शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

पंधरा दिवसांपासून विज नसल्याने शेतकऱ्यांची महावितरणच्या कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : धानवड, चिंचोली, कंडारी या गावांमध्ये कृषी पंपासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून विज पुरवठा खंडित असल्यामुळे, पिकांचे नुकसान होत ...

जळगाव : धानवड, चिंचोली, कंडारी या गावांमध्ये कृषी पंपासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून विज पुरवठा खंडित असल्यामुळे, पिकांचे नुकसान होत आहे. तक्रार करुनही विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी जयकिसन वाडीतील कार्यालयावर धडक देऊन, कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. तसेच दोन दिवसात विज पुरवठा सुरळीत न केल्यास रस्ता रोको करण्याचा इशाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महावितरणतर्फे कृषी पंपासाठी वेळापत्रकानुसार आठ तास देण्यात येत असून, आतापर्यंत धानवड, उमाळा, चिंचोली, कंडारी या गावातही वेळापत्रकानुसारच विजपुरवठा देण्यात येत आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे मंगळवारी येथील १०० ते १५० शेतकरी बांधवांनी बुधवारी महावितरणच्या कार्यालयात येऊन पिकांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांनी जो पर्यंत वीज वितरणाचे व्यवस्थितपणे नियोजन केले जात नाही तोपर्यंत प्रभारी कार्यकारी अभियंता यांचे दालन न सोडण्याचा पवित्रा घेतला होता. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार शेतकरी बांधवांनी प्रभारी अभियंता एम. बी. चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी चौधरी यांनी संबधित अधिकाऱ्याला बोलवून घेत शेतकऱ्यांशी समन्वय ठेवावा व त्यांचा प्रत्येक फोन घेण्याची सक्त ताकीद दिली.

तर दोन दिवसांत रास्ता रोकोचा इशारा

शेतकऱ्यांसोबत ग्रामीण भागातील शिवसेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, दिलीप चव्हाण, चिंचोलीचे शरद घुगे, युवा सेना तालुका सरचिटणीस अविनाश पाटील, जनार्धन पाटील, कालिदास पाटील, राकेश घुगे,

आबा घुगे, उमाळ्याचे माजी सरपंच अनिल खडसे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी दोन दिवसात विज पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. तर शेतकरी बांधवांनी थेट उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.