शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

थकवा येतोय, काय करू?, रुग्ण घटले, हेल्पलाईवर कॉल वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST

(डमी ८३२ ) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत थैमान घातले होते. राज्यात ...

(डमी ८३२ )

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत थैमान घातले होते. राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते, त्यामध्ये दुर्दैवाने जळगाव जिल्हा आघाडीवर होता. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर प्रशासनाने नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले असून, गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. मात्र, एकीकडे घट सुरू असताना, दुसरीकडे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना अजूनही त्रास जाणवत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल वाढले असून, त्रासावर प्राथमिक उपचार करून घेण्यासाठी विचारणा केली जात आहे.

कोरोनावर मात केल्यानंतर देखील अनेक रुग्णांना महिनाभर काही ना काही त्रास जाणवत असतो, यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोनानंतर त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देखील जिल्हा प्रशासनाकडून ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. आता एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना, दुसरीकडे मात्र कोरोनावर मात केल्यानंतर अनेक रुग्णांना डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, थकवा जाणवत आहे. हेल्पलाईनवर अशा रुग्णांचे कॉल वाढले असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून अशा रुग्णांना आवश्यक औषधोपचाराबाबत प्राथमिक माहिती पुरविली जात आहे.

थकवा वाढलाय, काय करू?

- हेल्पलाईनवर दिवसाला येत असलेल्या २० ते ३० कॉलपैकी निम्म्या कॉलमध्ये रुग्णांची समस्या एकच राहत आहे. अनेक रुग्णांना कोरोना होऊन महिना झाल्यावर देखील थकवा जाणवत आहे. यामुळे कॉल आल्यावर अनेक रुग्णांचा पहिला प्रश्न हाच असतो की, थकवा वाढलाय, काय करू ?, त्यावर डॉक्टरांकडून प्राथमिक औषधोपचाराविषयी माहिती दिली जात आहे.

- या हेल्पलाईनवर कोरोनावर मात केलेल्या रुग्णांसह लसीकरण घेऊन ताप आलेल्या रुग्णांचेही कॉल येत असतात. लस घेतल्यानंतर ताप आला आहे, काय करू?, डोके दुखत आहे, काय करू? असे प्रश्न रुग्णांकडून केले जात आहेत. तसेच इतर आजारांविषयीदेखील अनेक रुग्ण या हेल्पलाईनवर विचारणा करत असल्याची माहिती जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पहिल्या लाटेनंतर आलेले एकूण कॉल - ७८९

दुसऱ्या लाटेनंतर आलेले एकूण कॉल - ९९१

तारीख - कॉल्स - रुग्ण

१ मे - ३१ - २८

१५ मे - ३९ - ३४

१ जून - ४१ - ४०

१५ जून - ५४ - ३५

२० जून - ३० - २३

जळगाव शहरातून सर्वाधिक कॉल्स

जिल्हा वैद्यकीय विभागाने संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांसाठी ही हेल्पलाईन सुरू केली असली तरी, या हेल्पलाईनवर सर्वाधिक कॉल्स हे जळगाव शहरातूनच येत असतात. जळगाव ग्रामीणमधून देखील काही कॉल्स येत असतात. मात्र, इतर तालुक्यांमधून फारसे कॉल्स येत नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.