शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तूर उत्पादकांच्या पदरी यंदाही निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:28 IST

70 टक्के माल विक्रीनंतर खरेदी केंद्र

ठळक मुद्देहमी भावातून खर्चही निघणार नसल्याची शेत-यांची व्यथाअस्मानी संकटापाठोपाठ सरकारकडूनही चेष्टा

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 4 -  उशिरा लागवड व किडींचा प्रादुर्भाव यासह विविध कारणांमुळे  आधीच कमी उत्पादन आलेल्या तुरीला यंदाही अपेक्षित हमी भाव न मिळाल्याने शेतक:यांची निराशा झाली आहे. त्यात जवळपास 70 टक्के माल शेतक:यांनी व्यापा:यांना विक्री केल्यानंतर शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होत असल्याने सरकारचे ‘वराती मागून घोडे’ असल्याचा आरोप शेतक:यांमधून होत आहे. 

अस्मानी संकटापाठोपाठ सरकारकडूनही चेष्टाउशिरा आलेल्या पावसामुळे मुळातच तुरीची लागवड उशिरा झाली. त्यात वातावरणाच्या परिणामामुळे  किडींचा प्रादुर्भाव अशा कारणांमुळे तुरीच्या उत्पादनात घट आली. लागवड क्षेत्रातून अपेक्षित उत्पादनापैकी यंदा 25 टक्केही तुरीचे उत्पन्न हाती आले नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे.  या अस्मानी संकटांचा सामना करावा लागत असताना सरकारने जो हमी भाव जाहीर केला त्यात उत्पादन खर्चही निघणार नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी 5400 रुपये प्रति क्विंटल भाव सरकारने दिला. त्यात यंदा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असताना किमान 7500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळणे अपेक्षित होते, मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ 50 रुपयांची भर टाकून 5450 रुपये भाव देऊन शेतक:यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केल्याचा आरोप शेतकरी किशोक चौधरी यांनी केला आहे. 

खरेदी केंद्रांची प्रतीक्षाच2017-18 या हंगामासाठी तुरीची खरेदी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 9 खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी 2 रोजी अमळनेर येथील एकमेव केंद्रावर खरेदी सुरू झाली. शेतक:यांच्या मालाला भाव व बाजारपेठ मिळावी म्हणून खरेदी केंद्र सुरू करण्यात येत असले तरी ते वेळेवर व हमी भाव देणारे नसल्याने शेतक:यांची परवडच होत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे.  व्यापा:यांकडे विक्रीला पसंतीशासकीय तूर खरेदी केंद्रावर मालघेवूनगेल्यानंतर तेथे ‘एफक्यू’ दर्जाचाच माल पाहिजे, असा आग्रह असतो. परिणामी शेतक:यांची मोठी अडचण होते. यामुळे गेल्या वर्षी शेतक:यांनी चाळणीचा खर्च स्वत: करीत तूर विक्री केली. त्यामुळे यंदा तूर खरेदी केंद्रावर यांत्रिक चाळणी उपलब्ध करण्याची मागणी शेतक:यांची आहे. 

यंदा तुरीचे उत्पादन घटलेअसून हमी भावातून उत्पादन खर्चही निघणार नाही. किमान 7500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळण्याची अपेक्षा होती. हाती पैसा नसल्याने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वीच शेतक:यांनी 70 टक्के तूर शेतक:यांनी विक्री केली आहे.- किशोर चौधरी, शेतकरी तथा अध्यक्ष नवनिर्मिती शेतकरी मंडल असोदा