शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तीन वर्षे उलटूनही ७९ जणांचे घरकूल बाकीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:19 IST

चाळीसगाव : तीन वर्षे उलटूनही अनुदानाचा पहिला हप्ता घेऊन घरकुलाचे बांधकाम पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना पं.स. मार्फत नोटिसा बजावण्यात ...

चाळीसगाव : तीन वर्षे उलटूनही अनुदानाचा पहिला हप्ता घेऊन घरकुलाचे बांधकाम पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना पं.स. मार्फत नोटिसा बजावण्यात येणार आहे. यानंतरही बांधकाम पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर फौजदारी नोंदविण्यात येणार असल्याने खळबळ उडाली आहे. लाभार्थ्यांनी अनुदानाच्या रकमेचा पहिला हप्ता तीन वर्षांपूर्वी घेतला आहे.

पंतप्रधान ग्राम आवास योजनेंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तालुक्यात ८०४ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रत्येकी एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते.

...........

चौकट

७९ लाभार्थी रडारवर

२०१७-१८ मध्ये तालुक्यात पंतप्रधान ग्राम आवास योजनेंतर्गत ८०४ घरकुले मंजूर केली गेली. यापैकी ७२५ लाभार्थ्यांनी अनुदान घेऊन एका वर्षात घरकुलाचे काम पूर्ण केले.

1...मात्र ७९ लाभार्थ्यांनी गत तीन वर्षांत वेळोवेळी सूचना देऊनही बांधकाम पूर्ण न केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

.....

चौकट

२५ रोजी लोक अदालतीत होणार फैसला

घरकुले अपूर्ण ठेवणाऱ्या लाभार्थ्यांसाठी २५ रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ७९ लाभार्थ्यांना लोक अदालतीत उपस्थित राहण्यासाठी नोटिसा देण्यात येणार आहेत.

- नोटिसा बजावल्यानंतर लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितल्यास ती सवलत दिली जाणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत घरकुलाचे काम पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

- लाभार्थ्यांनी यानंतरही काम पूर्ण न केल्यास त्यांच्याकडून पहिल्या हप्त्याची १५ हजार रुपयांची रक्कम वसूल केली जाणार आहे. घरकुलांचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानाची उर्वरित रक्कमही तत्काळ अदा करण्यात येणार आहे.

.....

इन्फो

तालुक्यातील ७९ लाभार्थ्यांनी तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही घरकुलाचे काम पूर्ण केलेले नाही. त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. २५ रोजी लोक अदालत आहे. यानंतरही काम पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून पहिल्या हप्त्याची १५ हजार रुपये रक्कम वसूल केली जाईल.

- नंदकुमार वाळेकर,

गटविकास अधिकारी, चाळीसगाव