शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

दादरचे भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी दादरचे दर तब्बल ७०० ते ८०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी दादरचे दर तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी केल्यामुळे संतापलेला शेतकऱ्यांनी बाजार समितीमधील लिलाव प्रक्रिया बंद केली. तसेच सचिव कार्यालयामध्ये जाऊन दरवाजाचे काच फोडून तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

गेल्या १५ दिवसापासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या दादरला ३५०० ते ३ हजार रुपयांचा प्रति क्विंटल इतका भाव मिळत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दादरचे भाव तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच लिलावादरम्यान व्यापाऱ्यांकडून २२०० रुपयांपर्यंतचे दर दिले जात आहे. त्यातच व्यापाऱ्यांकडून दादरीवर दोन किलोची कट्टी देखील लावली जात आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास असोदा, भादली व कडगाव या भागातील शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला असताना व्यापाऱ्यांनी अचानक भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच खासगी बाजारात दादरला चांगला भाव असतानादेखील अचानकपणे भाव कमी केल्याने शेतकरी व व्यापारामध्ये काही काळ वाद निर्माण झाला.

दादर विक्री न करण्याचा निर्णय

दादरला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. तसेच जोपर्यंत योग्य भाव मिळणार नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासना विरोधात देखील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

सचिव कार्यालयाची केली तोडफोड

एक तास बाजार समितीच्या आवारात गोंधळ घालून देखील व लिलाव बंद पाडून देखील शेतकऱ्यांची कोणत्याही संचालकांनी दखल न घेतल्याने. संतप्त शेतकऱ्यांनी थेट सचिव कार्यालयात जाऊन दरवाजाची व इतर साहित्याची तोडफोड केली. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून समिती प्रशासनाने तात्काळ पोलीस प्रशासनाला याबाबतची सूचना दिली.

शेतकऱ्यांना अटक व सुटका

बाजार समिती प्रशासनाने पोलीस प्रशासनाला सूचना दिल्यानंतर काही काळातच एमआयडीसी पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून याबाबत कुठलीही फिर्याद किंवा तक्रार न दिल्याने शेतकऱ्यांना तात्काळ सोडण्यात आले.

व्यापाऱ्यांकडून मनमानी कारभार

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने धान्याचे भाव कमी व जास्त केले जात असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला. तसेच या व्यापाऱ्यांना बाजार समितीमधील संचालक मंडळाचा देखील पाठिंबा मिळत असल्याचाही आरोप केला. वाद वाढत असल्याने दुपारी ४ वाजता शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनासोबत बैठक घेतली. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने दुपारीही लिलाव बंद ठेवला. यावेळी असोदा येथील किशोर चौधरी, पंकज चौधरी, भादली ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद चौधरी व भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख गोपाल भंगाळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

कोट..

कोणतीही सूचना न देता जर भाव कमी केले जात असतील, किंवा शेतकऱ्यांच्या माल घेण्यास टाळाटाळ केली जात असेल तर अशा व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल.

-कैलास चौधरी, सभापती