शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

आगीत घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 11:26 IST

 लग्नासाठीची २० हजाराची रोकडही जळाली

ठळक मुद्देवाळू बंदीने रोजगारही झाला बंद

जळगाव : झोपडीला शॉर्टसकींटमुळे आग लागून संसार जळून खाक झाला, छतही उडाले, वाळू बंदीने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आणि दुसरीकडे घरातील कमवती व्यक्ती कामासाठी पुण्याला गेलेली अशी विदारक स्थिती समता नगरातील रमजान अन्वय पिंजारी यांच्या कुटुंबावर शनिवारी सकाळी उद्भवली. मुलीच्या संसारासाठी गोळा केलेली २० ते २५ हजाराची रोकडही यात जळून खाक झाल्याचे या कुटुंबातील महिलांनी सांगितले.शहरातील समतानगर येथे रमजान अन्वर पिंजारी यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून त्यात मुलीच्या लग्नासाठी जमविलेल्या २० ते २५ हजार रुपयांसह नवे कपडे, टीव्ही यासह संसारोपयोगी वस्तू, अन्न-धान्याची काही क्षणातच राखरांगोळी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. नागरिकांच्या सतर्कतेने घरातील सिलेंडर हलविण्यात आल्याने दुर्घटना टळली.कुटुंबिय बाहेर असल्याने अनर्थ टळलासमतानगरातील वंजारी टेकडी येथे रमजान अन्वर पिंजारी हे आई, पत्नी, मुलांसह राहतात. गवंडी काम तसेच हातमजुरी करुन ते उदरनिर्वाह चालवितात. रमजान हे वाळू बंदीमुळे कामे नसल्याने पुण्याकडे कामाच्या शोधात गेले आहेत. तर त्यांची पत्नी परवीन हे वडीलांची प्रकृती खराब असल्याने त्यांना पहायसाठी गेली होती. समीर व अरबाज तसेच मोठी मुलगी मुस्कान हे सर्व शाळेत गेले होते. घरी त्यांची आई मोसमबाई पिंजारी या या एकट्या होत्या. घटना घडली त्यावेळी त्या बाहेर गेल्या होत्या. याच दरम्यान घरातील वायरींगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली.एकच पळापळशॉर्ट सर्क्रिटमुळे पार्टीशनच्या या घरात आग लागली व हा हा म्हणता, आगीने संपूर्ण घराला घेरले. पिंजारी यांच्या घराशेजारील रामकृष्ण माळी यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ गल्लीतील सुभाष राठोड, राहूल राठोड, दयाराम तंवर, विकी कलाल यांच्यासह बजरंग दल, बंजारा टायगर्सच्या पदाधिकारी तसेच नशीर पठाण, इमाम पठाण, पंडीज जाधव, नासिर पठाण, अख्तर शेख, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घरात धुर दाटला असल्याने छतावरील पत्रे बाजूला करुन घरात उडी घेत दरवाजा उघडला. प्रथम घरातील सिलेंडर इतरत्र हलविण्यात आले. यानंतर आगीवर पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात आली.पैशांची राखरांगोळीरजमान यांची मोठी मुलगी मुस्कान हिच्या लग्नासाठी पिंजारी कुटुंबिय स्थळ शोधत आहेत. यासाठी ते काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील एका मुलाला पाहून आले होते. तसेच त्यांनाही जळगावाला येण्याचे निमंत्रण देवून आले होते. दोन ते तीन दिवसात ते मुलीला तसेच घर पहायला येणारच होते. त्यापूर्वीच दुर्घटना घडली. यात भिशीचे २० ते २५ हजार रुपये मुस्कानच्या लग्नासाठी त्यांनी राखून ठेवले होते. ते घरातील एका लाकडी कपाटात ठेवले होते. तेही आगीत जळून खाक झाले. आधीच हलाखीची परिस्थिती व त्यातच जमविलेले पैशांची राखरांगोळी झाल्याने मुलीचे लग्न कसे करणार असा प्रश्न पिंजारी कुटुंबियांना पडला आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल अडकमोल यांनीही घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांना धीर दिला.खिन्न होऊन बसले घराबाहेर... पिंजारी कुटुंबातील महिला, लहान मुले आगीत भस्मसात झालेल्या घराकडे डबडबलेल्या डोळ्यांनी पहात बसले होते. तर वृद्धा मोसमबाई पिंजारी या रडत रडत सांगत होत्या. रोजी-रोटी बंद झाली, डोक्यावचे छतही गेले आता जगायचे कसे? असा प्रश्न त्या करत होत्या. शेजारील महिला त्यांची समजूत घालत होत्या.

टॅग्स :fireआग