शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जळगाव जिल्ह्यात ‘मैत्रेय’च्या अडीच हजार गुंतवणूकदारांची साडे पाच कोटी रुपयात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 16:07 IST

‘मैत्रेय’ने जिल्ह्यातील २ हजार ५५१ गुंतवणूकदारांची ५ कोटी ७६ लाख ६४ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मैत्रेयची स्थापना विरार येथे झालेली असली तरी त्याची प्रत्यक्ष गुंतवणुकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातूनच झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कंपनीला कोणी कशी मदत केली आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्दे संचालक जनार्दन परुळेकर जळगाव पोलिसांच्या ताब्यातमुंबईत मिळणार गुंतवणूकदारांनी पैसे ‘मैत्रेय’च्या गुंतवणुकीचा शोध

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : ‘मैत्रेय’ने जिल्ह्यातील २ हजार ५५१ गुंतवणूकदारांची ५ कोटी ७६ लाख ६४ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मैत्रेयची स्थापना विरार येथे झालेली असली तरी त्याची प्रत्यक्ष गुंतवणुकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातूनच झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कंपनीला कोणी कशी मदत केली आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत.दरम्यान, गजानन साहेबराव पाटील (वय ४१, रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यात ‘मैत्रेय’ कंपनीच्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांचे भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळकेर (रा.वसई, जि.पालघर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. ‘मैत्रेय’च्या गुंतवणुकीचा शोधपरुळेकर हा परभणी पोलिसांच्या गुन्ह्यात कारागृहात होता.उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी व महेंद्र बागुल यांच्या पथकाने त्याला परभणी येथून ताब्यात घेतले. शनिवारी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी त्याला न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले. दरम्यान, परुळेकर संचालक असल्याने त्याचा कंपनीत किती वाटा होता, कंपनीते जिल्ह्यात किती ठिकाणी व कोणत्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे, याची चौकशी केली जात आहे. संचालकांनी एजंटमार्फत पैसे वसूल केले आहेत व हे त्याची कुठे गुंतवणूक केली आहे याची चौकशी पोलीस करीत आहेत. मुंबईत मिळणार गुंतवणूकदारांना पैसे  फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील सर्व गुंतवणुकदारांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आपली रक्कम मिळणार आहे. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रक्कम मिळणार नाही, फक्त ज्या गुंतवणुकदारांनी तक्रार केली नसेल त्यांची पॉलिसीची माहिती नमुन्यात भरली जाणार आहे व ही माहिती देखील मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडेच पाठविली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार हा मुंबईतच होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.