शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मालकांसह सात गणेश मंडळांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:37 IST

धार्मिक सण, उत्सवात वाद्यांच्या ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देऊनही त्याचे पालन न करता मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वाद्य वाजविणाºया जिल्ह्यातील सात मंडळाचे पदाधिकारी, आयोजक तसेच वाद्य मालक यांच्याविरुध्द वरणगाव, भडगाव, भुसावळ व जळगाव रामानंद नगर आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

ठळक मुद्देआवाजाची मर्यादा ओलांडलीनवरात्रोत्सवातही होणार कठारे कारवाईआरटीओकडून वाहनांची तपासणी

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ :जळगाव : धार्मिक सण, उत्सवात वाद्यांच्या ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देऊनही त्याचे पालन न करता मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वाद्य वाजविणाºया जिल्ह्यातील सात मंडळाचे पदाधिकारी, आयोजक तसेच वाद्य मालक यांच्याविरुध्द वरणगाव, भडगाव, भुसावळ व जळगाव रामानंद नगर आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

यांच्यावर दाखल झाले गुन्हेभुसावळ शहरातील लोकमान्य मंडळातील मोर्या डी.जे.चे मालक, भडगाव येथील प्रभात गणेश मंडळाचे पदाधिकारी व डी.के.डी.जे.चे प्रो.आॅडीओ धुळेचे मालक, भडगाव येथील अंकुश गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पारोळा येथील सवर डी.जे.चे मालक, भडगाव येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळाचे पदाधिकारी आणि डी.जे ७ धुळे येथीलमालक, आझाद मित्र मंडळ भडगावचे अध्यक्ष आणि धुळे येथील गणराया डी.जे.चे मालक, वरणगाव, ता.भुसावळ येथील मजदूर गणेश मंडळ भवानी नगरचे अध्यक्ष आणि बॅँजो सिस्टीम्सचे मालक व जळगाव शहरातील एल.के.फांउडेशन आयोजित दहिहंडी उत्सव आयोजक व राऊंड सिस्टीम्स आॅपरेट यांचा समावेश आहे.

आरटीओकडून वाहनांची तपासणीपोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने कलम १८८,२८३, २९०,२९१, भादवि कलम २२ (एन), १३१, १३६,१४० महाराष्टÑ पोलीस कायदा कलम ३ (१), ४ (१), ५ (१) ध्वनी प्रदूषण नियम २००० आणि कलम १५,१९ पर्यावरण संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत. तर यात वाद्याची वाहने जप्त करुन आरटीओमार्फत त्यांची तपासणी करण्यात आली आहे. नियमबाह्य वाहनावर दंड आकारण्यासह ६० दिवसासाठी वाहनाचा परवाना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.

नवरात्रीत आवाजाची मर्यादा मोजणारगणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, मिरवणूक तसेच मोहरममध्ये वाजविण्यात येणाºया  वाद्यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्याबाबत जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक व प्रभारी अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे मंडळांनी पर्यावरण संरक्षणासाठी मदत करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले आहे.