शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

२१५ विषयांच्या परीक्षा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दुसऱ्या टप्प्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दुसऱ्या टप्प्यात १ लाख ६५ हजार २३३ विद्यार्थ्यांनी २१५ विषयांच्या परीक्षा यशस्वीपणे दिल्या. २ मार्च ते १७ मार्च या कालावधीत ऑनलाइन झालेल्या या परीक्षेत ९० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात आहेत. गतवर्षी अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या परीक्षा ऑनलाइन झाल्यानंतर आता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दुसऱ्या टप्प्यात प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या नियमित प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापनशास्त्र, बी.एस.डब्ल्यू., बी.पी.ई., ई-परीक्षांचा अंतर्भाव होता. प्रथम टप्प्यातील परीक्षा ५ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत विविध ४२३२ विषयांची झालेली ही परीक्षा ५ लाख ६८ हजार ७६९ एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने दिली. या झालेल्या परीक्षांमध्ये ज्या विषयांना प्रात्यक्षिक परीक्षा नाहीत त्यांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. या सर्व परीक्षांचे आयोजन विद्यापीठाने स्वत: केले. प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परीक्षांसाठी परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील, सर्व अधिकार मंडळे, विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि सर्व आयटी को-ऑर्डिनेटर यांच्या सहकार्यामुळे या परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या.

तिसरा टप्पा २५ मेपासून

तिसऱ्या टप्प्यात पदव्युत्तर प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या परीक्षा २५ मे पासून घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षावेळी येणाऱ्या अडचणी विद्यापीठाकडून तत्काळ सोडविल्या जात आहेत.