शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

जळगाव जिल्ह्यात ‘मैत्रेय’च्या अडीच हजार गुंतवणूकदारांची साडे पाच कोटी रुपयात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 16:07 IST

‘मैत्रेय’ने जिल्ह्यातील २ हजार ५५१ गुंतवणूकदारांची ५ कोटी ७६ लाख ६४ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मैत्रेयची स्थापना विरार येथे झालेली असली तरी त्याची प्रत्यक्ष गुंतवणुकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातूनच झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कंपनीला कोणी कशी मदत केली आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्दे संचालक जनार्दन परुळेकर जळगाव पोलिसांच्या ताब्यातमुंबईत मिळणार गुंतवणूकदारांनी पैसे ‘मैत्रेय’च्या गुंतवणुकीचा शोध

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : ‘मैत्रेय’ने जिल्ह्यातील २ हजार ५५१ गुंतवणूकदारांची ५ कोटी ७६ लाख ६४ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मैत्रेयची स्थापना विरार येथे झालेली असली तरी त्याची प्रत्यक्ष गुंतवणुकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातूनच झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कंपनीला कोणी कशी मदत केली आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत.दरम्यान, गजानन साहेबराव पाटील (वय ४१, रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यात ‘मैत्रेय’ कंपनीच्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांचे भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळकेर (रा.वसई, जि.पालघर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. ‘मैत्रेय’च्या गुंतवणुकीचा शोधपरुळेकर हा परभणी पोलिसांच्या गुन्ह्यात कारागृहात होता.उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी व महेंद्र बागुल यांच्या पथकाने त्याला परभणी येथून ताब्यात घेतले. शनिवारी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी त्याला न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले. दरम्यान, परुळेकर संचालक असल्याने त्याचा कंपनीत किती वाटा होता, कंपनीते जिल्ह्यात किती ठिकाणी व कोणत्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे, याची चौकशी केली जात आहे. संचालकांनी एजंटमार्फत पैसे वसूल केले आहेत व हे त्याची कुठे गुंतवणूक केली आहे याची चौकशी पोलीस करीत आहेत. मुंबईत मिळणार गुंतवणूकदारांना पैसे  फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील सर्व गुंतवणुकदारांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आपली रक्कम मिळणार आहे. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रक्कम मिळणार नाही, फक्त ज्या गुंतवणुकदारांनी तक्रार केली नसेल त्यांची पॉलिसीची माहिती नमुन्यात भरली जाणार आहे व ही माहिती देखील मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडेच पाठविली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार हा मुंबईतच होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.