नंदुरबार : पिकांना पाणी देण्यासाठी वीज मिळावी यासाठी अर्ज केलेल्या सुमारे दीड हजार कृषिपंपधारकांसाठी वीज वितरण कंपनी वीज उपलब्ध करून देणार असली तरी त्यासाठी शेतक:यांना अजून वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या इशा:यानुसार, मुख्यालयी न थांबणा:या जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या 23 कर्मचा:यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला असून, एकाला दंड आकारण्यात आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या महिन्यात वीज उपकेंद्र आणि आढावा बैठकीच्या निमित्ताने नंदुरबार येथे भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी काही घोषणाही केल्या होत्या. त्यांचा आढावा घेतला असता काही बाबी प्रकर्षाने समोर येतात. जिल्ह्यातील 43 हजार 220 शेतक:यांकडे कृषिपंपांची तब्बल 235 कोटी 24 लाख रुपयांची थकबाकी आहे. शेतक:यांना वेळोवेळी आवाहन करूनही ती भरण्यात आलेली नाही. त्यामुळे वीज कंपनीवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. असे असले तरी वीज बिल थकबाकीअभावी एकाही शेतक:याचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे सांगून ऊर्जामत्र्यांनी शेतक:यांना हा दिलासा दिलेला आहे. वीज कंपनीच्या म्हणण्यानुसार, एप्रिलपासून एकाही थकबाकीदार कृषिपंपधारकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नाही. यात राज्य शासनाने थकबाकीदारांना काही सवलती दिल्या. त्यात चालू वीज बिल भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. अशा 258 शेतक:यांनी चालू वीज बिल भरल्याने त्यांचा वीजपुरवठा नियमित करण्यात आला आहे, कृषिपंपांना वीजपुरवठा मिळावा यासाठी जुलैअखेर जिल्ह्यातील दोन हजार 43 शेतक:यांनी वीज वितरण कंपनीकडे अर्ज केले होते. यातील 979 शेतक:यांच्या कृषिपंपांना वेगवेगळ्या योजनांमधून वीजपुरवठा देण्यात आला आहे. अजूनही एक हजार 571 शेतकरी विजेच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतक:यांच्या कृषिपंपांना वीज मिळावी यासाठी नवीन लाईन टाकावी लागणार आहे. त्यासाठी 16 कोटी रुपये खर्च येणार आहे. तथापि, वीज कंपनीच्या अधिका:यांच्या म्हणण्यानुसार, मुख्य कार्यालयाकडून 15 कोटी रुपये उपलब्ध झाले असून, त्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. या कामाला साधारण वर्ष लागेल. तोर्पयत शेतक:यांना विजेची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. दरम्यान, वीज अधिकारी व कर्मचा:यांना त्यांच्या मुख्यालयी राहणे सक्तीचे करण्यात येणार आहे. तीन महिन्यांच्या आत जे मुख्यालयी राहणार नाही त्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात येणार आहे. पुढच्या तीन महिन्यांतही राहण्यास गेले नाहीत तर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केले होते. त्या आनुषंगाने आढावा घेतला असता वीज वितरण कंपनीचे या जिल्ह्यात सर्व मिळून एकूण 723 कर्मचारी आहेत. या कर्मचा:यांना मुख्यालयी राहत असल्यासंबंधी हमीपत्र भरण्याविषयी वीज कंपनीने सूचित केले. यातील 171 कर्मचा:यांनी असे हमीपत्र भरून दिले. उर्वरित 538 कर्मचा:यांची वीज कंपनीने तपासणी केली. त्यात 24 कर्मचारी नियुक्त केलेल्या मुख्यालयी राहत नसल्याचे तपासणीत आढळले. यातील 23 कर्मचा:यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला असून, एकाला त्याच्या पगाराच्या एक तृतीयांश रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली. 25 ऑगस्ट रोजी वीज वितरण कंपनीने ही कारवाई केली. रोहित्र नादुरुस्त झाल्यास नंदुरबार व शहादा या वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयांमध्ये आणले जाते. रोहित्रात किरकोळ दोष असेल तर ते या दोन ठिकाणीच दुरुस्त केले जातात. मोठी समस्या असेल तर जळगाव, धुळे येथील एजन्सींकडे दुरुस्तीसाठी पाठविले जाते. यासाठी साधारण आठ-दहा दिवस लागतात. दरम्यान, पालिका हद्दीबाहेरील वीज खांब बदलणे, रस्त्याच्या मध्यभागातील खांब हटविणे, जीर्ण तारा, जीर्ण खांब बदलणे यासह इतर कामांसाठी साडेतीन कोटी रुपये मिळणार आहे. यासाठी सव्रेक्षण करण्यात आले आहे. '' - अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी कार्यालय, नंदुरबार
कृषिपंपांना विजेची प्रतीक्षाच
By admin | Updated: September 29, 2015 23:37 IST