शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

लॉकडाऊननंतरही बहुतांश गावांना निम्म्याच फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारातून कोरोनाच्या आधी दररोज ६०० फेऱ्या धावायच्या. मात्र, आता कोरोनानंतर महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू झाली ...

राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारातून कोरोनाच्या आधी दररोज ६०० फेऱ्या धावायच्या. मात्र, आता कोरोनानंतर महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू झाली असली तरी, ६०० पैकी ४५० फेऱ्या सुरू असून, १५० फेऱ्या अद्यापही बंद आहेत. आगार प्रशासनातर्फे प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी फेऱ्यांची संख्या कमी असली तरी, प्रत्येक गावांना बसेस जात आहेत. यामध्ये सकाळी, दुपारी व सायंकाळी अशाप्रकारे बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागातील विविध गावांवरून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थांच्या सोयीनुसारही बसेस सोडण्यात येत आहेत. तसेच ज्या गावांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असेल, त्या प्रवाशासांठी तत्काळ बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दरम्यान, जळगाव आगारातील ५० चालक-वाहक मुंबई येथे बेस्ट बस सेवेसाठी जात असल्यामुळे, मनुष्यबळ अपूर्ण पडत आहे. चालक-वाहकांची संख्या पूर्ण झाल्यावर सर्व गावांना पूर्वीप्रमाणे वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

दोन लाखांनी उत्पन्न घटले

जळगाव आगारातर्फे सध्या सर्व मार्गांवर बसेस धावत असल्या तरी, कोरोनामुळे अद्यापही पूर्ण क्षमतेने उत्पन्नात वाढ झालेली नाही. आगाराचे दैनंदिन उत्पन्न १० ते ११ लाखांपर्यंत असून, सध्या ८ ते ९ लाखांपर्यंत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

प्रतिसादाअभावी प्रवासी मार्गावरही फेऱ्या कमी

महामंडळ प्रशासनातर्फे दैनंदिन फेऱ्यांची संख्या कमी केली असली तरी, सद्या सर्व मार्गावर बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, सर्वाधिक उत्पन्न असणारे औरंगाबाद, धुळे, व चाळीसगाव या मार्गावरही प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद नसल्यामुळे फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद जसा वाढेल, त्याप्रमाणे बसेसची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

आगार प्रशासनातर्फे पूर्वीप्रमाणे बससेवा सुरू करण्यात आली असली तरी, शालेय विद्यार्थांसाठी सकाळपासूनच सर्व गावांमध्ये दर तासाला बसेस सोडणे गरजेचे आहे. गावात वेळेवर बस येत नसल्यामुळे विद्यार्थांची गैरसोय होत आहे.

स्वप्नील चौधरी, प्रवासी.

इन्फो :

आगार प्रशासनाने पाचोरा,चाळीसगाव या मार्गावर सकाळी सहापासूनच बसेस सोडणे गरजेचे आहे. बाहेरगावी नोकरीनिमित्त व बाजारानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना यामुळे सोयीचे होईल. यामुळे आगाराला उत्पन्नही चांगले मिळेल.

संजय पाटील, प्रवासी

इन्फो :

आगार प्रशासनातर्फे ज्या गावांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे, अशा गावांना फेऱ्या कमी सोडण्यात येत आहेत. सध्या पुरेशा प्रमाणात रेल्वेही सुरू न झाल्यामुळे, जवळच्या तालुक्याच्या गावांना जादा बसेस सोडत आहोत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर बसेसची संख्याही वाढविण्यात येईल.

मनोज तिवारी, स्थानकप्रमुख, जळगाव आगार