शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बंडातून वेगळी वाट शोधली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 11:30 IST

तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांच्याशी संवाद

चुडामण बोरसेआधी स्वत:विरुद्ध बंड, नंतर कुटुंबीय आणि नंतर समाजाविरुद्धही बंड केले या बंडातून आपण वेगळी वाट शोधली. लोकांना सजग करण्यासाठी आपण आता निघालो आहोत.. असे प्रतिपादन तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांनी व्यक्त केले.जळगावच्या भालेराव प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी आंबेडकरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिशा ह्या आज जळगावात आल्या होत्या. गंधे सभागृहात त्यांनी ‘ जयभीम’ म्हणत ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न: दिशा ते संघर्षशील कवयित्री दिशा शेख असा प्रवास कसा झाला.उत्तर: खरं तर ब्रेकअप नंतर वैयक्तीक आयुष्य हे आयुष्यच राहिले नाही, दु:खाची कारणे मीच स्वत: शोधत राहिली आणि मग मार्ग सापडत गेला. यातून बरेच काही शिकायला मिळाले. अजूनही शिकत आहे. ती एक न संपणारी प्रक्रिया आहे.. यातून मग कवयित्री दिशा शेख पुढे आली.. अशी अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणावे लागेल.प्रश्न: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुठल्या विचारांचा प्रभाव आपल्या जीवनावर झाला?उत्तर : बाबासाहेबांच्या ‘समता’ या एकाच शब्दाने बरेच काही शिकविले. या शब्दाने जीवन कळले. त्याची व्यापकता मोठी आहे. जगण्याचा द्दष्टीकोन बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. पारंपारिक वाट सोडा आणि परिवर्तन घडवा. असे बाबासाहेब म्हणायचे. त्याच परिवर्तनाच्या वाटेवर आपण निघालो आहोत.स्वत:विरुद्ध बंडाने आपण वेगळ्या वाटेची सुरुवात केली. यामागे बाबासाहेब होेते. त्यांनीच बंड करायला शिकविले. यामुळे कवितेच्या ओळी लिहू लागली. कवितेनेच जीवनाला दिशा दिली.भारतीय संविधान हे लिंगभेद मानणारे नाही. लिंगविरहित संविधानाने व्यक्ती हा केंद्रबिंदू मानला आहे. या संविधानाचा आदर आणि सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचत गेली व मला उत्तरे मिळू लागली -दिशा शेख.