शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मोक्याच्या जागांवर डोळा

By admin | Updated: August 1, 2014 15:28 IST

शहरातील मालमत्तांचे भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळेच मालमत्ता बळकावण्याचे किंवा जबरदस्तीने घर रिकामे करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत.

जळगाव : शहरातील मालमत्तांचे भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळेच मालमत्ता बळकावण्याचे किंवा जबरदस्तीने घर रिकामे करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. नुकत्याच नवीपेठेत अविनाश लाँड्रीचा दुकानातील सामान रातोरात हलवून ताबा घेतल्याच्या प्रकारानंतर हा विषय अधिकच चर्चेत आला आहे. मुंबई, पुण्याच्या पाठोपाठ जळगावातील मालमत्तांचे भाव असल्याने या महानगरांप्रमाणेच जळगावातही मालमत्ता हडप करणारे अनेक लहान-मोठे रॅकेट कार्यरत आहेत. मोक्याची जागा हेरून ती साम, दाम, दंड, भेद याचा वापर करीत हस्तगत करण्याचे उद्योग सुरू असतात. रेल्वे स्टेशनजवळ सेवाश्रम लॉजच्या मागील बाजूला असलेल्या एका इमारतीतील भाडेकरूंना अतिक्रमण विभागातील काही अधिकार्‍यांना हाताशी धरून अतिक्रमण तोडण्याबाबतच्या नोटीस बजावून धमकाविण्याचे व नंतर सोयीस्करपणे तडजोडीसाठी मार्ग सुचविण्याचा प्रकार घडला. दाणाबाजारात मूळ मालकाकडून मालमत्ता घेऊन त्याला दुसरी जागा देण्याचे आश्‍वासन देऊन नंतर फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. तर भवानीपेठेतही असाच फसवणूक करून व दमदाटी करून जागेचा ताबा घेतल्याचा प्रकार घडला आहे. नवीपेठेतही एका इमारतीतील भाडेकरूंना असाच त्रास देऊन जागा खाली करून घेण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही फारसा उपयोग होत नाही. कारण या रॅकेटमध्ये राजकीय क्षेत्रातील तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळी असल्याने पोलिसांना 'मॅनेज' करण्यातही ते तरबेज आहेत. तर न्यायालयात दाद मागितली तर हे विषय दिवाणी प्रकारात मोडतात. दिवाणी दावे वर्षानुवर्ष चालत असल्याने सर्वसामान्य माणसाला त्यामुळे कुठे दाद मागावी? असा प्रश्न पडतो. त्यामुळे मुला-बाळांच्या सुरक्षेचा विचार करीत जागेवर पाणी सोडावे लागते. केवळ इमारती किंवा घरच नव्हे तर रिकामे प्लॉटही अशाच प्रकारचे हातखंडे वापरून बळकावले जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

अशी आहे मॉडस ऑपरेंडी 

■ रिकामा प्लॉट मोक्याच्या जागी असेल व मालक तो प्लॉट विकण्यास तयार नसेल तर सरळ त्या मालकाच्या नावाने दुसराच व्यक्ती उभा करून बोगस खरेदी-विक्री केली जाते. त्यानंतर मूळ मालकाला ही बाब लक्षात आली तरीही न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो. त्यात अनेक वर्ष लागतात. त्यामुळे मूळ मालक त्रस्त होऊन मिळेल त्या रक्कमेवर तडजोड करून मोकळा होतो.■ जुनी इमारत असली की त्यातील भाडेकरूही ४0-५0 वर्ष जुने असतात. मूळ मालकाजवळ त्यांना पैसे देऊन इमारत रिकामी करून घेण्याची क्षमता नसते. त्यामुळे बहुतांश वेळा मूळ मालक अशी इमारत भाडेकरू असतानाच अशा रॅकेटला विकून टाकतो. ते भाडेकरूंना आमिष दाखवून जागा खाली करून घेतात. जे भाडेकरून आमिषाला बळी पडत नाहीत, त्यांना त्रास देणे सुरू होते. कधी त्या कुटुंबातील महिला, मुलींच्या मागे गुंड पाठवून घाबरविण्याचे प्रकार केले जातात. तर कधी इमारतीत जिन्याच्या आजूबाजूला २४ तास गुंड बसविले जातात. तेथेच त्यांचे दारू पिणे, पत्ते खेळण्याचे उद्योग चालतात. जिन्याचे नुकसान करून खिळखिळा केला जातो. या त्रासाला कंटाळून अखेर उर्वरित भाडेकरूही जागा खाली करून देतात. ■ तर एखादी मोक्याच्या जागेवरील मालमत्ता आवडली परंतु मूळ मालक ती विकायला तयार नसला तर त्याच्या जवळच्या व्यक्तींना हाताशी धरून आमिष दाखविले जाते. तरीही न ऐकल्यास जागा मालक कोणत्या गोष्टीला घाबरतो? कमकुवत बाजू कोणती? याची माहिती काढून त्यानुसार घाबरविले जाते.