शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

केळी पिकविम्याच्या जाचक नियमात अखेर बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाने २०२०-२०२१ या वर्षासाठी हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत केळी च्या निकषात केलेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासनाने २०२०-२०२१ या वर्षासाठी हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत केळी च्या निकषात केलेले बदल पुन्हा ‘जैसे थे’ केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, जिल्ह्यातील सुमारे ८० हजारहून अधिक केळी उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे. केळी पिकविम्याचा जुन्या निकषांमध्ये बदल केल्यामुळे नवीन जाचक नियमांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवून देखील त्याची नुकसान भरपाई मिळणे ही कठीण होती. मात्र, आता निकषांमध्ये बदल झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

२०१९ मध्ये राज्य शासनाने हवामान आधारित फळपिक विमा योजनेत २०२०-२०२१ या वर्षांसाठी निकषात बदल केले होते. शासनाने केलेले बदल हे अत्यंत जाचक असल्यामुळे जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान झाल्यावर देखील जाचक निकषांमुळे लाभ मिळणे कठीण होते. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा करून याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे प्रश्न वेधण्याचा प्रयत्न केला होता. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून देखील याबाबत शासनदरबारी पाठपुरावा सुरु होता. अखेर शासनाने शेतकऱ्यांची मागणी मान्य करत, पुर्वीप्रमाणेच केळी पिकविम्याचे निकष कायम ठेवले आहेत.

वर्षभरातच झाला बदल

दर तीन वर्षांमध्ये भौगोलिक व नैसर्गिक स्थितीचा अभ्यास केल्यानंतर केळी पिक विम्याचा निकषात बदल केले जात असतात. तसेच एकवेळेस बदल केल्यानंतर तीन वर्षांसाठी ते निकष कायम असतात. मात्र, जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागणीनंतर राज्य शासन व केंद्र शासनाने अवघ्या वर्षभरातच निकषांमध्ये बदल केला आहे.

हेक्टर क्षेत्र मात्र कायम

जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केवळ ४ हेक्टर क्षेत्राचा विमा काढता येणार असून, त्यापेक्षा अधिक क्षेत्र असेल तर त्यासाठीचा विमा शेतकऱ्यांना काढता येणार नाही. हा निकष शासनाने कायम ठेवला आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी एकत्र कुंटूब पध्दतीने राहत असून, एकाच जणांच्या नावावर शेती असते. यामुळे या निकषांमुळे अनेक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरणार नाही अशी भिती आहे. यामुळे शासनाने हेक्टर क्षेत्राबाबतचा निकष वाढून ८ हेक्टरपर्यंत करावा अशी मागणी केळी उत्पादक शेतकरी डॉ.सत्वशिल पाटील यांनी केली आहे.

हे राहणार २०२१-२२ साठीचे निकष१. १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान, सलग ३ दिवस किमान तापमान ८ अंश किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई २६ हजार ५०० पर्यंत देण्यात येईल.

२. १ मार्च ते ३१ जुलै दरम्यान ४० किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाचा वाºयाची नोंद हवामान केंद्रावर झाल्यास ७२ तासाच्या आत शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती कळवावी, नुकसानभरपाईची रक्कम ७० हजार पर्यंत देण्यात येईल.

३. १ एप्रिल ३० एप्रिल सलग ५ दिवस तापमानाचा ४२ अंश किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास ३५ हजार नूकसान भरपाई,

४. १ मे ते ३१ मे दरम्यान तापमान सलग ५ दिवस ४. अंश किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई ४. हजार ५०० देण्यात येईल.

पपईचाही झाला समावेश

हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये पपईचा समावेश करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. याबाबत ‘लोकमत’ ने देखील अनेकवेळा याबाबत वृत्त प्रकाशित करून, शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. कारण जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये पपईच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असून, सध्यस्थितीत जिल्ह्यात ३५ ते ४० हजार हेक्टर क्षेत्रावर आता पपईची लागवड होत आहे. या योजनेत पपईचाही समावेश झाल्यामुळे जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

कोट..

केळीच्या पिकविम्यात केलेले जाचक नियम बदलण्याबाबत राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हित लक्षात घेता, वर्षभरातच शासनाने या निकषात बदल केला आहे. तसेच जिल्ह्यात पपईची लागवड देखील वाढली असल्याने या विमा योजनेत पपईचा देखील समावेश करण्याची मागणी केली होती. ती देखील मागणी मान्य झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचाही फायदा होईल.

-गुलाबराव पाटील, पालकमंत्री

फळपिक विमा योजनेचे निकष ठरविण्याचे अधिकार हे राज्य शासनाचे होते. त्यांनी निकष बदलल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. राज्य शासनाला उशीराने का होईना ? जाग आल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. याबाबत केंद्र शासनाने देखील राज्य शासनाला हे निकष बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या.

-उन्मेष पाटील, खासदार