शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

पुराच्या पाण्यात मोलमजुरी करणाऱ्या सुनील शिंदे यांच्या कुटुंबाचा संसार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST

चाळीसगाव : अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे तितूर नदीकाठाजवळ असलेल्या अनेक घरांची पडझड होऊन संसारोपयोगी वस्तू, साहित्य, कपडे, अन्नधान्य व ...

चाळीसगाव : अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे तितूर नदीकाठाजवळ असलेल्या अनेक घरांची पडझड होऊन संसारोपयोगी वस्तू, साहित्य, कपडे, अन्नधान्य व इतर महत्त्वाच्या वस्तू पुरात वाहून गेल्या आहेत. एवढ्या कष्टाने उभा केलेला संसार डोळ्यांदेखत नेस्तनाबूत झाला. अशा भयानक स्थितीत चाळीसगाव शहरातील जहागीरदार वाडीतील मोलमजुरी करणाऱ्या एका कारागिराचे या पुरात घरातील सर्व साहित्य, समान वाहून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. आता उदरनिर्वाहाबरोबरच निवाऱ्याचे काय, असा प्रश्न या कुटुंबाला सतावत आहे.

बामोशीबाबा दर्गाच्या पाठीमागे असलेल्या जहागीरदार वाडीत राहणारे सुनील सुरेश शिंदे हे बांधकाम व्यवसायात मजुरीचे काम करतात. त्यांना तीन मुली असून त्या शिक्षण घेत आहेत. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच आहेत. घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, ते आता निराधार झाले आहेत. त्यात ही परिस्थिती त्यांच्यापुढे उद्भवली आहे. आता हातावर पोट असलेल्या या कुटुंबाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या मंगळवारी रात्री झालेल्या अतिवृष्टी व तितूर-डोंगरी नदीला आलेल्या पुरामुळे सुनील सुरेश शिंदे यांच्या घरात पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अचानकपणे डोक्यापर्यंत पाणी घुसले. या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने जीव वाचवण्यासाठी हे कुटुंब घराबाहेर पडले. पूर ओसरल्यानंतर घराची अवस्था पाहून घरात जाण्याची त्यांच्यात हिंमत होत नव्हती. घरातील संसारोपयोगी वस्तू, साहित्य, कपडे, अन्नधान्य पाण्यात वाहून गेले. घरात पाणी, चिखल साचल्याची अवस्था पाहून सुनील शिंदे व कुटुंबाला अश्रू अनावर झाले.

जीव वाचला, अंगावरच्या कपड्यांनिशी बाहेर पडलेल्यांकडे आता दैनंदिन आयुष्यात आवश्यक असणाऱ्या कोणत्याही जीवनावश्यक गोष्टी नाहीत. अशी परिस्थिती प्रत्यक्षात पहायला मिळाली. स्वतःचा निवारा हरवलेला असताना आपण मोठ्या संकटात सापडल्याने एकटेपण त्यांच्यात जाणवत होते.

मदतीच्या ओघामुळे जेवायची चिंता नसली तरी आता जीवनावश्यक वस्तूंसह निवाऱ्याची चिंता त्यांच्यासह अनेकांना भेडसावते आहे. या पुराने आपण निराधार झालो आहोत, असे त्यांना वाटू लागले आहेत.

या घटनेतून झळ बसलेल्या शिंदे कुटुंबाबरोबरच इतर लोक कसे सावरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजंदारीवर मोलमजुरीवर काम करणाऱ्या या कुटुंबावर मोठी भयावह परिस्थिती आली असून, आमच्यावर आभाळ कोसळले आहे, असे ते म्हणतात.

060921\06jal_11_06092021_12.jpg

पुराच्या पाण्यात मोलमजुरी करणाऱ्या सुनिल शिंदे यांच्या कुटुंबाचा संसार रस्त्यावर