शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
3
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
4
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
5
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
6
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
7
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
8
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
9
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
10
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
11
शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
12
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
13
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
14
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
15
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
16
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
17
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
19
Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
20
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!

स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवणारे फैजपूर काँग्रेस ग्रामीण अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 19:20 IST

फैजपूर येथे भरलेले पहिले काँग्रेसचे ग्रामीण अधिवेशन हे स्वातंत्र्यपूर्व काळातील अधिवेशन होते व या अधिवेशनातच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ होऊन त्यासाठी योजना आखण्यात आली व ती १९४२ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खºया अर्थाने पूर्णत्वास आली. त्यामुळे फैजपूर अधिवेशनाला एक वेगळेच महत्व प्राप्त आहे व स्वातंत्र्य चळवळीत फैजपूरचे असलेले योगदान कोणी विसरू शकणार नाही.

ठळक मुद्देहे अधिवेशन युवा पिढीसाठी प्रेरणा देणारेदौºयाची सर्वस्वी जबाबदारी धनाजी नानांनी स्वीकारलेली होती

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथे १९३६ मध्ये भरलेले पहिले काँग्रेसचे ग्रामीण अधिवेशन हे स्वातंत्र्यपूर्व काळातील अधिवेशन होते व या अधिवेशनातच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ होऊन त्यासाठी योजना आखण्यात आली व ती १९४२ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खºया अर्थाने पूर्णत्वास आली. त्यामुळे फैजपूर अधिवेशनाला एक वेगळेच महत्व प्राप्त आहे व स्वातंत्र्य चळवळीत फैजपूरचे असलेले योगदान कोणी विसरू शकणार नाही हे अधिवेशन युवा पिढीसाठी प्रेरणा देणारे आहे.या अधिवेशनात परिसरातील जेवढ्या स्वयंसेवकांनी कार्य केले होते त्या सर्वांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिले आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व सर्वत्र प्रभाव गाजवत होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाने सारा भारत स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देण्यास तयार होता. खान्देशातही चळवळ जोर धरू लागली होती. त्यातच धनाजी नाना चौधरी यांनी १९३० च्या कायदेभंग चळवळीत आपल्या फौजदारकीची नोकरी सोडून राष्ट्रसेवेस वाहून घ्यायची प्रतिज्ञा केली होती. त्यांनी खिरोदा गावी स्वराज्य आश्रम स्थापन केला. त्याद्वारे गांधी विचारांचा त्यांनी प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात गावोगावी केला. याच दरम्यान या स्वराज्य आश्रमातील अनेक स्त्री-पुरुषांना इंग्रज सरकारने पकडून कारावास दिला. ही घटना १९३२ मध्ये घडली. या कारावासात पत्करलेल्या स्वातंत्र्यसैनिकात अग्रेसर धनाजी नाना व त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांचाही सहभाग होता. याबद्दल सर्वत्र खान्देशात धनाजी नानांचे नाव चर्चेत राहिल.ेपुणे येथे महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे कार्यकारी मंडळ व महाराष्ट्रातील प्रमुख प्रमुख कार्यकर्त्यांची २२ मे १९३६ ला बैठक पार पडली. त्यात शंकरराव देव यांनी खास करून खान्देशातील प्रभावी नेतृत्व म्हणून धनाजी नाना चौधरी यांची ओळख करून दिली. याच बैठकीत पुढील राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खेड्यात की शहरात यावर मोठी चर्चा झाली. खेड्यात अधिवेशन घेण्यासंदर्भात समर्थन प्राप्त झाले. त्यात जळगाव जिल्हा व सातारा या प्रमुख प्रांत आघाडीवर होते. त्यात जळगावकडे झुकते माप पडले कारण त्यापूर्वी १९३५ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व शंकरराव देव यांनी खान्देश दौरा केला असता फैजपूर येथे भव्य सभेचे आयोजन यावल, रावेर परिसरातील गावोगावी झालेले स्वागत तसेच देशभक्तीने भारलेले कार्यकर्ते पाहून हे दोन्ही नेते प्रभावित झाले होते. या दौºयाची सर्वस्वी जबाबदारी धनाजी नानांनी स्वीकारलेली होती.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण पहिले अधिवेशन फैजपूर येथे का भरले याबद्दल अण्णासाहेब दास्ताने यांनी हरिजन, या नियतकालिकात म्हटले, आमच्या धनाजी नानांचा त्याग अपूर्व आहे. त्यामुळे अधिवेशन फैजपूरला घेण्याची भाग्यरेषा ठळक झाली. २७, २८ व २९ डिसेंबर १९३६ रोजी अधिवेशन निश्चित झाले. शंकरराव देव स्वागत स्वागताध्यक्ष तर धनाजी नाना चौधरी यांची सरचिटणीस पदासाठी निवड करण्यात आली. याच अधिवेशनातून स्वराज्याची मागणी जोर धरू लागली. या अधिवेशनात अनेकांनी सहभाग नोंदवून फैजपूरचे नाव भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात अजरामर केले आहे. यामुळे हे अधिवेशन चिरस्मरणात राहते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनFaizpurफैजपूर