शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कृषिपंपांना विजेची प्रतीक्षाच

By admin | Updated: September 29, 2015 23:37 IST

नंदुरबार : अर्ज केलेल्या सुमारे दीड हजार कृषिपंपधारकांसाठी वीज वितरण कंपनी वीज उपलब्ध करून देणार असली तरी त्यासाठी शेतक:यांना अजून वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नंदुरबार : पिकांना पाणी देण्यासाठी वीज मिळावी यासाठी अर्ज केलेल्या सुमारे दीड हजार कृषिपंपधारकांसाठी वीज वितरण कंपनी वीज उपलब्ध करून देणार असली तरी त्यासाठी शेतक:यांना अजून वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या इशा:यानुसार, मुख्यालयी न थांबणा:या जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या 23 कर्मचा:यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला असून, एकाला दंड आकारण्यात आला आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या महिन्यात वीज उपकेंद्र आणि आढावा बैठकीच्या निमित्ताने नंदुरबार येथे भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी काही घोषणाही केल्या होत्या. त्यांचा आढावा घेतला असता काही बाबी प्रकर्षाने समोर येतात. जिल्ह्यातील 43 हजार 220 शेतक:यांकडे कृषिपंपांची तब्बल 235 कोटी 24 लाख रुपयांची थकबाकी आहे. शेतक:यांना वेळोवेळी आवाहन करूनही ती भरण्यात आलेली नाही. त्यामुळे वीज कंपनीवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. असे असले तरी वीज बिल थकबाकीअभावी एकाही शेतक:याचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे सांगून ऊर्जामत्र्यांनी शेतक:यांना हा दिलासा दिलेला आहे.

वीज कंपनीच्या म्हणण्यानुसार, एप्रिलपासून एकाही थकबाकीदार कृषिपंपधारकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नाही. यात राज्य शासनाने थकबाकीदारांना काही सवलती दिल्या. त्यात चालू वीज बिल भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. अशा 258 शेतक:यांनी चालू वीज बिल भरल्याने त्यांचा वीजपुरवठा नियमित करण्यात आला आहे,

कृषिपंपांना वीजपुरवठा मिळावा यासाठी जुलैअखेर जिल्ह्यातील दोन हजार 43 शेतक:यांनी वीज वितरण कंपनीकडे अर्ज केले होते. यातील 979 शेतक:यांच्या कृषिपंपांना वेगवेगळ्या योजनांमधून वीजपुरवठा देण्यात आला आहे. अजूनही एक हजार 571 शेतकरी विजेच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतक:यांच्या कृषिपंपांना वीज मिळावी यासाठी नवीन लाईन टाकावी लागणार आहे. त्यासाठी 16 कोटी रुपये खर्च येणार आहे. तथापि, वीज कंपनीच्या अधिका:यांच्या म्हणण्यानुसार, मुख्य कार्यालयाकडून 15 कोटी रुपये उपलब्ध झाले असून, त्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. या कामाला साधारण वर्ष लागेल. तोर्पयत शेतक:यांना विजेची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

दरम्यान, वीज अधिकारी व कर्मचा:यांना त्यांच्या मुख्यालयी राहणे सक्तीचे करण्यात येणार आहे. तीन महिन्यांच्या आत जे मुख्यालयी राहणार नाही त्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात येणार आहे. पुढच्या तीन महिन्यांतही राहण्यास गेले नाहीत तर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केले होते. त्या आनुषंगाने आढावा घेतला असता वीज वितरण कंपनीचे या जिल्ह्यात सर्व मिळून एकूण 723 कर्मचारी आहेत. या कर्मचा:यांना मुख्यालयी राहत असल्यासंबंधी हमीपत्र भरण्याविषयी वीज कंपनीने सूचित केले. यातील 171 कर्मचा:यांनी असे हमीपत्र भरून दिले. उर्वरित 538 कर्मचा:यांची वीज कंपनीने तपासणी केली. त्यात 24 कर्मचारी नियुक्त केलेल्या मुख्यालयी राहत नसल्याचे तपासणीत आढळले. यातील 23 कर्मचा:यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला असून, एकाला त्याच्या पगाराच्या एक तृतीयांश रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली. 25 ऑगस्ट रोजी वीज वितरण कंपनीने ही कारवाई केली. रोहित्र नादुरुस्त झाल्यास नंदुरबार व शहादा या वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयांमध्ये आणले जाते. रोहित्रात किरकोळ दोष असेल तर ते या दोन ठिकाणीच दुरुस्त केले जातात. मोठी समस्या असेल तर जळगाव, धुळे येथील एजन्सींकडे दुरुस्तीसाठी पाठविले जाते. यासाठी साधारण आठ-दहा दिवस लागतात. दरम्यान, पालिका हद्दीबाहेरील वीज खांब बदलणे, रस्त्याच्या मध्यभागातील खांब हटविणे, जीर्ण तारा, जीर्ण खांब बदलणे यासह इतर कामांसाठी साडेतीन कोटी रुपये मिळणार आहे. यासाठी सव्रेक्षण करण्यात आले आहे.

''

राज्य वीज वितरण कंपनीने नंदुरबार जिल्ह्यातील थकबाकीदार कृषिपंपधारकांचा एप्रिलपासून वीजपुरवठा खंडित केलेला नाही. मात्र शासनाने सवलती दिल्या. त्यात थकबाकीदार कृषिपंपधारकाने चालू बिल भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. असे जिल्ह्यात 258 ग्राहक आहेत.''

- अविनाश पाटोळे,

अधीक्षक अभियंता,

वीज वितरण कंपनी कार्यालय, नंदुरबार