शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात ‘मैत्रेय’च्या अडीच हजार गुंतवणूकदारांची साडे पाच कोटी रुपयात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 16:07 IST

‘मैत्रेय’ने जिल्ह्यातील २ हजार ५५१ गुंतवणूकदारांची ५ कोटी ७६ लाख ६४ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मैत्रेयची स्थापना विरार येथे झालेली असली तरी त्याची प्रत्यक्ष गुंतवणुकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातूनच झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कंपनीला कोणी कशी मदत केली आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्दे संचालक जनार्दन परुळेकर जळगाव पोलिसांच्या ताब्यातमुंबईत मिळणार गुंतवणूकदारांनी पैसे ‘मैत्रेय’च्या गुंतवणुकीचा शोध

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : ‘मैत्रेय’ने जिल्ह्यातील २ हजार ५५१ गुंतवणूकदारांची ५ कोटी ७६ लाख ६४ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मैत्रेयची स्थापना विरार येथे झालेली असली तरी त्याची प्रत्यक्ष गुंतवणुकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातूनच झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कंपनीला कोणी कशी मदत केली आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत.दरम्यान, गजानन साहेबराव पाटील (वय ४१, रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यात ‘मैत्रेय’ कंपनीच्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांचे भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळकेर (रा.वसई, जि.पालघर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. ‘मैत्रेय’च्या गुंतवणुकीचा शोधपरुळेकर हा परभणी पोलिसांच्या गुन्ह्यात कारागृहात होता.उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी व महेंद्र बागुल यांच्या पथकाने त्याला परभणी येथून ताब्यात घेतले. शनिवारी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी त्याला न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले. दरम्यान, परुळेकर संचालक असल्याने त्याचा कंपनीत किती वाटा होता, कंपनीते जिल्ह्यात किती ठिकाणी व कोणत्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे, याची चौकशी केली जात आहे. संचालकांनी एजंटमार्फत पैसे वसूल केले आहेत व हे त्याची कुठे गुंतवणूक केली आहे याची चौकशी पोलीस करीत आहेत. मुंबईत मिळणार गुंतवणूकदारांना पैसे  फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील सर्व गुंतवणुकदारांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आपली रक्कम मिळणार आहे. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रक्कम मिळणार नाही, फक्त ज्या गुंतवणुकदारांनी तक्रार केली नसेल त्यांची पॉलिसीची माहिती नमुन्यात भरली जाणार आहे व ही माहिती देखील मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडेच पाठविली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार हा मुंबईतच होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.