शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

दादरचे भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी दादरचे दर तब्बल ७०० ते ८०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी दादरचे दर तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी केल्यामुळे संतापलेला शेतकऱ्यांनी बाजार समितीमधील लिलाव प्रक्रिया बंद केली. तसेच सचिव कार्यालयामध्ये जाऊन दरवाजाचे काच फोडून तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

गेल्या १५ दिवसापासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या दादरला ३५०० ते ३ हजार रुपयांचा प्रति क्विंटल इतका भाव मिळत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दादरचे भाव तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच लिलावादरम्यान व्यापाऱ्यांकडून २२०० रुपयांपर्यंतचे दर दिले जात आहे. त्यातच व्यापाऱ्यांकडून दादरीवर दोन किलोची कट्टी देखील लावली जात आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास असोदा, भादली व कडगाव या भागातील शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला असताना व्यापाऱ्यांनी अचानक भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच खासगी बाजारात दादरला चांगला भाव असतानादेखील अचानकपणे भाव कमी केल्याने शेतकरी व व्यापारामध्ये काही काळ वाद निर्माण झाला.

दादर विक्री न करण्याचा निर्णय

दादरला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. तसेच जोपर्यंत योग्य भाव मिळणार नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासना विरोधात देखील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

सचिव कार्यालयाची केली तोडफोड

एक तास बाजार समितीच्या आवारात गोंधळ घालून देखील व लिलाव बंद पाडून देखील शेतकऱ्यांची कोणत्याही संचालकांनी दखल न घेतल्याने. संतप्त शेतकऱ्यांनी थेट सचिव कार्यालयात जाऊन दरवाजाची व इतर साहित्याची तोडफोड केली. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून समिती प्रशासनाने तात्काळ पोलीस प्रशासनाला याबाबतची सूचना दिली.

शेतकऱ्यांना अटक व सुटका

बाजार समिती प्रशासनाने पोलीस प्रशासनाला सूचना दिल्यानंतर काही काळातच एमआयडीसी पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून याबाबत कुठलीही फिर्याद किंवा तक्रार न दिल्याने शेतकऱ्यांना तात्काळ सोडण्यात आले.

व्यापाऱ्यांकडून मनमानी कारभार

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने धान्याचे भाव कमी व जास्त केले जात असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला. तसेच या व्यापाऱ्यांना बाजार समितीमधील संचालक मंडळाचा देखील पाठिंबा मिळत असल्याचाही आरोप केला. वाद वाढत असल्याने दुपारी ४ वाजता शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनासोबत बैठक घेतली. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने दुपारीही लिलाव बंद ठेवला. यावेळी असोदा येथील किशोर चौधरी, पंकज चौधरी, भादली ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद चौधरी व भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख गोपाल भंगाळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

कोट..

कोणतीही सूचना न देता जर भाव कमी केले जात असतील, किंवा शेतकऱ्यांच्या माल घेण्यास टाळाटाळ केली जात असेल तर अशा व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल.

-कैलास चौधरी, सभापती