शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

वर्षभरानंतरही ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेतील प्रवास सवलत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसह अधिस्वीकृती पत्रकारांनाही प्रवासातील सवलत बंद केली आहे. मात्र, वर्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसह अधिस्वीकृती पत्रकारांनाही प्रवासातील सवलत बंद केली आहे. मात्र, वर्ष उलटल्यानंतरही ही सवलत रेल्वेकडून बंदच ठेवण्यात आली असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमधून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी निर्माण होत आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने दुसरीकडे दिव्यांग बांधवांना रेल्वे प्रवासातील सवलत लागू ठेवली आहे. मात्र, दिव्यांग बांधवांसाठी रेल्वे गाडीत असलेला स्वतंत्र डबाच अचानक बंद केल्यामुळे दिव्यांग बांधवांचे अधिकच हाल होत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे सध्या ५० टक्केच रेल्वे सेवा सुरू आहे. यातही सर्वसामान्य प्रवाशांना जनरल तिकीट काढून प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गेल्या वर्षभरापासून रेल्वेचा प्रवास दुरापास्त झाला असताना, त्यात रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात ५० टक्के भाडे सवलतीची योजनाही बंद केल्यामुळे, संबंधित सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी आजही रेल्वेच्या प्रवासालाच प्राधान्य देतात. मात्र, रेल्वे प्रवासात मिळणारी सवलत बंद असल्याने या ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट आरक्षित करून प्रवास करावा लागत आहे.

इन्फो :

पत्रकार बांधवांनाही सवलत बंद

राज्य शासनाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महामंडळाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास व रेल्वेत ५० टक्के सवलती दिली आहे. वार्तांकनासाठी नेहमी बाहेरगावी जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या सवलतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. मात्र, रेल्वे प्रशासनाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही रेल्वेतील सवलत गेल्या वर्षभरापासून बंद ठेवली आहे.

इन्फो :

दिव्यांग बांधवांना सवलत; मात्र डब्बाच केला बंद

रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे कारण सांगून, ज्येष्ठ नागरिक व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सवलत बंद केली असून, दुसरीकडे दिव्यांग बांधवांना ही सवलत सुरू ठेवली आहे. मात्र, प्रत्येक एक्स्प्रेसमध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेला स्वतंत्र डबा रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यांपासून बंद केला आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना इतर डब्यातून व गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दिव्यांग बांधवांसाठी पुन्हा स्वतंत्र डबा सुरू करण्याची मागणी होत आहे.