शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

बीएचआर प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:16 IST

जळगाव : येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील कथित अपहाराच्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे आणखी एक गुन्हा दाखल झाला ...

जळगाव : येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील कथित अपहाराच्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अजय ललवाणी (रा. नाचणखेडा), अजय राठी, उदय कांकरिया, धरम सांखला, विवेक ठाकरे, प्रकाश वाणी आणि सुनील झंवर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहगाव, पुणे येथील रहिवासी संतोष काशिनाथ कांबळे (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार कांबळे यांचे वडील निवृत्त शिक्षक काशिनाथ भागवत कांबळे यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम २०१४ मध्ये कोरेगाव भीमा येथील बीएचआरच्या शाखेत गुंतवली होती. त्यात काशिनाथ कांबळे यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्याही नावावर काही रक्कम मुदतठेव म्हणून ठेवण्यात आली होती. याची मुदत संपल्यावर ही पतसंस्थेकडून १८ लाख ७ हजार १५९ रुपये येणे होते. मात्र २०१५ मध्ये दिवाळीनंतर शाखेत गेल्यावर संतोष कांबळे यांना शाखा बंद असल्याचे दिसले. ते शिक्रापूर येथील पतसंस्थेच्या शाखेत गेले असता ती शाखादेखील बंदच होती. त्यानंतर कांबळे हे १५ दिवसांनी जळगाव एमआयडीसीतील पतसंस्थेच्या मुख्य शाखेत आले. तेथे जितेंद्र कंडारे यांना भेटल्यावर पतसंस्थेवर आता कंडारे हे अवसायक असल्याचे समजले. त्यानंतर कंडारे यांनी तुम्हाला १५ - २० टक्केच रक्कम मिळू शकत असल्याची माहिती दिली. त्यानंतर ठेवी आणि पत्ता यांची माहिती घेतली. त्यात लोहगावला माणसे घरी येतील. त्यांना हव्या तेथे सह्या द्या, असे सांगितले. उरलेल्या रकमेची विचारणा केल्यावर कांबळे यांना माणसांकडून धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

जून २०१९ मध्ये कांबळे यांच्या घरी लोहगावला दोन माणसे आली. त्यांनी ३० टक्के रक्कम देण्याचे कबूल केले. मात्र ७० टक्के रक्कम मिळणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर शपथपत्राचे काही नमुने देऊन कंडारे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये कांबळे पुन्हा जळगावला आले. त्यांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात जाऊन चौकशी केली असता ठेवींच्या पावत्यांच्या खरेदी-विक्रीबाबत कळले, असेही कांबळे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, कांबळे यांच्या वडिलांचे निधन झाले. तसेच लॉकडाऊनच्या काळात त्यांची नोकरीदेखील गेली आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे.

पावत्यांची विक्री करा, नाहीतर पैसे विसरा

जितेंद्र कांबळे हे जळगावला नोव्हेंबर २०१७ मध्ये आले होते. त्या वेळी अवसायक कंडारे याला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वेळी त्यांना सांगण्यात आले की, पावत्या २० टक्के रक्कम घेऊन विका अन्यथा सगळेच पैसे विसरा. मला पूर्ण पैसे पाहिजे, असे सांगितल्यावर पतसंस्थेतील माणसांनी त्यांना हाताला धरून बाहेर काढले.

कांबळे यांना दमदाटी

कांबळे यांना पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात दमदाटी करण्यात आली होती. तसेच त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांना कायमच जितेंद्र कंडारे आणि त्याच्या माणसांकडून दमदाटी करण्यात येत होती. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत पोलिसात तक्रार दिली नव्हती.