शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

मूल्यमापन सूत्रामुळे बारावीत कमी गुण मिळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बारावीच्या परीक्षेची तयारी करायची म्हणून आम्ही अकरावीला उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बारावीच्या परीक्षेची तयारी करायची म्हणून आम्ही अकरावीला उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच कोरोनामुळे गेल्यावर्षी काही ठिकाणी परीक्षा झाल्या तर काही ठिकाणी परीक्षा देखील झाली नाही. त्यामुळे आता राज्य शिक्षण मंडळाने ठरविलेल्या सुत्रानुसार बारावीचे मूल्यमापन झाल्यास कमी गुण मिळण्याची शक्यता असल्याची भीती बारावीच्या विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली़ त्याबाबतचा निर्णय जाहीर करून महिना उलटला तरी या इयत्तेतील मूल्यमापनाचे सूत्र ठरले नव्हते़ राज्य शिक्षण मंडळाने सीबीएसई शिक्षण मंडळाच्या धोरणावर अवलंबून असणारे ३०,३०,४० हे सूत्र शनिवारी जाहीर केले. याबाबत विद्यार्थी व पालकांची मते ‘लोकमत’ने जाणून घेतली. त्यामध्ये दहावीमध्ये अभ्यास करून चांगले गुण मिळविले़ पुढे बारावीचे वर्ष महत्वाचे असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. आता बारावीचे मूल्यमापन करताना अकरावीतील ३० टक्के गुणांचा विचार केला जाणार आहे़ त्याचा फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.

मूल्यमापनाचे सूत्र

दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या सत्र परीक्षा आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्के गुणांचा मूल्यमापनाचा सुत्रात समावेश आहे.

- पालक काय म्हणतात

असे गुण देणे योग्य नाही. परीक्षा होणे आवश्यक होते़ कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. बारावीच्या मूल्यमापनामुळे कमी गुण सुध्दा मिळू शकतील.

- रामचंद्र पाटील, पालक

------

भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये़ आॅफलाइन नव्हे तर आॅनलाइन तरी परीक्षा घेण्यात आली असती तर बरे झाले असते़ विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी झाली होती. त्यामुळे पुन्हा विचार व्हावा.

-ईश्वर चौधरी, पालक

------

- काय म्हणतात विद्यार्थी

अकरावीत असताना बारावीच्या परीक्षेकडे अधिक लक्ष देवून अभ्यास केला. त्यामुळे अकरावीतील कमी गुणांमुळे बारावीच्या निकालावर परिणाम होवू शकतो. काही दिवस थांबून बोर्डाने परीक्षा घेणे गरजेचे होते.

- सिध्देश्वर पाटील, विद्यार्थी

-----

कमी गुणांमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल खचेल़ आताही बोर्डाने विचार करून आॅनलाइन व आॅफलाइन दोन्ही पध्दतीने परीक्षा घ्याव्या. त्यातचे प्रोजेक्टचे सुध्दा गुण दिले जाणार आहे. त्यामुळे परीक्षा व प्राजेक्टचे गुणांची सरासरी काढून निकाल देण्यात यावा.

-अनंत धारणे, विद्यार्थी