शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दादरचे भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी दादरचे दर तब्बल ७०० ते ८०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी दादरचे दर तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी केल्यामुळे संतापलेला शेतकऱ्यांनी बाजार समितीमधील लिलाव प्रक्रिया बंद केली. तसेच सचिव कार्यालयामध्ये जाऊन दरवाजाचे काच फोडून तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

गेल्या १५ दिवसापासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या दादरला ३५०० ते ३ हजार रुपयांचा प्रति क्विंटल इतका भाव मिळत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दादरचे भाव तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच लिलावादरम्यान व्यापाऱ्यांकडून २२०० रुपयांपर्यंतचे दर दिले जात आहे. त्यातच व्यापाऱ्यांकडून दादरीवर दोन किलोची कट्टी देखील लावली जात आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास असोदा, भादली व कडगाव या भागातील शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला असताना व्यापाऱ्यांनी अचानक भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच खासगी बाजारात दादरला चांगला भाव असतानादेखील अचानकपणे भाव कमी केल्याने शेतकरी व व्यापारामध्ये काही काळ वाद निर्माण झाला.

दादर विक्री न करण्याचा निर्णय

दादरला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. तसेच जोपर्यंत योग्य भाव मिळणार नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासना विरोधात देखील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

सचिव कार्यालयाची केली तोडफोड

एक तास बाजार समितीच्या आवारात गोंधळ घालून देखील व लिलाव बंद पाडून देखील शेतकऱ्यांची कोणत्याही संचालकांनी दखल न घेतल्याने. संतप्त शेतकऱ्यांनी थेट सचिव कार्यालयात जाऊन दरवाजाची व इतर साहित्याची तोडफोड केली. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून समिती प्रशासनाने तात्काळ पोलीस प्रशासनाला याबाबतची सूचना दिली.

शेतकऱ्यांना अटक व सुटका

बाजार समिती प्रशासनाने पोलीस प्रशासनाला सूचना दिल्यानंतर काही काळातच एमआयडीसी पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून याबाबत कुठलीही फिर्याद किंवा तक्रार न दिल्याने शेतकऱ्यांना तात्काळ सोडण्यात आले.

व्यापाऱ्यांकडून मनमानी कारभार

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने धान्याचे भाव कमी व जास्त केले जात असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला. तसेच या व्यापाऱ्यांना बाजार समितीमधील संचालक मंडळाचा देखील पाठिंबा मिळत असल्याचाही आरोप केला. वाद वाढत असल्याने दुपारी ४ वाजता शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनासोबत बैठक घेतली. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने दुपारीही लिलाव बंद ठेवला. यावेळी असोदा येथील किशोर चौधरी, पंकज चौधरी, भादली ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद चौधरी व भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख गोपाल भंगाळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

कोट..

कोणतीही सूचना न देता जर भाव कमी केले जात असतील, किंवा शेतकऱ्यांच्या माल घेण्यास टाळाटाळ केली जात असेल तर अशा व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल.

-कैलास चौधरी, सभापती