शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

एमआयडीसीत महावितरणच्या दुर्लक्षामुळे 'स्फोट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ट्रान्सफार्मरमध्ये आवाज येत असल्याने महावितरणकडे तक्रार करूनही कुणीही न आल्याने अखेर बुधवारी दुपारी चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ट्रान्सफार्मरमध्ये आवाज येत असल्याने महावितरणकडे तक्रार करूनही कुणीही न आल्याने अखेर बुधवारी दुपारी चार वाजता या ट्रान्सफार्मरचा मोठा स्फोट होऊन आग लागून चार क्षेत्रांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार एमआयडीसीत घडला. तब्बल वीस तास जी, व्ही, एस, एफ या सेक्टरचा वीजपुरवठा खंडित असल्याने अखेर या उद्योजकांनी गुरूवारी महावितरणचे कार्यालय गाठत मुख्य अभियंत्यांना जाब विचारला. अखेर दुपारी दोन वाजता वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर उद्योजक परतले.

एमआयडीसीतील समीर चौधरी यांच्या जी १३ - २ या कंपनीच्या ट्रान्सफार्मरमध्ये सकाळी अकराच्या सुमारास त्यांना आवाज येत होते. याची त्यांनी तातडीने महावितरणकडे तक्रार केली. मात्र, वारंवार तक्रार करूनही महावितरणने याकडे लक्ष दिले नाही. अखेर दुपारी चार वाजेच्या सुमारास या ट्रान्सफार्ममध्ये मोठा धमाका होऊन चार सेक्टरचा वीजपुरवठाच खंडित झाल्याचे समीर चौधरी यांनी सांगितले. या आधीही महिनाभरापूर्वी असाच प्रकार घडून तीन दिवस वीजपुरवठा खंडित होता. वारंवार असा पुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या घटना आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे या भागातील ५० ते ६० उद्योजकांनी गुरूवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास एमआयडीतील मुख्य महावितरणचे कार्यालय गाठले व मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना जाब विचारला. जो पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, असा पवित्रा उद्योजकांनी घेतला होता. त्यानंतर अभियंता कुमठेकर यांनी काही कर्मचाऱ्यांना बोलावून दुरूस्तीसंदर्भात सूचना दिल्या. दीड तास ही चर्चा झाल्यानंतर दोन वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाला. समीर चौधरी, समीर साने, तुषार पटेल, दिनेश राठी, अमित भारंबे, स्वप्निल चौधरी, मनिष अग्रवाल आदी उपस्थित होते.

महिनाभरात डीपींचे काम

एमआयडीसीमध्ये अनेक ठिकाणी डिपी उघड्या पडल्या असून अनेकांना फ्युज नाहीत, अशा स्थितीत या ठिकाणीही मोठा अपघात होण्याची भीती आहे. याबाबतही पावले उचलण्याची मागणी उद्योजकांनी केली. यावर महिनाभरात नवीन डीपी बसविण्याची कार्यवाही करणार असल्याचे कुमठेकर यांनी उद्योजकांना सांगितले.

सुरक्षा साहित्य नाही

महावितरणचे कर्मचारी स्फोट झाल्याच्या काही वेळाने एमआयडीसीत पोहोचले मात्र, त्यांच्याकडे पुरेसे साहित्य नव्हते, सुरक्षा कीट नव्हते, आम्ही कंपन्यांमधून काढून साहित्य दिले व मग नंतर आग विझविण्यात आल्याचे उद्योजकांनी सांगितले.