शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

तीन महिन्यांनंतरही भुसावळ-पुणे एक्सप्रेस दौंडपर्यंतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST

जळगाव : कोरोनाकाळात भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ ते पुणेदरम्यान सुरू केलेली विशेष गाडी अचानक २७ मे ...

जळगाव : कोरोनाकाळात भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ ते पुणेदरम्यान सुरू केलेली विशेष गाडी अचानक २७ मे पासून ते २९ जुलैपर्यंत दौंडपर्यंतच धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तर, आता २९ जुलै उलटूनही रेल्वे प्रशासनातर्फे पुन्हा ही गाडी २८ ऑक्टोबरपर्यंत दौंडपर्यंतच धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची अधिकच गैरसोय होत असून, ही गाडी दौंडपर्यंत का? असा प्रश्न संतप्त प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

दुसऱ्या लाटेनंतर शासनाने अनलॉक केल्यानंतरही भुसावळ रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे कारण सांगूून, दीड वर्षानंतरही एकही पॅसेंजर सेवा सुरू केलेली नाही. मात्र, गाड्या सुरू करण्याबाबत प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर सुरू न करता, भुसावळ ते पुणेदरम्यान विशेष गाडी सुरू केली होती. विशेष म्हणजे सुरुवातीला आठवड्यातून एकदा व टप्प्या-टप्प्याने नियमित ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. काही दिवस अशा प्रकारे सेवा सुरू राहिल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारण सांगून अचानक २७ मे २०२१ पासून ही गाडी पुण्यापर्यंत न सोडता २९ जुलैपर्यंत दौंडपर्यंतच धावणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता २९ जुलैनंतरही ही गाडी २८ ऑक्टोबरपर्यंत दौंडपर्यंत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धिपत्रक काढल्यामुळे प्रवाशांमधून रेल्वेच्या कारभारावर तीव्र संपात व्यक्त होत आहे.

इन्फो :

...तर आताही आठवड्यातून एकदाच सेवा :

रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला भुसावळ ते पुणे ही गाडी आठवड्यातून एकदा आणि टप्प्या-टप्प्याने दररोज धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, अनेक महिन्यांनंतरही ही गाडी आठवड्यातून एकदा आणि तीदेखील पुणेऐवजी दौंडपर्यंत सोडण्यात येणार असल्यामुळे, प्रवाशांची ही गाडी सोयीची नसून, गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे ही नियमित आणि पुण्यापर्यंत सोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. दरम्यान, सध्या दौंडपर्यंतच ही गाडी धावत असल्याबद्दल, भुसावळ जनसंपर्क विभागाशी `लोकमत` प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी दौंडहून पुढे पुण्यासाठी स्वतंत्र गाडी असल्याचे सांगितले.