शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

शेतक:यांचा सातबारा कोरा करण्यासाठी न्यायालयात जाणार

By admin | Updated: January 20, 2017 00:39 IST

राजू शेट्टींचा आरोप : ‘स्वाभिमानी’ने मोदींची साथ सोडली; मूठभर उद्योगपतींना नऊ लाख कोटींची कजर्माफी

जळगाव : दुधाळ गायीसाठी लाखभर रुपये लागतात. पण 50 हजार रुपये कर्ज थकले म्हणून शेतक:याला आत्महत्येची वेळ येते. राज्यात शेतक:याची जनावराएवढीही किंमत राहीली नाही. देशात कृषी कजर्माफीसाठी 85 हजार कोटी रुपये द्यायला सरकार तयार नाही. दुसरीकडे 600 ते 700 मूठभर कजर्बुडव्या उद्योगपतींना नऊ लाख कोटींची कजर्माफी दिली जाते. सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी देशाच्या लोकसंख्येत फक्त तीन टक्के असलेल्या एक लाख 15 हजार कोटी रुपये बोजा दरवर्षाला सहन करण्याचा निर्णय केंद्र शासन घेते. अशा स्थितीत शेतक:यांचा दबाव गट निर्माण होण्याची गरज असून, आम्ही शेतक:यांच्या कजर्माफीसाठी, सातबारा कोरा होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी शिरसोली प्र.न. ता. जळगाव येथे आयोजित सभेत सांगितले. व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रकाश पोकळे, रवीकांत तुपकर, भास्कर पाटील, जगतराव पाटील, नाना इखार, संभाजी पाटील, संजय घुगे, प्रताप पवार आदी उपस्थित होते. ैविमा कंपनीने फसविलेखरीप पीक विमा योजनेत फक्त उत्पादनाबाबत सुरक्षा दिली. गुणवत्तेचा मुद्दा समाविष्ट केला नाही. पाऊस जादा पडल्याने ज्वारी, सोयाबीन काळवंडले. त्यांना दर मिळाला नाही. पण उंबरठा उत्पादन आल्याचे सांगून विमा कंपनीने भरपाई दिली नाही. कंपनीने फसवणूक केली. जागतिक तापमान वाढीला कारखानदार जबाबदार आहेत. त्यांचा त्रास नैसर्गिक आपत्तीच्या रुपाने शेतक:यांना सहन करावा लागतो, असेही शेट्टी यांनी सांगितले. माझा शेतक:यांशी करारमला माङया भागातील लोकवर्गणी गोळा करून निवडून देतात. मी पाच वर्षे शेतक:यांसाठी काम करतो. हा पाच वर्षाचा करार मी शेतक:यांसोबत केलेला आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले. कमी कर्ज थकलेल्यांचीही आत्महत्या50 हजार रुपयांपेक्षा कमी कर्ज घेतलेल्या शेतक:यांनाही आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या सव्रेक्षणातून समोर आले. एक म्हैस 75 हजारांपुढे मिळते. जनावराएवढी किंमतही शेतक:याला नाही, अस संताप शेट्टी यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले. मी त्या वेळेस त्यांच्यासोबत व्यासपीठावर असायचो. पण हे आश्वासन मोदींनी न पाळल्याने मी त्यांची साथ सोडली व शेतक:यांसोबत राहिलो आहे. मी लोकसभेत दीडपट हमीभावाचा ठराव मांडला तर त्यावर फक्त माङो एकच मत पडले. ही आश्वासने पाळत नसाल तर आम्ही गावागावात हा मुद्दा नेऊ, असेही शेट्टी म्हणाले.