शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

तूर उत्पादकांच्या पदरी यंदाही निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:28 IST

70 टक्के माल विक्रीनंतर खरेदी केंद्र

ठळक मुद्देहमी भावातून खर्चही निघणार नसल्याची शेत-यांची व्यथाअस्मानी संकटापाठोपाठ सरकारकडूनही चेष्टा

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 4 -  उशिरा लागवड व किडींचा प्रादुर्भाव यासह विविध कारणांमुळे  आधीच कमी उत्पादन आलेल्या तुरीला यंदाही अपेक्षित हमी भाव न मिळाल्याने शेतक:यांची निराशा झाली आहे. त्यात जवळपास 70 टक्के माल शेतक:यांनी व्यापा:यांना विक्री केल्यानंतर शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होत असल्याने सरकारचे ‘वराती मागून घोडे’ असल्याचा आरोप शेतक:यांमधून होत आहे. 

अस्मानी संकटापाठोपाठ सरकारकडूनही चेष्टाउशिरा आलेल्या पावसामुळे मुळातच तुरीची लागवड उशिरा झाली. त्यात वातावरणाच्या परिणामामुळे  किडींचा प्रादुर्भाव अशा कारणांमुळे तुरीच्या उत्पादनात घट आली. लागवड क्षेत्रातून अपेक्षित उत्पादनापैकी यंदा 25 टक्केही तुरीचे उत्पन्न हाती आले नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे.  या अस्मानी संकटांचा सामना करावा लागत असताना सरकारने जो हमी भाव जाहीर केला त्यात उत्पादन खर्चही निघणार नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी 5400 रुपये प्रति क्विंटल भाव सरकारने दिला. त्यात यंदा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असताना किमान 7500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळणे अपेक्षित होते, मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ 50 रुपयांची भर टाकून 5450 रुपये भाव देऊन शेतक:यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केल्याचा आरोप शेतकरी किशोक चौधरी यांनी केला आहे. 

खरेदी केंद्रांची प्रतीक्षाच2017-18 या हंगामासाठी तुरीची खरेदी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 9 खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी 2 रोजी अमळनेर येथील एकमेव केंद्रावर खरेदी सुरू झाली. शेतक:यांच्या मालाला भाव व बाजारपेठ मिळावी म्हणून खरेदी केंद्र सुरू करण्यात येत असले तरी ते वेळेवर व हमी भाव देणारे नसल्याने शेतक:यांची परवडच होत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे.  व्यापा:यांकडे विक्रीला पसंतीशासकीय तूर खरेदी केंद्रावर मालघेवूनगेल्यानंतर तेथे ‘एफक्यू’ दर्जाचाच माल पाहिजे, असा आग्रह असतो. परिणामी शेतक:यांची मोठी अडचण होते. यामुळे गेल्या वर्षी शेतक:यांनी चाळणीचा खर्च स्वत: करीत तूर विक्री केली. त्यामुळे यंदा तूर खरेदी केंद्रावर यांत्रिक चाळणी उपलब्ध करण्याची मागणी शेतक:यांची आहे. 

यंदा तुरीचे उत्पादन घटलेअसून हमी भावातून उत्पादन खर्चही निघणार नाही. किमान 7500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळण्याची अपेक्षा होती. हाती पैसा नसल्याने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वीच शेतक:यांनी 70 टक्के तूर शेतक:यांनी विक्री केली आहे.- किशोर चौधरी, शेतकरी तथा अध्यक्ष नवनिर्मिती शेतकरी मंडल असोदा