शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

मूल्यमापन सूत्रामुळे बारावीत कमी गुण मिळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बारावीच्या परीक्षेची तयारी करायची म्हणून आम्ही अकरावीला उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बारावीच्या परीक्षेची तयारी करायची म्हणून आम्ही अकरावीला उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच कोरोनामुळे गेल्यावर्षी काही ठिकाणी परीक्षा झाल्या तर काही ठिकाणी परीक्षा देखील झाली नाही. त्यामुळे आता राज्य शिक्षण मंडळाने ठरविलेल्या सुत्रानुसार बारावीचे मूल्यमापन झाल्यास कमी गुण मिळण्याची शक्यता असल्याची भीती बारावीच्या विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली़ त्याबाबतचा निर्णय जाहीर करून महिना उलटला तरी या इयत्तेतील मूल्यमापनाचे सूत्र ठरले नव्हते़ राज्य शिक्षण मंडळाने सीबीएसई शिक्षण मंडळाच्या धोरणावर अवलंबून असणारे ३०,३०,४० हे सूत्र शनिवारी जाहीर केले. याबाबत विद्यार्थी व पालकांची मते ‘लोकमत’ने जाणून घेतली. त्यामध्ये दहावीमध्ये अभ्यास करून चांगले गुण मिळविले़ पुढे बारावीचे वर्ष महत्वाचे असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. आता बारावीचे मूल्यमापन करताना अकरावीतील ३० टक्के गुणांचा विचार केला जाणार आहे़ त्याचा फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.

मूल्यमापनाचे सूत्र

दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या सत्र परीक्षा आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्के गुणांचा मूल्यमापनाचा सुत्रात समावेश आहे.

- पालक काय म्हणतात

असे गुण देणे योग्य नाही. परीक्षा होणे आवश्यक होते़ कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. बारावीच्या मूल्यमापनामुळे कमी गुण सुध्दा मिळू शकतील.

- रामचंद्र पाटील, पालक

------

भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये़ आॅफलाइन नव्हे तर आॅनलाइन तरी परीक्षा घेण्यात आली असती तर बरे झाले असते़ विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी झाली होती. त्यामुळे पुन्हा विचार व्हावा.

-ईश्वर चौधरी, पालक

------

- काय म्हणतात विद्यार्थी

अकरावीत असताना बारावीच्या परीक्षेकडे अधिक लक्ष देवून अभ्यास केला. त्यामुळे अकरावीतील कमी गुणांमुळे बारावीच्या निकालावर परिणाम होवू शकतो. काही दिवस थांबून बोर्डाने परीक्षा घेणे गरजेचे होते.

- सिध्देश्वर पाटील, विद्यार्थी

-----

कमी गुणांमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल खचेल़ आताही बोर्डाने विचार करून आॅनलाइन व आॅफलाइन दोन्ही पध्दतीने परीक्षा घ्याव्या. त्यातचे प्रोजेक्टचे सुध्दा गुण दिले जाणार आहे. त्यामुळे परीक्षा व प्राजेक्टचे गुणांची सरासरी काढून निकाल देण्यात यावा.

-अनंत धारणे, विद्यार्थी