शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

कृषिपंपांना विजेची प्रतीक्षाच

By admin | Updated: September 29, 2015 23:37 IST

नंदुरबार : अर्ज केलेल्या सुमारे दीड हजार कृषिपंपधारकांसाठी वीज वितरण कंपनी वीज उपलब्ध करून देणार असली तरी त्यासाठी शेतक:यांना अजून वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नंदुरबार : पिकांना पाणी देण्यासाठी वीज मिळावी यासाठी अर्ज केलेल्या सुमारे दीड हजार कृषिपंपधारकांसाठी वीज वितरण कंपनी वीज उपलब्ध करून देणार असली तरी त्यासाठी शेतक:यांना अजून वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या इशा:यानुसार, मुख्यालयी न थांबणा:या जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या 23 कर्मचा:यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला असून, एकाला दंड आकारण्यात आला आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या महिन्यात वीज उपकेंद्र आणि आढावा बैठकीच्या निमित्ताने नंदुरबार येथे भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी काही घोषणाही केल्या होत्या. त्यांचा आढावा घेतला असता काही बाबी प्रकर्षाने समोर येतात. जिल्ह्यातील 43 हजार 220 शेतक:यांकडे कृषिपंपांची तब्बल 235 कोटी 24 लाख रुपयांची थकबाकी आहे. शेतक:यांना वेळोवेळी आवाहन करूनही ती भरण्यात आलेली नाही. त्यामुळे वीज कंपनीवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. असे असले तरी वीज बिल थकबाकीअभावी एकाही शेतक:याचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे सांगून ऊर्जामत्र्यांनी शेतक:यांना हा दिलासा दिलेला आहे.

वीज कंपनीच्या म्हणण्यानुसार, एप्रिलपासून एकाही थकबाकीदार कृषिपंपधारकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नाही. यात राज्य शासनाने थकबाकीदारांना काही सवलती दिल्या. त्यात चालू वीज बिल भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. अशा 258 शेतक:यांनी चालू वीज बिल भरल्याने त्यांचा वीजपुरवठा नियमित करण्यात आला आहे,

कृषिपंपांना वीजपुरवठा मिळावा यासाठी जुलैअखेर जिल्ह्यातील दोन हजार 43 शेतक:यांनी वीज वितरण कंपनीकडे अर्ज केले होते. यातील 979 शेतक:यांच्या कृषिपंपांना वेगवेगळ्या योजनांमधून वीजपुरवठा देण्यात आला आहे. अजूनही एक हजार 571 शेतकरी विजेच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतक:यांच्या कृषिपंपांना वीज मिळावी यासाठी नवीन लाईन टाकावी लागणार आहे. त्यासाठी 16 कोटी रुपये खर्च येणार आहे. तथापि, वीज कंपनीच्या अधिका:यांच्या म्हणण्यानुसार, मुख्य कार्यालयाकडून 15 कोटी रुपये उपलब्ध झाले असून, त्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. या कामाला साधारण वर्ष लागेल. तोर्पयत शेतक:यांना विजेची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

दरम्यान, वीज अधिकारी व कर्मचा:यांना त्यांच्या मुख्यालयी राहणे सक्तीचे करण्यात येणार आहे. तीन महिन्यांच्या आत जे मुख्यालयी राहणार नाही त्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात येणार आहे. पुढच्या तीन महिन्यांतही राहण्यास गेले नाहीत तर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केले होते. त्या आनुषंगाने आढावा घेतला असता वीज वितरण कंपनीचे या जिल्ह्यात सर्व मिळून एकूण 723 कर्मचारी आहेत. या कर्मचा:यांना मुख्यालयी राहत असल्यासंबंधी हमीपत्र भरण्याविषयी वीज कंपनीने सूचित केले. यातील 171 कर्मचा:यांनी असे हमीपत्र भरून दिले. उर्वरित 538 कर्मचा:यांची वीज कंपनीने तपासणी केली. त्यात 24 कर्मचारी नियुक्त केलेल्या मुख्यालयी राहत नसल्याचे तपासणीत आढळले. यातील 23 कर्मचा:यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला असून, एकाला त्याच्या पगाराच्या एक तृतीयांश रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली. 25 ऑगस्ट रोजी वीज वितरण कंपनीने ही कारवाई केली. रोहित्र नादुरुस्त झाल्यास नंदुरबार व शहादा या वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयांमध्ये आणले जाते. रोहित्रात किरकोळ दोष असेल तर ते या दोन ठिकाणीच दुरुस्त केले जातात. मोठी समस्या असेल तर जळगाव, धुळे येथील एजन्सींकडे दुरुस्तीसाठी पाठविले जाते. यासाठी साधारण आठ-दहा दिवस लागतात. दरम्यान, पालिका हद्दीबाहेरील वीज खांब बदलणे, रस्त्याच्या मध्यभागातील खांब हटविणे, जीर्ण तारा, जीर्ण खांब बदलणे यासह इतर कामांसाठी साडेतीन कोटी रुपये मिळणार आहे. यासाठी सव्रेक्षण करण्यात आले आहे.

''

राज्य वीज वितरण कंपनीने नंदुरबार जिल्ह्यातील थकबाकीदार कृषिपंपधारकांचा एप्रिलपासून वीजपुरवठा खंडित केलेला नाही. मात्र शासनाने सवलती दिल्या. त्यात थकबाकीदार कृषिपंपधारकाने चालू बिल भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. असे जिल्ह्यात 258 ग्राहक आहेत.''

- अविनाश पाटोळे,

अधीक्षक अभियंता,

वीज वितरण कंपनी कार्यालय, नंदुरबार