शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
3
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
4
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
5
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
6
Stock Market Today: शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex मध्ये ५०० अंकांची तेजी; Nifty २६ हजारांच्या पार
7
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
9
"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक
10
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
11
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
12
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
14
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
15
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
16
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
19
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास

पालकमंत्र्यांनी व्यथा जाणून न घेतल्याने शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 17:44 IST

जळगाव जिल्ह्यातील गिरणा परिसरातील दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आलेल्या महसूल आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी तांदुळवाडी ता. भडगाव परिसरात पाहणी करतांना केवळ अधिकाºयांशी चर्चा केली. शेतकºयांच्या व्यथा त्यांनी जाणून न घेतल्याने नाराज शेतकºयांनी संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा गिरणा परिसरात दुष्काळ पाहणी दौरामंत्र्यांसोबत अधिकाºयांचा होता मोठा लवाजमा मळगाव पाटचारी पूर्ण करण्याबाबत शेतकºयांनी दिले निवेदन

कजगाव ता.भडगाव : महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेत शिवारात भेट देत पीक परिस्थितीची पाहणी केली. या प्रसंगी अधिकाºयांचा मोठा लवाजमा त्यांच्या सोबत होता. शेतकºयांची मोठी गर्दी देखील या वेळी झाली होती. तथापि मंत्र्यांनी या पाहणी दौºयात फक्त अधिकाºयांशी चर्चा केली, मात्र नापिकी आणि दुष्काळाला तोंड देत असलेल्या शेतकºयांचे मनोगत वा प्रतिक्रीया जाणून न घेतल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत होत्या.पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे चाळीसगाव, भडगाव, व पाचोरा या तीन तालुक्यातील दुष्काळी स्थितीच्या पाहणी दौºयावर आले असता भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील एका कापूस लावलेल्या शेताची पाहणी त्यांनी केली. या प्रसंगी जिल्ह्यातील अधिकाºयांचा मोठा लवाजमा त्यांच्यासोबत होता.अधिकाºयांकडून दुष्काळी स्थितीची सर्व माहिती जाणून घेत त्यांनी काही सूचना अधिकाºयांना दिल्यात मात्र उपस्थित शेकडो शेतकºयांशी कोणतीही चर्चा केली नाही, किंवा त्यांचे मत जाणून न घेतल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त झाला.मळगाव चारीचे दिले निवेदनबारा वर्षापूर्वी सुरू झालेल्या मळगाव पाटचारीचे काम अर्धवट झाले आहे या कामावर निधी देखील खर्च झालेला आहे. अनेक शेतकºयांच्या जमिनी यात गेल्या आहेत. मंजूर पाट चारीवर बराच निधी खर्च झालेला आहे. तथापि शेतकºयांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या या पाटचारीचे काम अचानक थांबविण्यात आले. एवढेच नव्हे तर सदर पाटचारीची फाईलच बंद करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र ती का बंद करण्यात आली याचा कोणताही खुलासा आजपर्यंत झालेला नाही. या पाटचारीचे काम पूर्ण झाले असते तर चाळीसगाव, भडगाव, आणि पाचोरा या तीन तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असता. त्याचबरोबर शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले असते. बागायत क्षेत्र वाढले असते. या मुळे सदर पाटचारीचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तांदुळवाडीचे माजी सरपंच सुभाष पाटील, पिंप्री येथील सरपंच पती शांताराम पाटील, कजगावचे सरपंच पती दिनेश पाटील, घुसर्डी सरपंच, हिंगोणे सीमचे सरपंच ज्ञानेश्वर महाजन व परिसरातील ग्रामस्थांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. या बाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश अधिकाºयांना त्यांनी दिले.पालकमंत्र्याची केवळ अधिकाºयांशी चर्चादुष्काळाच्या पाहणी दौºयावर आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केवळ अधिकाºयांशी चर्चा केली. शेतकºयांशी चर्चा न करताच दहा मिनिटात पाहणी दौरा आटोपून ते पुढे मार्गस्थ झाल्याने उपस्थित शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. यात हिंगोणेसीम ता.चाळीसगाव येथील सरपंच ज्ञानेश्वर महाजन, तांदुळवाडीचे माजी सरपंच सुभाष पाटील, बेलगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील यांनी शेतकºयांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

टॅग्स :ministerमंत्री