शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बंडातून वेगळी वाट शोधली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 11:30 IST

तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांच्याशी संवाद

चुडामण बोरसेआधी स्वत:विरुद्ध बंड, नंतर कुटुंबीय आणि नंतर समाजाविरुद्धही बंड केले या बंडातून आपण वेगळी वाट शोधली. लोकांना सजग करण्यासाठी आपण आता निघालो आहोत.. असे प्रतिपादन तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांनी व्यक्त केले.जळगावच्या भालेराव प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी आंबेडकरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिशा ह्या आज जळगावात आल्या होत्या. गंधे सभागृहात त्यांनी ‘ जयभीम’ म्हणत ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न: दिशा ते संघर्षशील कवयित्री दिशा शेख असा प्रवास कसा झाला.उत्तर: खरं तर ब्रेकअप नंतर वैयक्तीक आयुष्य हे आयुष्यच राहिले नाही, दु:खाची कारणे मीच स्वत: शोधत राहिली आणि मग मार्ग सापडत गेला. यातून बरेच काही शिकायला मिळाले. अजूनही शिकत आहे. ती एक न संपणारी प्रक्रिया आहे.. यातून मग कवयित्री दिशा शेख पुढे आली.. अशी अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणावे लागेल.प्रश्न: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुठल्या विचारांचा प्रभाव आपल्या जीवनावर झाला?उत्तर : बाबासाहेबांच्या ‘समता’ या एकाच शब्दाने बरेच काही शिकविले. या शब्दाने जीवन कळले. त्याची व्यापकता मोठी आहे. जगण्याचा द्दष्टीकोन बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. पारंपारिक वाट सोडा आणि परिवर्तन घडवा. असे बाबासाहेब म्हणायचे. त्याच परिवर्तनाच्या वाटेवर आपण निघालो आहोत.स्वत:विरुद्ध बंडाने आपण वेगळ्या वाटेची सुरुवात केली. यामागे बाबासाहेब होेते. त्यांनीच बंड करायला शिकविले. यामुळे कवितेच्या ओळी लिहू लागली. कवितेनेच जीवनाला दिशा दिली.भारतीय संविधान हे लिंगभेद मानणारे नाही. लिंगविरहित संविधानाने व्यक्ती हा केंद्रबिंदू मानला आहे. या संविधानाचा आदर आणि सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचत गेली व मला उत्तरे मिळू लागली -दिशा शेख.