शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वाकडी गावामध्ये असुरक्षीततेची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:16 IST

मुलांची नग्न धिंड काढण्याच्या घटनेनंतर पुन्हा भीतीचे वातावरण

जामनेर : वाकडी, ता.जामनेर येथे आठ महिन्यांपूर्वी विहिरीत मागासवर्गीय मुलांनी आंघोळ केल्यानंतर त्यांची गावात नग्न धिंड काढून अमानुष मारहाण केल्याची अमानवीय घटना घडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. अशातच याच गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या मातंग समाजातील विनोद चांदणे या तरुणाचा निर्घूण खून झाल्याने समाज बांधवांमध्ये असुरक्षीतचेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील दहशतीकडे कोणी लक्ष देईल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.वाकडी ग्रामपंचायतीच्या कारभाराकडे लक्ष ठेऊन असणाऱ्या विनोद चांदणे यांनी गैरव्ययहार उघडकीस आणले व चौकशीची मागणी केल्याने याचा राग ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता, असे सांगण्यात येत आहे. याच रागातून चांदणे यांच्यावर सहा महिन्यात दोन वेळा जिवघेणे हल्ले करण्यात आले. दोन वर्षापूर्वीदेखील माजी सरपंचाने धमकी दिल्याची माहिती मिळाली. याबाबत चांदणे यांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली, मात्र राजकीय दबावामुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच अखेर एकाकी लढणाºया चांदणे याला जीव गमवावा लागल्याचे नातेवाईतांचे म्हणणे आहे.घटनेतील संशयीत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांना सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याचा चांदणे कुटुंबीयांचा आरोप आहे. संशयीत मुख्य सूत्रधार असलेल्या चंद्रशेखर वाणी याची गावात दहशत असल्याचा आरोप मयत चांदणे याचा भाऊ राजू याने केलेला आरोप गंभीर असून त्याची पोेलिसांनी दखल घेणे गरजेचे आहे.गरीबीत जीवन जगत असलेले वाकडीतील मातंग समाज बांधव मोलमजुरी करतात. आम्हाला सुखाने जगू द्या हीच त्यांची अपेक्षा आहे. पण सत्ताधाºयांच्या जीवावर त्यांना जगणे कठीण केले असल्याचे आरोप होत आहे. गावातील मागासवर्गीय असुरक्षीत असून त्यांच्यात सुरक्षीतचेची भावना निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचा मुद्दा आता पुढे आला आहे.निवडणुकांमुळे नेत्यांचे दुर्लक्षतालुक्यात एव्हढी गंभीर घटना घडूनदेखील सत्ताधारी अथवा विरोधकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मागासवर्गीयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्याने राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे, मात्र मते मागायला याल तेव्हा जाब विचारु अशी संतप्त भावना वाकडीचे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव