शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

पंधरा दिवसांपासून विज नसल्याने शेतकऱ्यांची महावितरणच्या कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : धानवड, चिंचोली, कंडारी या गावांमध्ये कृषी पंपासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून विज पुरवठा खंडित असल्यामुळे, पिकांचे नुकसान होत ...

जळगाव : धानवड, चिंचोली, कंडारी या गावांमध्ये कृषी पंपासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून विज पुरवठा खंडित असल्यामुळे, पिकांचे नुकसान होत आहे. तक्रार करुनही विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी जयकिसन वाडीतील कार्यालयावर धडक देऊन, कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. तसेच दोन दिवसात विज पुरवठा सुरळीत न केल्यास रस्ता रोको करण्याचा इशाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महावितरणतर्फे कृषी पंपासाठी वेळापत्रकानुसार आठ तास देण्यात येत असून, आतापर्यंत धानवड, उमाळा, चिंचोली, कंडारी या गावातही वेळापत्रकानुसारच विजपुरवठा देण्यात येत आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे मंगळवारी येथील १०० ते १५० शेतकरी बांधवांनी बुधवारी महावितरणच्या कार्यालयात येऊन पिकांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांनी जो पर्यंत वीज वितरणाचे व्यवस्थितपणे नियोजन केले जात नाही तोपर्यंत प्रभारी कार्यकारी अभियंता यांचे दालन न सोडण्याचा पवित्रा घेतला होता. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार शेतकरी बांधवांनी प्रभारी अभियंता एम. बी. चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी चौधरी यांनी संबधित अधिकाऱ्याला बोलवून घेत शेतकऱ्यांशी समन्वय ठेवावा व त्यांचा प्रत्येक फोन घेण्याची सक्त ताकीद दिली.

तर दोन दिवसांत रास्ता रोकोचा इशारा

शेतकऱ्यांसोबत ग्रामीण भागातील शिवसेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, दिलीप चव्हाण, चिंचोलीचे शरद घुगे, युवा सेना तालुका सरचिटणीस अविनाश पाटील, जनार्धन पाटील, कालिदास पाटील, राकेश घुगे,

आबा घुगे, उमाळ्याचे माजी सरपंच अनिल खडसे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी दोन दिवसात विज पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. तर शेतकरी बांधवांनी थेट उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.