शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अमळनेर येथे विनाअट ठेवी मिळण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 13:22 IST

अमळनेर तालुक्यातील 50 ते 60 ठेवीदारांचा उपोषणात सहभाग

 अमळनेर,दि.3-: महाराष्ट्र  शासनाकडून पतसंस्था ठेवीदारांना त्यांच्या ठेवी विनाअट परत कराव्यात या मागणीसाठी ठेवीदारांतर्फे बुधवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात 2007 पासून पतसंस्था ठेवीदारांचा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे. अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. पतसंस्था ठेवीदारांना आतार्पयत राज्य शासनाने दिलेल्या 200 कोटी अर्थसहाय्याशिवाय कुठल्याही प्रकारे ठेवीदारांना पैसा मिळालेला नाही. 200 कोटींपैकी 25 ते 30 कोटी रक्कम वाटपविना शिल्लक आहे.
सहकार खात्याने एकही पतसंस्थेची 100 टक्के कर्ज वसुली करून, 100 टक्के ठेवी ठेवीदारांना परत केल्या नाही. कर्ज वसुली करण्याची क्षमता असूनदेखील कर्ज वसुली करून ठेवीदारांना ठेवी परत करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आल्याचे ठेवीदारांनी सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ठेवी विनाअट परत कराव्यात व जिल्ह्यातील ठेवीदारांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावर डॉ. रूपेश संचेती, उमाकांत नाईक, अॅड. प्रकाश बडगुजर, अॅड. विजय देवरे, अॅड.राजेंद्र कुळकर्णी, रामभाऊ सैंदाणे, निळकंठ पाटील, देवीदास बिरारी,परमानंद वाणी, विजय बारी, रामभाऊ पाटील, पद्माकर मुंडके आदींच्या स्वाक्ष:या आहेत. जवळपास 50 ते 60 स्त्री-पुरूष महिला ठेवीदार लाक्षणिक उपोषणाला बसले आहे.