शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांचा सातबारा कोरा करण्यासाठी न्यायालयात जाणार

By admin | Updated: January 20, 2017 00:39 IST

राजू शेट्टींचा आरोप : ‘स्वाभिमानी’ने मोदींची साथ सोडली; मूठभर उद्योगपतींना नऊ लाख कोटींची कजर्माफी

जळगाव : दुधाळ गायीसाठी लाखभर रुपये लागतात. पण 50 हजार रुपये कर्ज थकले म्हणून शेतक:याला आत्महत्येची वेळ येते. राज्यात शेतक:याची जनावराएवढीही किंमत राहीली नाही. देशात कृषी कजर्माफीसाठी 85 हजार कोटी रुपये द्यायला सरकार तयार नाही. दुसरीकडे 600 ते 700 मूठभर कजर्बुडव्या उद्योगपतींना नऊ लाख कोटींची कजर्माफी दिली जाते. सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी देशाच्या लोकसंख्येत फक्त तीन टक्के असलेल्या एक लाख 15 हजार कोटी रुपये बोजा दरवर्षाला सहन करण्याचा निर्णय केंद्र शासन घेते. अशा स्थितीत शेतक:यांचा दबाव गट निर्माण होण्याची गरज असून, आम्ही शेतक:यांच्या कजर्माफीसाठी, सातबारा कोरा होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी शिरसोली प्र.न. ता. जळगाव येथे आयोजित सभेत सांगितले. व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रकाश पोकळे, रवीकांत तुपकर, भास्कर पाटील, जगतराव पाटील, नाना इखार, संभाजी पाटील, संजय घुगे, प्रताप पवार आदी उपस्थित होते. ैविमा कंपनीने फसविलेखरीप पीक विमा योजनेत फक्त उत्पादनाबाबत सुरक्षा दिली. गुणवत्तेचा मुद्दा समाविष्ट केला नाही. पाऊस जादा पडल्याने ज्वारी, सोयाबीन काळवंडले. त्यांना दर मिळाला नाही. पण उंबरठा उत्पादन आल्याचे सांगून विमा कंपनीने भरपाई दिली नाही. कंपनीने फसवणूक केली. जागतिक तापमान वाढीला कारखानदार जबाबदार आहेत. त्यांचा त्रास नैसर्गिक आपत्तीच्या रुपाने शेतक:यांना सहन करावा लागतो, असेही शेट्टी यांनी सांगितले. माझा शेतक:यांशी करारमला माङया भागातील लोकवर्गणी गोळा करून निवडून देतात. मी पाच वर्षे शेतक:यांसाठी काम करतो. हा पाच वर्षाचा करार मी शेतक:यांसोबत केलेला आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले. कमी कर्ज थकलेल्यांचीही आत्महत्या50 हजार रुपयांपेक्षा कमी कर्ज घेतलेल्या शेतक:यांनाही आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या सव्रेक्षणातून समोर आले. एक म्हैस 75 हजारांपुढे मिळते. जनावराएवढी किंमतही शेतक:याला नाही, अस संताप शेट्टी यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले. मी त्या वेळेस त्यांच्यासोबत व्यासपीठावर असायचो. पण हे आश्वासन मोदींनी न पाळल्याने मी त्यांची साथ सोडली व शेतक:यांसोबत राहिलो आहे. मी लोकसभेत दीडपट हमीभावाचा ठराव मांडला तर त्यावर फक्त माङो एकच मत पडले. ही आश्वासने पाळत नसाल तर आम्ही गावागावात हा मुद्दा नेऊ, असेही शेट्टी म्हणाले.