शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतरही ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेतील प्रवास सवलत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसह अधिस्वीकृती पत्रकारांनाही प्रवासातील सवलत बंद केली आहे. मात्र, वर्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसह अधिस्वीकृती पत्रकारांनाही प्रवासातील सवलत बंद केली आहे. मात्र, वर्ष उलटल्यानंतरही ही सवलत रेल्वेकडून बंदच ठेवण्यात आली असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमधून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी निर्माण होत आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने दुसरीकडे दिव्यांग बांधवांना रेल्वे प्रवासातील सवलत लागू ठेवली आहे. मात्र, दिव्यांग बांधवांसाठी रेल्वे गाडीत असलेला स्वतंत्र डबाच अचानक बंद केल्यामुळे दिव्यांग बांधवांचे अधिकच हाल होत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे सध्या ५० टक्केच रेल्वे सेवा सुरू आहे. यातही सर्वसामान्य प्रवाशांना जनरल तिकीट काढून प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गेल्या वर्षभरापासून रेल्वेचा प्रवास दुरापास्त झाला असताना, त्यात रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात ५० टक्के भाडे सवलतीची योजनाही बंद केल्यामुळे, संबंधित सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी आजही रेल्वेच्या प्रवासालाच प्राधान्य देतात. मात्र, रेल्वे प्रवासात मिळणारी सवलत बंद असल्याने या ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट आरक्षित करून प्रवास करावा लागत आहे.

इन्फो :

पत्रकार बांधवांनाही सवलत बंद

राज्य शासनाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महामंडळाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास व रेल्वेत ५० टक्के सवलती दिली आहे. वार्तांकनासाठी नेहमी बाहेरगावी जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या सवलतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. मात्र, रेल्वे प्रशासनाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही रेल्वेतील सवलत गेल्या वर्षभरापासून बंद ठेवली आहे.

इन्फो :

दिव्यांग बांधवांना सवलत; मात्र डब्बाच केला बंद

रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे कारण सांगून, ज्येष्ठ नागरिक व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सवलत बंद केली असून, दुसरीकडे दिव्यांग बांधवांना ही सवलत सुरू ठेवली आहे. मात्र, प्रत्येक एक्स्प्रेसमध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेला स्वतंत्र डबा रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यांपासून बंद केला आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना इतर डब्यातून व गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दिव्यांग बांधवांसाठी पुन्हा स्वतंत्र डबा सुरू करण्याची मागणी होत आहे.