीला अमृतच्या मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम आजपासून : पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलला लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

वाघुर जलवाहिनीला अमृतच्या मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम आजपासून : पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव :गेल्या तीन वर्षांपासून शहरात अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. गुरुवारपासून अमृतची जलवाहिनी वाघुरच्या मुख्य वहिनीला जोडण्याचे काम सुरु होणार असून, अमृत अंतर्गत सर्वात आधी सुप्रीम कॉलनीवासीयांना ‘अमृत’चे पाणी मिळणार आहे. या कामांतर्गत सध्याच्या वाघूर जलवाहिनीला प्रिस्ट्स सिमेंट पाईप असून तो काढून त्याठिकाणी ५०० मिमीचा एमएस पाईप जोडला जाणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवावा लागणार असून, गुरुवारी होणारा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अमृतचे काम सुरु आहे. यामुळे रस्त्यांचा खोदकामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देखील सहन करावा लागला होता. मात्र, आता हे काम ८० टक्के पुर्ण झाले असून, पहिल्या टप्प्यात सुप्रिम कॉलनी वासीयांना अमृतचे पाणी मिळणार आहे. सुप्रीम कॉलनीवासीय अनेक वर्षांपासून पाण्याचा समस्येपासून ग्रस्त होते. आता आठवडाभरात या भागात अमृत अंतर्गत पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.

महापौरांनी केली पाहणी

सुप्रीम कॉलनीवासीयांना आजवर कधीही नियमित पाणीपुरवठा झालेला नसून अमृत योजनेंतर्गत परिसरासाठी नव्याने यंत्रणा बसविण्यात आली असून पाणी साठवण टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. सुप्रीम कॉलनीवासीयांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी महापौर भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे, भूषण जाधव, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, बाबा साळुंखे, योगेश बोरोले, शामकांत भांडारकर, मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

आज होणार नाही पाणी पुरवठा

अमृतची जलवाहिनी वाघूरच्या जलवाहिनीला जोडण्यासाठी एक व्हॉल्व्ह बसविण्यात आला असून वाघूरच्या मुख्य वाहिनीला जोडणी करण्यास गुरुवारी सुरुवात होणार आहे. वाघूरच्या जलवाहिनीला ५०० मिमी व्यासाची लाईन जोडली जाणार असल्याने सुप्रिम कॉलनीतील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. दरम्यान, या कामाळे एक दिवस पाणी पुरवठा थांबविण्यात आला असला तरी शुक्रवारपासून शहरात रोटेशननुसार सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे.