शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

रस्त्यांचा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत सत्तांतर होऊन आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. नागरिक शहरातील खराब रस्त्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेत सत्तांतर होऊन आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. नागरिक शहरातील खराब रस्त्यांच्या समस्यांमुळे त्रस्त झाले असून, आता मरगळ झटकून रस्त्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटवा अशा सूचना भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी भाजप नगरसेवकांना दिल्या आहेत. आता सत्ताधाऱ्यांना देण्यात आलेली सहा महिन्यांची संधी संपली असून, विरोधी पक्षाची ताकद दाखवून द्या, अशा शब्दात महानगराध्यक्षांनी भाजप नगरसेवकांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप नगरसेवकांची बैठक सोमवारी रात्री भाजप कार्यालयात पार पडली. या बैठकीला भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा शहर सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक साखरे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, विशाल त्रिपाठी, नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे, धीरज सोनवणे, ॲड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, डॉ.चंद्रशेखर पाटील यांच्यासह भाजपचे इतर नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर गेल्या महिन्यात भाजपचे अस्तित्वच शहरात दिसून येत नाही. नागरिक खराब रस्त्यांनी, कचऱ्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. मात्र, या समस्या प्रशासनासमोर मांडण्यात भाजप कमी पडत असून, आता शहरातील नागरिकांच्या समस्यांबाबत कोणतीही तडजोड न करता थेट सत्ताधारी व मनपा प्रशासनाविरोधात आक्रमक पद्धतीने प्रश्न मांडा, अशा सूचनाही पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत नगरसेवकांना दिल्या आहेत.

मरगळ झटका आणि कामाला लागा

अनेक नगरसेवकांनी या बैठकीत प्रभागात कामे होत नसल्याचे सांगितले. तसेच मनपा प्रशासनातील अधिकारीदेखील दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्याविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पक्षाने आता मरगळ झटकून आपले अस्तित्व दाखवून द्यावे, असेही मत काही नगरसेवकांनी या बैठकीत मांडले. घनकचरा, अमृतची कामे, मनपातील गलथान कारभार असो वा शहरातील रस्ते अशा सर्वच प्रश्नांवर आंदोलने करून, प्रशासन व सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.