शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

आगीत घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 11:26 IST

 लग्नासाठीची २० हजाराची रोकडही जळाली

ठळक मुद्देवाळू बंदीने रोजगारही झाला बंद

जळगाव : झोपडीला शॉर्टसकींटमुळे आग लागून संसार जळून खाक झाला, छतही उडाले, वाळू बंदीने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आणि दुसरीकडे घरातील कमवती व्यक्ती कामासाठी पुण्याला गेलेली अशी विदारक स्थिती समता नगरातील रमजान अन्वय पिंजारी यांच्या कुटुंबावर शनिवारी सकाळी उद्भवली. मुलीच्या संसारासाठी गोळा केलेली २० ते २५ हजाराची रोकडही यात जळून खाक झाल्याचे या कुटुंबातील महिलांनी सांगितले.शहरातील समतानगर येथे रमजान अन्वर पिंजारी यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून त्यात मुलीच्या लग्नासाठी जमविलेल्या २० ते २५ हजार रुपयांसह नवे कपडे, टीव्ही यासह संसारोपयोगी वस्तू, अन्न-धान्याची काही क्षणातच राखरांगोळी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. नागरिकांच्या सतर्कतेने घरातील सिलेंडर हलविण्यात आल्याने दुर्घटना टळली.कुटुंबिय बाहेर असल्याने अनर्थ टळलासमतानगरातील वंजारी टेकडी येथे रमजान अन्वर पिंजारी हे आई, पत्नी, मुलांसह राहतात. गवंडी काम तसेच हातमजुरी करुन ते उदरनिर्वाह चालवितात. रमजान हे वाळू बंदीमुळे कामे नसल्याने पुण्याकडे कामाच्या शोधात गेले आहेत. तर त्यांची पत्नी परवीन हे वडीलांची प्रकृती खराब असल्याने त्यांना पहायसाठी गेली होती. समीर व अरबाज तसेच मोठी मुलगी मुस्कान हे सर्व शाळेत गेले होते. घरी त्यांची आई मोसमबाई पिंजारी या या एकट्या होत्या. घटना घडली त्यावेळी त्या बाहेर गेल्या होत्या. याच दरम्यान घरातील वायरींगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली.एकच पळापळशॉर्ट सर्क्रिटमुळे पार्टीशनच्या या घरात आग लागली व हा हा म्हणता, आगीने संपूर्ण घराला घेरले. पिंजारी यांच्या घराशेजारील रामकृष्ण माळी यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ गल्लीतील सुभाष राठोड, राहूल राठोड, दयाराम तंवर, विकी कलाल यांच्यासह बजरंग दल, बंजारा टायगर्सच्या पदाधिकारी तसेच नशीर पठाण, इमाम पठाण, पंडीज जाधव, नासिर पठाण, अख्तर शेख, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घरात धुर दाटला असल्याने छतावरील पत्रे बाजूला करुन घरात उडी घेत दरवाजा उघडला. प्रथम घरातील सिलेंडर इतरत्र हलविण्यात आले. यानंतर आगीवर पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात आली.पैशांची राखरांगोळीरजमान यांची मोठी मुलगी मुस्कान हिच्या लग्नासाठी पिंजारी कुटुंबिय स्थळ शोधत आहेत. यासाठी ते काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील एका मुलाला पाहून आले होते. तसेच त्यांनाही जळगावाला येण्याचे निमंत्रण देवून आले होते. दोन ते तीन दिवसात ते मुलीला तसेच घर पहायला येणारच होते. त्यापूर्वीच दुर्घटना घडली. यात भिशीचे २० ते २५ हजार रुपये मुस्कानच्या लग्नासाठी त्यांनी राखून ठेवले होते. ते घरातील एका लाकडी कपाटात ठेवले होते. तेही आगीत जळून खाक झाले. आधीच हलाखीची परिस्थिती व त्यातच जमविलेले पैशांची राखरांगोळी झाल्याने मुलीचे लग्न कसे करणार असा प्रश्न पिंजारी कुटुंबियांना पडला आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल अडकमोल यांनीही घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांना धीर दिला.खिन्न होऊन बसले घराबाहेर... पिंजारी कुटुंबातील महिला, लहान मुले आगीत भस्मसात झालेल्या घराकडे डबडबलेल्या डोळ्यांनी पहात बसले होते. तर वृद्धा मोसमबाई पिंजारी या रडत रडत सांगत होत्या. रोजी-रोटी बंद झाली, डोक्यावचे छतही गेले आता जगायचे कसे? असा प्रश्न त्या करत होत्या. शेजारील महिला त्यांची समजूत घालत होत्या.

टॅग्स :fireआग