शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

अखेर नशिराबाद ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST

नशिराबाद : येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बी.एस.पाटील यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अर्जाचा माफीनामा सादर केला. गावातील नागरिकांनी ...

नशिराबाद : येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बी.एस.पाटील यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अर्जाचा माफीनामा सादर केला. गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांबाबत षड्‌यंत्र रचून त्यांच्या विरोधात निवेदन सादर करून घेतले, असा धक्कादायक खुलासा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या माफीनाम्यात केला आहे.

ग्रामपंचायतमधील अस्थायी कर्मचारी पूनम मर्दाने, राकेश मर्दाने, विजय जाधव हे तिघे जण काम करीत होते. दिवाळीदरम्यान ग्रामविकास अधिकाऱ्यांना पगाराची मागणी केली. पगार बँकेच्या खात्यात जमा होईल, असे त्यांनी सांगितले होते; मात्र ग्रामपंचायत कार्यालयात वाद घालून पगाराची मागणी करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता.

याविषयी आता कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी अस्थायी कर्मचारी असल्याने आम्हा तिघांना काही दिवस कामावरून काढण्याचा निर्णय घेतला होता. याचा राग मनात ठेवून द्वेष बुद्धीने गावातील दोन-तीन नागरिकांच्या म्हणण्यावरून गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात जिल्हा परिषदेकडे निवेदने सादर केली व त्यांना निलंबित करून आम्हाला कामावर रुजू करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती. सर्व कृत्य आम्ही तिघांनी अनवधानाने व एक-दोन जणांच्या सांगण्यावरून व ग्रामपंचायतमध्ये सुरळीत चाललेल्या कामकाजाला अडथळा निर्माण होण्याच्या उद्देशाने केले व बी.एस.पाटील यांच्याविरोधात गावात सुरू असलेल्या षड्‌यंत्रास पुष्टी मिळण्यासाठी आम्हाला त्यांच्या विरोधात अर्ज देण्यास प्रवृत्त केले, असा धक्कादायक खुलासा निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद केला आहे. आम्ही केलेल्या खोट्या आरोपांबाबत माघार घेऊन त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार व द्वेष नसल्याचा खुलासा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यामुळे गावात सुरू असलेल्या राजकारणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकाराबद्दल गावात चर्चांना उधाण आले आहे.