शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पैसेवारीचा खेळ शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:15 IST

विश्लेषण- सुशील देवकर

जळगाव - जिल्ह्यात आतापर्यंत जेमतेम ६३.५ टक्केच पाऊस झालेला असताना, त्यातही पावसाने आधी १८ दिवस व नंतर २४ दिवस अशी दोन टप्प्यात दांडी मारल्याने पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम झाला असून उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही जिल्ह्याची नजर पैसेवारी ५० पैशांच्यावर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या पैसेवारीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पैसेवारी ५० पैशांच्यावर असली तर दुष्काळी योजनांचा लाभ शेतकºयांना मिळू शकत नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी, सक्तीची वसुली बंद आदी अनेक सवलतींपासून वंचित रहावे लागेल. पैसेवारी ठरविण्यासाठी प्रत्येक गावात, प्रत्येक पिकांसाठी सुमारे १२ भूखंड निवडल्या जातात. पिक पैसेवारीत बदल झाल्यास हंगामी (तात्पुरती) पैसेवारी जाहीर करण्यात येते. गावांच्या शिवारात, एकुण पेरलेल्या वा लागवडीखालील एकुण क्षेत्रफळाच्या ८० टक्क्यांपर्यंतची सर्व पिके ही पैसेवारी काढण्यास मान्य करण्यात येतात.शेतकरी कृती समितीचे एस.बी. पाटील यांनी याबाबत सांगितले की, १० मीटर ७ .१० मीटर (१ आर) असा शेतीतील चौरस भाग घेउन त्यात निघणाºया धान्याचे उत्पादन, राज्य सरकारच्या सांख्यिकी विभागाने पुरविलेल्या मागील १० वर्षाच्या त्या पिकाच्या सरासरी उत्पन्नाशी ताडुन, निघणारा निष्कर्ष म्हणजे पैसेवारी. यात हलकी, मध्यम,चांगली अशा विविध प्रकारच्या प्रकारच्या जमिनी निवडल्या जातात. पैसेवारी कशी काढावी याचे सरकारी निकष, मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यानुसार पैसेवारीत आवश्यक ती नियमानुसार चढ/घट करण्यात येते. अशा प्रकारे काढलेली पैसेवारीची सरासरी ५० पेक्षा कमी असल्यास दुष्काळ व त्यापेक्षा जास्त असल्यास सुकाळ असे समजल्या जाते. जळगाव जिल्ह्यातील ऐन वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने पिकांच्या उत्पादन क्षमतेवर विपरित परिणाम झाला आहे. पिके हिरवीगार असली तरीही त्यांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना नजर पैसेवारी मात्र ५० पैशांच्या वर कशी आली? असा सवाल शेतकरी नेते व शेतकºयांकडून केला जात आहे. आधीच कर्जमाफीच्या घोळामुळे त्रस्त व खरीप पीककर्जापासून वंचीत शेतकºयांच्या जखमेवर यामुळे मीठ चोळण्याचेच काम प्रशासनाने केले आहे.