शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

दादरचे भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी दादरचे दर तब्बल ७०० ते ८०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी दादरचे दर तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी केल्यामुळे संतापलेला शेतकऱ्यांनी बाजार समितीमधील लिलाव प्रक्रिया बंद केली. तसेच सचिव कार्यालयामध्ये जाऊन दरवाजाचे काच फोडून तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

गेल्या १५ दिवसापासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या दादरला ३५०० ते ३ हजार रुपयांचा प्रति क्विंटल इतका भाव मिळत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दादरचे भाव तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच लिलावादरम्यान व्यापाऱ्यांकडून २२०० रुपयांपर्यंतचे दर दिले जात आहे. त्यातच व्यापाऱ्यांकडून दादरीवर दोन किलोची कट्टी देखील लावली जात आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास असोदा, भादली व कडगाव या भागातील शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला असताना व्यापाऱ्यांनी अचानक भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच खासगी बाजारात दादरला चांगला भाव असतानादेखील अचानकपणे भाव कमी केल्याने शेतकरी व व्यापारामध्ये काही काळ वाद निर्माण झाला.

दादर विक्री न करण्याचा निर्णय

दादरला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. तसेच जोपर्यंत योग्य भाव मिळणार नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासना विरोधात देखील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

सचिव कार्यालयाची केली तोडफोड

एक तास बाजार समितीच्या आवारात गोंधळ घालून देखील व लिलाव बंद पाडून देखील शेतकऱ्यांची कोणत्याही संचालकांनी दखल न घेतल्याने. संतप्त शेतकऱ्यांनी थेट सचिव कार्यालयात जाऊन दरवाजाची व इतर साहित्याची तोडफोड केली. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून समिती प्रशासनाने तात्काळ पोलीस प्रशासनाला याबाबतची सूचना दिली.

शेतकऱ्यांना अटक व सुटका

बाजार समिती प्रशासनाने पोलीस प्रशासनाला सूचना दिल्यानंतर काही काळातच एमआयडीसी पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून याबाबत कुठलीही फिर्याद किंवा तक्रार न दिल्याने शेतकऱ्यांना तात्काळ सोडण्यात आले.

व्यापाऱ्यांकडून मनमानी कारभार

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने धान्याचे भाव कमी व जास्त केले जात असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला. तसेच या व्यापाऱ्यांना बाजार समितीमधील संचालक मंडळाचा देखील पाठिंबा मिळत असल्याचाही आरोप केला. वाद वाढत असल्याने दुपारी ४ वाजता शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनासोबत बैठक घेतली. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने दुपारीही लिलाव बंद ठेवला. यावेळी असोदा येथील किशोर चौधरी, पंकज चौधरी, भादली ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद चौधरी व भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख गोपाल भंगाळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

कोट..

कोणतीही सूचना न देता जर भाव कमी केले जात असतील, किंवा शेतकऱ्यांच्या माल घेण्यास टाळाटाळ केली जात असेल तर अशा व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल.

-कैलास चौधरी, सभापती