शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

लॉकडाऊनमध्ये पोस्ट बँकेकडून आर्थिक आधार; जिल्ह्यात सात कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:32 IST

जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने, या काळात काही दिवस शहरातील बँकादेखील बंद होत्या. तसेच शहरातील बहुतांश एटीएममधील ...

जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने, या काळात काही दिवस शहरातील बँकादेखील बंद होत्या. तसेच शहरातील बहुतांश एटीएममधील रक्कम संपल्याने एटीएम बंद होते. अशी सर्व आर्थिक आणीबाणीची परिस्थिती असताना, पोस्टाच्या पेमेंट बँकेने मात्र शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक आधार दिला. पोस्ट पेमेंट बँकेअंतर्गंत घरोघरी जाऊन पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी जळगाव विभागात सात कोटींचे वाटप केले.

बँकेप्रमाणे आता पोस्टातही सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँकांमध्ये गर्दीचे प्रमाण जास्त राहत असल्यामुळे नागरिकांनी पोस्टाला प्राधान्य देऊन, पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यामातून विविध व्यवहार करत आहेत. यंदा कोरोनाच्या महामारीत तर नागरिकांना या पोस्ट पेमेंट बँकेचा चांगलाच फायदा झाला. कोरोनामुळे सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था बंद असताना, पोस्टाच्या जळगाव विभागातील ३५० पोस्टमन बांधवांनी ‘आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम’च्या माध्यमातून ५० हजारपेक्षा जास्त व्यवहार केले. या माध्यमातून सुमारे सात करोडपेक्षा जास्त रक्कमेचे वाटप करण्यात आले असल्याचे पोस्ट विभागातर्फे सांगण्यात आले.

सात कोटी रुपयांचे पोस्ट बँकेकडून लॉकडाऊन काळात घरपोच वाटप

५० हजार नागरिकांना घरपोच वाटप

३५० पोस्टमननी बजावली सेवा

इन्फो :

तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी उघडले खाते :

राज्य शासनाकडून पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी पात्र अशा आठ हजार ९०० विद्यार्थ्यांची यादी जळगाव डाक विभागाला प्राप्त झालेली आहे. त्यानुसार जळगाव डाक विभागामार्फत तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचे खाते उघडण्यात आले असल्याचेही पोस्टातर्फे सांगण्यात आले, तर अजूनही खाते उघडण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांकडून सुरू आहे.

इन्फो :

५०० पेक्षा जास्त सेवानिवृत्त नागरिकांनी भरले हयातीचे प्रमाणपत्र :

पोस्ट पेमेंट बँकेमार्फत १ डिसेंबरपासून यूपीआयची सुविधा सुरू करण्यात आली असून, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना कोरोना कालावधीत बाहेर जावे लागू नये म्हणून १ नोव्हेंबरपासून ‘हयातीचे जीवन प्रमाणपत्र’ जनरेट करण्याचीही सुविधा पोस्ट पेमेंट बँकेमार्फत सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त सेवानिवृत्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.