शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतरही बहुतांश गावांना निम्म्याच फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारातून कोरोनाच्या आधी दररोज ६०० फेऱ्या धावायच्या. मात्र, आता कोरोनानंतर महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू झाली ...

राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारातून कोरोनाच्या आधी दररोज ६०० फेऱ्या धावायच्या. मात्र, आता कोरोनानंतर महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू झाली असली तरी, ६०० पैकी ४५० फेऱ्या सुरू असून, १५० फेऱ्या अद्यापही बंद आहेत. आगार प्रशासनातर्फे प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी फेऱ्यांची संख्या कमी असली तरी, प्रत्येक गावांना बसेस जात आहेत. यामध्ये सकाळी, दुपारी व सायंकाळी अशाप्रकारे बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागातील विविध गावांवरून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थांच्या सोयीनुसारही बसेस सोडण्यात येत आहेत. तसेच ज्या गावांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असेल, त्या प्रवाशासांठी तत्काळ बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दरम्यान, जळगाव आगारातील ५० चालक-वाहक मुंबई येथे बेस्ट बस सेवेसाठी जात असल्यामुळे, मनुष्यबळ अपूर्ण पडत आहे. चालक-वाहकांची संख्या पूर्ण झाल्यावर सर्व गावांना पूर्वीप्रमाणे वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

दोन लाखांनी उत्पन्न घटले

जळगाव आगारातर्फे सध्या सर्व मार्गांवर बसेस धावत असल्या तरी, कोरोनामुळे अद्यापही पूर्ण क्षमतेने उत्पन्नात वाढ झालेली नाही. आगाराचे दैनंदिन उत्पन्न १० ते ११ लाखांपर्यंत असून, सध्या ८ ते ९ लाखांपर्यंत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

प्रतिसादाअभावी प्रवासी मार्गावरही फेऱ्या कमी

महामंडळ प्रशासनातर्फे दैनंदिन फेऱ्यांची संख्या कमी केली असली तरी, सद्या सर्व मार्गावर बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, सर्वाधिक उत्पन्न असणारे औरंगाबाद, धुळे, व चाळीसगाव या मार्गावरही प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद नसल्यामुळे फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद जसा वाढेल, त्याप्रमाणे बसेसची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

आगार प्रशासनातर्फे पूर्वीप्रमाणे बससेवा सुरू करण्यात आली असली तरी, शालेय विद्यार्थांसाठी सकाळपासूनच सर्व गावांमध्ये दर तासाला बसेस सोडणे गरजेचे आहे. गावात वेळेवर बस येत नसल्यामुळे विद्यार्थांची गैरसोय होत आहे.

स्वप्नील चौधरी, प्रवासी.

इन्फो :

आगार प्रशासनाने पाचोरा,चाळीसगाव या मार्गावर सकाळी सहापासूनच बसेस सोडणे गरजेचे आहे. बाहेरगावी नोकरीनिमित्त व बाजारानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना यामुळे सोयीचे होईल. यामुळे आगाराला उत्पन्नही चांगले मिळेल.

संजय पाटील, प्रवासी

इन्फो :

आगार प्रशासनातर्फे ज्या गावांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे, अशा गावांना फेऱ्या कमी सोडण्यात येत आहेत. सध्या पुरेशा प्रमाणात रेल्वेही सुरू न झाल्यामुळे, जवळच्या तालुक्याच्या गावांना जादा बसेस सोडत आहोत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर बसेसची संख्याही वाढविण्यात येईल.

मनोज तिवारी, स्थानकप्रमुख, जळगाव आगार