शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

कापसाचे भाव वाढूनही शेतकऱ्यांचा नशिबी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:15 IST

जिनर्सने थांबवली खरेदी

ठळक मुद्देकमी भावात व्यापाऱ्यांना द्यावा लागतोय माल, साटेलोट्यामुळे शेतकऱ्यांना वैताग

जळगाव : संपूर्ण हंगाम कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री न करणाºया शेतकºयांना आता भाव वाढल्यावर देखील निराशाच पदरी पडत आहे. कापसाचे दर ६ हजार रुपयांपर्यंत गेल्यावर जिल्ह्यातील अनेक जिनर्सनी खरेदी थांबवली आहे. शेतकºयांना आता व्यापाºयांना कमी भावात कापूस विक्री करावा लागत असल्याचे चित्र आहे. जिनर्स व व्यापाºयांचा या खेळीमुळे शेतकºयांना भाव वाढूनही फायदा होताना दिसून येत नाही.सप्टेंबर २०१८ मध्ये यंदाच्या कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. सुरुवातीचे काही दिवस बाजारात कापूस नसताना भाव हे ६ हजार रुपयांपर्यंत होते. मात्र, आॅक्टोबर अखेरपर्यंत नवीन कापूस बाजारात आल्यानंतर कापसाचे भाव ५५०० पर्यंत आले. भविष्यात भाव वाढतील या अपेक्षेने शेतकºयांनी आॅक्टोबर ते जानेवारीपर्यंत विक्रीसाठी माल बाजारात आणलाच नसल्याने बाजरात मंदीचे सावट होते. आंतराष्टÑीय बाजारात सरकीला भाव नसल्याने कापसाला मागणी नसल्याने भावात कोणतीही वाढ झाली नाही. मात्र, आता मार्चच्या दुसºया आठवड्यापासून कापसाच्या भावात वाढ झाल्यावर शेतकºयांकडून माल विक्रीसाठी आणला जात असताना, जिनर्सकडून कापूस खरेदीस नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव आपला माल व्यापाºयांना विक्री करावा लागत आहे.जिनर्स व व्यापाºयांचे साटेलोटेकापसाचे भाव सध्या ५८०० ते ६१०० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी जिनींगवर कापूस विक्रीसाठी गर्दी केली. मात्र, जिनर्सने खरेदी थांबवली आहे. त्यामुळे घरात कापूस असूनही खरेदीदार नसल्याने शेतकºयांवर संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत गावोगावी जाणाºया व्यापाºयांकडूनही जो माल खरेदी केला जात आहे. त्या मालाला ५५०० ते ५६०० रुपयांपर्यंतचे भाव निश्चित करण्यात आले आहेत. जिनर्स कापूस खरेदी नकार देत आहेत आणि ६१०० रुपये भाव असताना तब्बल ४०० ते ५०० रुपये कमी दराने शेतकºयांना माल विक्री करावा लागत आहे. शेतकºयांकडून ५५०० ते ५६०० रुपयांमध्ये खरेदी केलेला माल व्यापारी जिनर्सला ५८०० रुपयांपर्यंत देत आहेत. यामध्ये व्यापारी व जिनर्सला लाभ मिळत असून, शेतकºयांचे मात्र नुकसान होत आहे.शेतकºयांकडे कापूस पडलेलाचमार्च महिन्यात शेतकºयांकडील कापूस जवळ-जवळ विक्री होवून गेलेला असतो. यावर्षी मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. यंदा बºयाच शेतकºयांनी जानेवारीपर्यंत आपला माल विक्रीच केला नव्हता. फेब्रुवारी महिन्यात भाव वाढीच्या अपेक्षा भंग झाल्यानंतर बºयाच शेतकºयांनी कापूस विक्री केला. मात्र, पुन्हा भावात घसरण होवून हमीभावापेक्षाही कमी दरात कापूस खरेदी केला जात असल्याने मार्च अखेरपर्यंत भाव वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री केला नव्हता. आता भाव वाढल्यामुळे शेतकºयांकडून कापूस विक्री केला जात आहे. दरम्यान, अजून काही दिवस कापसाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.