शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

पैसेवारीचा खेळ शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:15 IST

विश्लेषण- सुशील देवकर

जळगाव - जिल्ह्यात आतापर्यंत जेमतेम ६३.५ टक्केच पाऊस झालेला असताना, त्यातही पावसाने आधी १८ दिवस व नंतर २४ दिवस अशी दोन टप्प्यात दांडी मारल्याने पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम झाला असून उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही जिल्ह्याची नजर पैसेवारी ५० पैशांच्यावर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या पैसेवारीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पैसेवारी ५० पैशांच्यावर असली तर दुष्काळी योजनांचा लाभ शेतकºयांना मिळू शकत नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी, सक्तीची वसुली बंद आदी अनेक सवलतींपासून वंचित रहावे लागेल. पैसेवारी ठरविण्यासाठी प्रत्येक गावात, प्रत्येक पिकांसाठी सुमारे १२ भूखंड निवडल्या जातात. पिक पैसेवारीत बदल झाल्यास हंगामी (तात्पुरती) पैसेवारी जाहीर करण्यात येते. गावांच्या शिवारात, एकुण पेरलेल्या वा लागवडीखालील एकुण क्षेत्रफळाच्या ८० टक्क्यांपर्यंतची सर्व पिके ही पैसेवारी काढण्यास मान्य करण्यात येतात.शेतकरी कृती समितीचे एस.बी. पाटील यांनी याबाबत सांगितले की, १० मीटर ७ .१० मीटर (१ आर) असा शेतीतील चौरस भाग घेउन त्यात निघणाºया धान्याचे उत्पादन, राज्य सरकारच्या सांख्यिकी विभागाने पुरविलेल्या मागील १० वर्षाच्या त्या पिकाच्या सरासरी उत्पन्नाशी ताडुन, निघणारा निष्कर्ष म्हणजे पैसेवारी. यात हलकी, मध्यम,चांगली अशा विविध प्रकारच्या प्रकारच्या जमिनी निवडल्या जातात. पैसेवारी कशी काढावी याचे सरकारी निकष, मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यानुसार पैसेवारीत आवश्यक ती नियमानुसार चढ/घट करण्यात येते. अशा प्रकारे काढलेली पैसेवारीची सरासरी ५० पेक्षा कमी असल्यास दुष्काळ व त्यापेक्षा जास्त असल्यास सुकाळ असे समजल्या जाते. जळगाव जिल्ह्यातील ऐन वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने पिकांच्या उत्पादन क्षमतेवर विपरित परिणाम झाला आहे. पिके हिरवीगार असली तरीही त्यांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना नजर पैसेवारी मात्र ५० पैशांच्या वर कशी आली? असा सवाल शेतकरी नेते व शेतकºयांकडून केला जात आहे. आधीच कर्जमाफीच्या घोळामुळे त्रस्त व खरीप पीककर्जापासून वंचीत शेतकºयांच्या जखमेवर यामुळे मीठ चोळण्याचेच काम प्रशासनाने केले आहे.