शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

लॉकडाऊननंतरही बहुतांश गावांना निम्म्याच फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारातून कोरोनाच्या आधी दररोज ६०० फेऱ्या धावायच्या. मात्र, आता कोरोनानंतर महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू झाली ...

राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारातून कोरोनाच्या आधी दररोज ६०० फेऱ्या धावायच्या. मात्र, आता कोरोनानंतर महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू झाली असली तरी, ६०० पैकी ४५० फेऱ्या सुरू असून, १५० फेऱ्या अद्यापही बंद आहेत. आगार प्रशासनातर्फे प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी फेऱ्यांची संख्या कमी असली तरी, प्रत्येक गावांना बसेस जात आहेत. यामध्ये सकाळी, दुपारी व सायंकाळी अशाप्रकारे बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागातील विविध गावांवरून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थांच्या सोयीनुसारही बसेस सोडण्यात येत आहेत. तसेच ज्या गावांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असेल, त्या प्रवाशासांठी तत्काळ बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दरम्यान, जळगाव आगारातील ५० चालक-वाहक मुंबई येथे बेस्ट बस सेवेसाठी जात असल्यामुळे, मनुष्यबळ अपूर्ण पडत आहे. चालक-वाहकांची संख्या पूर्ण झाल्यावर सर्व गावांना पूर्वीप्रमाणे वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

दोन लाखांनी उत्पन्न घटले

जळगाव आगारातर्फे सध्या सर्व मार्गांवर बसेस धावत असल्या तरी, कोरोनामुळे अद्यापही पूर्ण क्षमतेने उत्पन्नात वाढ झालेली नाही. आगाराचे दैनंदिन उत्पन्न १० ते ११ लाखांपर्यंत असून, सध्या ८ ते ९ लाखांपर्यंत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

प्रतिसादाअभावी प्रवासी मार्गावरही फेऱ्या कमी

महामंडळ प्रशासनातर्फे दैनंदिन फेऱ्यांची संख्या कमी केली असली तरी, सद्या सर्व मार्गावर बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, सर्वाधिक उत्पन्न असणारे औरंगाबाद, धुळे, व चाळीसगाव या मार्गावरही प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद नसल्यामुळे फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद जसा वाढेल, त्याप्रमाणे बसेसची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

आगार प्रशासनातर्फे पूर्वीप्रमाणे बससेवा सुरू करण्यात आली असली तरी, शालेय विद्यार्थांसाठी सकाळपासूनच सर्व गावांमध्ये दर तासाला बसेस सोडणे गरजेचे आहे. गावात वेळेवर बस येत नसल्यामुळे विद्यार्थांची गैरसोय होत आहे.

स्वप्नील चौधरी, प्रवासी.

इन्फो :

आगार प्रशासनाने पाचोरा,चाळीसगाव या मार्गावर सकाळी सहापासूनच बसेस सोडणे गरजेचे आहे. बाहेरगावी नोकरीनिमित्त व बाजारानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना यामुळे सोयीचे होईल. यामुळे आगाराला उत्पन्नही चांगले मिळेल.

संजय पाटील, प्रवासी

इन्फो :

आगार प्रशासनातर्फे ज्या गावांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे, अशा गावांना फेऱ्या कमी सोडण्यात येत आहेत. सध्या पुरेशा प्रमाणात रेल्वेही सुरू न झाल्यामुळे, जवळच्या तालुक्याच्या गावांना जादा बसेस सोडत आहोत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर बसेसची संख्याही वाढविण्यात येईल.

मनोज तिवारी, स्थानकप्रमुख, जळगाव आगार