शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मोक्याच्या जागांवर डोळा

By admin | Updated: August 1, 2014 15:28 IST

शहरातील मालमत्तांचे भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळेच मालमत्ता बळकावण्याचे किंवा जबरदस्तीने घर रिकामे करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत.

जळगाव : शहरातील मालमत्तांचे भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळेच मालमत्ता बळकावण्याचे किंवा जबरदस्तीने घर रिकामे करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. नुकत्याच नवीपेठेत अविनाश लाँड्रीचा दुकानातील सामान रातोरात हलवून ताबा घेतल्याच्या प्रकारानंतर हा विषय अधिकच चर्चेत आला आहे. मुंबई, पुण्याच्या पाठोपाठ जळगावातील मालमत्तांचे भाव असल्याने या महानगरांप्रमाणेच जळगावातही मालमत्ता हडप करणारे अनेक लहान-मोठे रॅकेट कार्यरत आहेत. मोक्याची जागा हेरून ती साम, दाम, दंड, भेद याचा वापर करीत हस्तगत करण्याचे उद्योग सुरू असतात. रेल्वे स्टेशनजवळ सेवाश्रम लॉजच्या मागील बाजूला असलेल्या एका इमारतीतील भाडेकरूंना अतिक्रमण विभागातील काही अधिकार्‍यांना हाताशी धरून अतिक्रमण तोडण्याबाबतच्या नोटीस बजावून धमकाविण्याचे व नंतर सोयीस्करपणे तडजोडीसाठी मार्ग सुचविण्याचा प्रकार घडला. दाणाबाजारात मूळ मालकाकडून मालमत्ता घेऊन त्याला दुसरी जागा देण्याचे आश्‍वासन देऊन नंतर फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. तर भवानीपेठेतही असाच फसवणूक करून व दमदाटी करून जागेचा ताबा घेतल्याचा प्रकार घडला आहे. नवीपेठेतही एका इमारतीतील भाडेकरूंना असाच त्रास देऊन जागा खाली करून घेण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही फारसा उपयोग होत नाही. कारण या रॅकेटमध्ये राजकीय क्षेत्रातील तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळी असल्याने पोलिसांना 'मॅनेज' करण्यातही ते तरबेज आहेत. तर न्यायालयात दाद मागितली तर हे विषय दिवाणी प्रकारात मोडतात. दिवाणी दावे वर्षानुवर्ष चालत असल्याने सर्वसामान्य माणसाला त्यामुळे कुठे दाद मागावी? असा प्रश्न पडतो. त्यामुळे मुला-बाळांच्या सुरक्षेचा विचार करीत जागेवर पाणी सोडावे लागते. केवळ इमारती किंवा घरच नव्हे तर रिकामे प्लॉटही अशाच प्रकारचे हातखंडे वापरून बळकावले जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

अशी आहे मॉडस ऑपरेंडी 

■ रिकामा प्लॉट मोक्याच्या जागी असेल व मालक तो प्लॉट विकण्यास तयार नसेल तर सरळ त्या मालकाच्या नावाने दुसराच व्यक्ती उभा करून बोगस खरेदी-विक्री केली जाते. त्यानंतर मूळ मालकाला ही बाब लक्षात आली तरीही न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो. त्यात अनेक वर्ष लागतात. त्यामुळे मूळ मालक त्रस्त होऊन मिळेल त्या रक्कमेवर तडजोड करून मोकळा होतो.■ जुनी इमारत असली की त्यातील भाडेकरूही ४0-५0 वर्ष जुने असतात. मूळ मालकाजवळ त्यांना पैसे देऊन इमारत रिकामी करून घेण्याची क्षमता नसते. त्यामुळे बहुतांश वेळा मूळ मालक अशी इमारत भाडेकरू असतानाच अशा रॅकेटला विकून टाकतो. ते भाडेकरूंना आमिष दाखवून जागा खाली करून घेतात. जे भाडेकरून आमिषाला बळी पडत नाहीत, त्यांना त्रास देणे सुरू होते. कधी त्या कुटुंबातील महिला, मुलींच्या मागे गुंड पाठवून घाबरविण्याचे प्रकार केले जातात. तर कधी इमारतीत जिन्याच्या आजूबाजूला २४ तास गुंड बसविले जातात. तेथेच त्यांचे दारू पिणे, पत्ते खेळण्याचे उद्योग चालतात. जिन्याचे नुकसान करून खिळखिळा केला जातो. या त्रासाला कंटाळून अखेर उर्वरित भाडेकरूही जागा खाली करून देतात. ■ तर एखादी मोक्याच्या जागेवरील मालमत्ता आवडली परंतु मूळ मालक ती विकायला तयार नसला तर त्याच्या जवळच्या व्यक्तींना हाताशी धरून आमिष दाखविले जाते. तरीही न ऐकल्यास जागा मालक कोणत्या गोष्टीला घाबरतो? कमकुवत बाजू कोणती? याची माहिती काढून त्यानुसार घाबरविले जाते.