शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

एमआयडीसीत महावितरणच्या दुर्लक्षामुळे 'स्फोट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ट्रान्सफार्मरमध्ये आवाज येत असल्याने महावितरणकडे तक्रार करूनही कुणीही न आल्याने अखेर बुधवारी दुपारी चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ट्रान्सफार्मरमध्ये आवाज येत असल्याने महावितरणकडे तक्रार करूनही कुणीही न आल्याने अखेर बुधवारी दुपारी चार वाजता या ट्रान्सफार्मरचा मोठा स्फोट होऊन आग लागून चार क्षेत्रांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार एमआयडीसीत घडला. तब्बल वीस तास जी, व्ही, एस, एफ या सेक्टरचा वीजपुरवठा खंडित असल्याने अखेर या उद्योजकांनी गुरूवारी महावितरणचे कार्यालय गाठत मुख्य अभियंत्यांना जाब विचारला. अखेर दुपारी दोन वाजता वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर उद्योजक परतले.

एमआयडीसीतील समीर चौधरी यांच्या जी १३ - २ या कंपनीच्या ट्रान्सफार्मरमध्ये सकाळी अकराच्या सुमारास त्यांना आवाज येत होते. याची त्यांनी तातडीने महावितरणकडे तक्रार केली. मात्र, वारंवार तक्रार करूनही महावितरणने याकडे लक्ष दिले नाही. अखेर दुपारी चार वाजेच्या सुमारास या ट्रान्सफार्ममध्ये मोठा धमाका होऊन चार सेक्टरचा वीजपुरवठाच खंडित झाल्याचे समीर चौधरी यांनी सांगितले. या आधीही महिनाभरापूर्वी असाच प्रकार घडून तीन दिवस वीजपुरवठा खंडित होता. वारंवार असा पुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या घटना आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे या भागातील ५० ते ६० उद्योजकांनी गुरूवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास एमआयडीतील मुख्य महावितरणचे कार्यालय गाठले व मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना जाब विचारला. जो पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, असा पवित्रा उद्योजकांनी घेतला होता. त्यानंतर अभियंता कुमठेकर यांनी काही कर्मचाऱ्यांना बोलावून दुरूस्तीसंदर्भात सूचना दिल्या. दीड तास ही चर्चा झाल्यानंतर दोन वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाला. समीर चौधरी, समीर साने, तुषार पटेल, दिनेश राठी, अमित भारंबे, स्वप्निल चौधरी, मनिष अग्रवाल आदी उपस्थित होते.

महिनाभरात डीपींचे काम

एमआयडीसीमध्ये अनेक ठिकाणी डिपी उघड्या पडल्या असून अनेकांना फ्युज नाहीत, अशा स्थितीत या ठिकाणीही मोठा अपघात होण्याची भीती आहे. याबाबतही पावले उचलण्याची मागणी उद्योजकांनी केली. यावर महिनाभरात नवीन डीपी बसविण्याची कार्यवाही करणार असल्याचे कुमठेकर यांनी उद्योजकांना सांगितले.

सुरक्षा साहित्य नाही

महावितरणचे कर्मचारी स्फोट झाल्याच्या काही वेळाने एमआयडीसीत पोहोचले मात्र, त्यांच्याकडे पुरेसे साहित्य नव्हते, सुरक्षा कीट नव्हते, आम्ही कंपन्यांमधून काढून साहित्य दिले व मग नंतर आग विझविण्यात आल्याचे उद्योजकांनी सांगितले.