शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

एमआयडीसीत महावितरणच्या दुर्लक्षामुळे 'स्फोट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ट्रान्सफार्मरमध्ये आवाज येत असल्याने महावितरणकडे तक्रार करूनही कुणीही न आल्याने अखेर बुधवारी दुपारी चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ट्रान्सफार्मरमध्ये आवाज येत असल्याने महावितरणकडे तक्रार करूनही कुणीही न आल्याने अखेर बुधवारी दुपारी चार वाजता या ट्रान्सफार्मरचा मोठा स्फोट होऊन आग लागून चार क्षेत्रांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार एमआयडीसीत घडला. तब्बल वीस तास जी, व्ही, एस, एफ या सेक्टरचा वीजपुरवठा खंडित असल्याने अखेर या उद्योजकांनी गुरूवारी महावितरणचे कार्यालय गाठत मुख्य अभियंत्यांना जाब विचारला. अखेर दुपारी दोन वाजता वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर उद्योजक परतले.

एमआयडीसीतील समीर चौधरी यांच्या जी १३ - २ या कंपनीच्या ट्रान्सफार्मरमध्ये सकाळी अकराच्या सुमारास त्यांना आवाज येत होते. याची त्यांनी तातडीने महावितरणकडे तक्रार केली. मात्र, वारंवार तक्रार करूनही महावितरणने याकडे लक्ष दिले नाही. अखेर दुपारी चार वाजेच्या सुमारास या ट्रान्सफार्ममध्ये मोठा धमाका होऊन चार सेक्टरचा वीजपुरवठाच खंडित झाल्याचे समीर चौधरी यांनी सांगितले. या आधीही महिनाभरापूर्वी असाच प्रकार घडून तीन दिवस वीजपुरवठा खंडित होता. वारंवार असा पुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या घटना आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे या भागातील ५० ते ६० उद्योजकांनी गुरूवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास एमआयडीतील मुख्य महावितरणचे कार्यालय गाठले व मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना जाब विचारला. जो पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, असा पवित्रा उद्योजकांनी घेतला होता. त्यानंतर अभियंता कुमठेकर यांनी काही कर्मचाऱ्यांना बोलावून दुरूस्तीसंदर्भात सूचना दिल्या. दीड तास ही चर्चा झाल्यानंतर दोन वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाला. समीर चौधरी, समीर साने, तुषार पटेल, दिनेश राठी, अमित भारंबे, स्वप्निल चौधरी, मनिष अग्रवाल आदी उपस्थित होते.

महिनाभरात डीपींचे काम

एमआयडीसीमध्ये अनेक ठिकाणी डिपी उघड्या पडल्या असून अनेकांना फ्युज नाहीत, अशा स्थितीत या ठिकाणीही मोठा अपघात होण्याची भीती आहे. याबाबतही पावले उचलण्याची मागणी उद्योजकांनी केली. यावर महिनाभरात नवीन डीपी बसविण्याची कार्यवाही करणार असल्याचे कुमठेकर यांनी उद्योजकांना सांगितले.

सुरक्षा साहित्य नाही

महावितरणचे कर्मचारी स्फोट झाल्याच्या काही वेळाने एमआयडीसीत पोहोचले मात्र, त्यांच्याकडे पुरेसे साहित्य नव्हते, सुरक्षा कीट नव्हते, आम्ही कंपन्यांमधून काढून साहित्य दिले व मग नंतर आग विझविण्यात आल्याचे उद्योजकांनी सांगितले.