शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 23:10 IST

बिडगाव : मजूर वर्गात घबराट

बिडगाव, ता.चोपडा : येथे रविवारी दुपारी शेतात केळीच्या बागेत ठिबकचा कॉक फिरवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.येथील शेतकरी प्रताप यशवंत पाटील हे दुपारी चार वाजता त्यांच्या इच्छापुर शिवारातील शेतात गेले होते. यावेळी ते केळीच्या बागेत असलेला ठिबकचा कॉक (व्हॉल) बदलवण्यासाठी गेले असता तेथे लपून बसलेल्या अस्वलाने शेतकरी प्रताप पाटील यांच्यावर अचानक हल्ला चढवून डाव्या हाताचे लचके तोडले. काही वेळ झटापट होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्याने काही मजुरांनी तेथे धाव घेतल्याने चवताळलेल्या अस्वलाने पळ काढला. त्यांना तत्काळ मजुरांनी उपचारासाठी जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल केले. याबाबत वरगव्हान परिमंडळाचे वनपाल आर.यू.घोडे यांनी घटनेची माहिती घेतली आहे. याबाबत पंचनामा करून पाटील यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले.या घटनेमुळे मजूरवर्गात घबराट पसरली असून वनविभागाने तत्काळ उपाययोजना करून चवताळलेल्या अस्वलाचा बंदोस्त करण्याची मागणी होत आहे.