शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

किसान पार्सल गाडीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST

शेतकऱ्यांच्या मालाला इतर बाजारपेठांमध्ये चांगला भाव मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गेल्यावर्षी देवळाली ते मुजफ्फरपूर दरम्यान किसान पार्सल रेल्वे गाडी सुरू ...

शेतकऱ्यांच्या मालाला इतर बाजारपेठांमध्ये चांगला भाव मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गेल्यावर्षी देवळाली ते मुजफ्फरपूर दरम्यान किसान पार्सल रेल्वे गाडी सुरू केली आहे. या गाडीमुळे शेतकरी बांधवांना आपला कृषी माल राज्यातील इतर बाजारात विक्री करणे शक्य झाले आहे. या गाडीला जळगावलाही थांबा देण्यात आला असून, शेतकऱ्यांसह व्यापारी व उद्योजकांनाही माल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे; मात्र शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांनाच या गाडीचा सर्वाधिक फायदा होत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, शेतकरी बांधवांनाही या गाडीचा फायदा होत असल्याचे सांगितले. रेल्वेतर्फे यंदा ३१ मार्चपर्यंत या गाडीची मुदत वाढविण्यात आली आहे.ज्या शेतकऱ्यांना आपला माल इतर राज्यात पाठवायचा असेल, त्यांनी जळगाव स्टेशन येथील पार्सल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

इन्फो ;

शालीमारकडे जाणाऱ्या गाडीच्या मुदतीत वाढ :

रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांप्रमाणे उद्योजक व इतर नागरिकांच्या सामानाची ने-आण करण्यासाठी सुरु केलेल्या मुंबई-शालीमार पार्सल गाडीच्या मुदतीतही वाढ केली असून,यंदा ३१ मार्चपर्यंत ही गाडी धावणार आहे. या पार्सल गाडीलाही जळगाव स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे.