शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

मनुदेवी वनक्षेत्रातील ऐतिहासिक गायवाड्याचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सातपुडा पर्वतरांगेतील मनुदेवी वनक्षेत्र परिसरातील ऐतिहासिक गायवाडा आपल्या अस्तित्वाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. अफगाण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सातपुडा पर्वतरांगेतील मनुदेवी वनक्षेत्र परिसरातील ऐतिहासिक गायवाडा आपल्या अस्तित्वाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. अफगाण आक्रमणकारी अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाच्या जखमा घेत आपले अस्तित्व टिकवून ठेवलेल्या गायवाडा परिसरात अतिक्रमणधारकांनी शेकडो वृक्षांची कत्तल करून, या ठिकाणची जमीन शेतीसाठी बळकावण्याचा घाट घातल्याची बाब समोर आली आहे.

यावल तालुक्यातील आडगाव येथून काही अंतरावर श्रीक्षेत्र मनुदेवी तीर्थक्षेत्र आहे. मनुदेवीला जाताना निसर्गरम्य ठिकाण आतून भाविक, भक्त, निसर्गप्रेमी यांना याच निसर्गाच्या सानिध्यातून जावे लागते. परंतु, तेच निसर्गरम्य ठिकाण आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण ह्याच सातपुडाच्या सानिध्यात असलेल्या वनसृष्टीवर काही वन तस्करांची वक्रदृष्टी पडून ही सृष्टी नाहीशी केली जात आहे.

सागवानची तस्करी सुरूच, वणवा लावण्याचे प्रकार येताहेत समोर

मनुदेवी वनक्षेत्र परिसरासह चोपडा व यावल तालुक्यातील सातपुडा परिसरात सागवान वृक्षांचे मोठ्या प्रमाणात जंगल आहे. सागवानला बाजारात मोठी मागणी असल्याने काही वर्षांपासून या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून, सागवानाची तस्करीदेखील केली जात आहे.

गायवाडा परिसरातही वृक्षतोड करून लावल्या जाताहेत आगी

मनुदेवी मंदिराच्या वरच्या भागात गायवाडाचे अस्तित्व आढळून येते. या ऐतिहासिक क्षेत्राकडे अजूनही जिल्हा व वन प्रशासनाने हवे तसे लक्ष दिलेले नाही. या वाड्यात आता काही प्रमाणात भिंती व काही पुरातन अवशेष आढळून येतात. या खोलगट भागात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. मात्र, याचठिकाणी वन माफियांनी अतिक्रमण करून वृक्षांची कत्तल सुरू केली आहे. तसेच गेल्या आठवडाभरापासून या भागात आगदेखील लावण्यात आली आहे.

पाच हजार हेक्‍टर क्षेत्राची जबाबदारी दोन कर्मचाऱ्यांकडे

वन विभागात अनेक जागा रिक्त असल्याने अशा घटनांकडे वन विभागाकडून आवश्यक लक्ष दिले जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. मनुदेवी वनक्षेत्र असलेल्या पाच हजार हेक्टर क्षेत्रासाठी केवळ दोनच वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन कर्मचार्‍यांवर पाच हजार वनक्षेत्राची जबाबदारी असल्याने अशा वृक्षतोडीकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचेही पाहायला मिळत आहे.

कोट..

मनुदेवी-गायवाडा परिसरात गेल्या २-३ दिवसांपासून मानवनिर्मित वणवा सुरू आहे. स्थानिक पर्यावरणप्रेमींनी वेळोवेळी वन विभागाला कळवूनही आग विझविण्यात वा आगीवर वन विभागाला नियंत्रण मिळवता आलेले नाही. ह्या परिसरावर परप्रांतीयांकडून वारंवार अतिक्रमणासाठी प्रयत्न सुरू आहे. वन विभागाने अनेकवेळा त्यांचे प्रयत्न हाणून पाडले असले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे अतिक्रमणासाठी प्रयत्नशील असलेल्या परप्रांतीयांकडून या परिसरातील जंगलाची अतोनात हानी सुरू आहे. या विषयाकडे प्राधान्याने लक्ष घालून सातपुड्याची होणारी कत्तल थांबवावी. मनुदेवी गायवाडा परिसराला जैवविविधता दृष्टीकाेनातून महत्त्व आहेच. परंतु, तेथे असलेल्या १२ व्या शतकातील गवळीराजाच्या वाड्याच्या अवशेषांमुळे ताे भाग विशेष महत्त्वाचा आहे. अशाचप्रकारे आगी व अतिक्रमण सुरू राहिल्यास ऐतिहासिक गायवाडा व तेथील वैभवशाली जंगल नामशेष होण्यास वेळ लागणार नाही.

- रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव