शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात रामफळांनी म्हटले, हे राम..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 15:40 IST

वातावरणाचा फटका : दिवसेंदिवस दुर्मीळ रामफळांचा गोडवा हरवतोय

खेडगाव ता. भडगाव : आज रामनवमी..राम जन्मोत्सवाच्या काळात पिकतं... त्याचा गोडवा चाखावयास मिळतो म्हणुन प्रभुरामचंद्रांचे नाव धारण करणारे रामफळ. रणरणत्या उन्हात, रुक्ष वातावणात या फळाचा स्वाद अवीट असाच. मात्र दुष्काळी परिस्थितीचा व रोगट हवामानाचा फटका या फळालाही बसला असून हे फळ सध्या अत्यल्प दिसत आहे.विविध जीवनसत्वांनी युक्ततपकीरी, केशरी रंगाचे हे फळ आकर्षक असेच.अ,ब,क, जी वनसत्वे पोटॅशिअम ,मँग्नेशिअम युक्त. मधुमेह,कर्करोग प्रतिबंधक, पचन सुधारक म्हणुन आरोग्यदायी फळ. रामफळाची बाग तशी दुर्मीळच.वाडवडिलांनी शेताच्या बांधावर वाढीस लावलेली रामफळांची झाडे हेच काय त्यांचे अस्तित्व. मात्र एक-दोन सालागणिक येणाऱ्या दुष्काळाने रामफळेही संकटात सापडले आहेत. हवामान बदलाने यावर्षी कडुनिंबावर आळी पडली.रामफळालाही या बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे.रागफळांची अनेकझाडे वाळलीशिशीरात पाने झडणे,वसंत ऋतुत पालवी फुटणे या निसर्ग सुलभ प्रक्रियेत बाधा येत,यंदा फळ पोसले नाही.ऐन फळ पक्व होण्याच्या काळात झाडावर पालवी नाही.त्यामुळे आहे ती रामफळे उन्हात काळी पडलीत. कमी पाऊस राहीलेल्या भागात ही झाडे वाळली आहेत. पाणी मुबलक असलेल्या ठिकाणची रामफळे निघत असली तरी तापमानामुळे या फळाची गोडी व चव देखील काहीशी बदलल्याचे शेतकरी सांगतात.