शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतरही ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेतील प्रवास सवलत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसह अधिस्वीकृती पत्रकारांनाही प्रवासातील सवलत बंद केली आहे. मात्र, वर्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसह अधिस्वीकृती पत्रकारांनाही प्रवासातील सवलत बंद केली आहे. मात्र, वर्ष उलटल्यानंतरही ही सवलत रेल्वेकडून बंदच ठेवण्यात आली असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमधून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी निर्माण होत आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने दुसरीकडे दिव्यांग बांधवांना रेल्वे प्रवासातील सवलत लागू ठेवली आहे. मात्र, दिव्यांग बांधवांसाठी रेल्वे गाडीत असलेला स्वतंत्र डबाच अचानक बंद केल्यामुळे दिव्यांग बांधवांचे अधिकच हाल होत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे सध्या ५० टक्केच रेल्वे सेवा सुरू आहे. यातही सर्वसामान्य प्रवाशांना जनरल तिकीट काढून प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गेल्या वर्षभरापासून रेल्वेचा प्रवास दुरापास्त झाला असताना, त्यात रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात ५० टक्के भाडे सवलतीची योजनाही बंद केल्यामुळे, संबंधित सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी आजही रेल्वेच्या प्रवासालाच प्राधान्य देतात. मात्र, रेल्वे प्रवासात मिळणारी सवलत बंद असल्याने या ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट आरक्षित करून प्रवास करावा लागत आहे.

इन्फो :

पत्रकार बांधवांनाही सवलत बंद

राज्य शासनाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महामंडळाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास व रेल्वेत ५० टक्के सवलती दिली आहे. वार्तांकनासाठी नेहमी बाहेरगावी जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या सवलतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. मात्र, रेल्वे प्रशासनाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही रेल्वेतील सवलत गेल्या वर्षभरापासून बंद ठेवली आहे.

इन्फो :

दिव्यांग बांधवांना सवलत; मात्र डब्बाच केला बंद

रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे कारण सांगून, ज्येष्ठ नागरिक व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सवलत बंद केली असून, दुसरीकडे दिव्यांग बांधवांना ही सवलत सुरू ठेवली आहे. मात्र, प्रत्येक एक्स्प्रेसमध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेला स्वतंत्र डबा रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यांपासून बंद केला आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना इतर डब्यातून व गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दिव्यांग बांधवांसाठी पुन्हा स्वतंत्र डबा सुरू करण्याची मागणी होत आहे.