शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतरही मालवाहतुकीची यंत्रणा अधिक झाली सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

कोरोनामुळे प्रवासी उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्यामुळे, एसटी आणि रेल्वेने मालवाहतुकीला सुरुवात केली. रेल्वेची पूर्वीपासूनच मालवाहतूक सेवा असली तरी, कोरोनाकाळात ...

कोरोनामुळे प्रवासी उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्यामुळे, एसटी आणि रेल्वेने मालवाहतुकीला सुरुवात केली. रेल्वेची पूर्वीपासूनच मालवाहतूक सेवा असली तरी, कोरोनाकाळात जीवनावश्यक वस्तूंचीही मालवाहतूक करून आणखी एक उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे, खासगी मालवाहतुकीची साधने पूर्ववत सुरू होऊनही, एसटी व रेल्वेच्या मालवाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही. उत्पन्नात दिवसागणिक वाढ होऊन मालवाहतूक यंत्रणा अधिकच सक्षम झाली आहे. तसेच दुसरीकडे दळणवळणाचा भाग असलेल्या विमानसेवेने कोरोनानंतर पुन्हा उभारी घेतली असून, विमानतळावरही करोडो रुपयांच्या विकासकामांची पाया भरणी झाली आहे.

कोरोनामुळे राज्यासह देशभरातील दळणवळणाच्या सुविधा पूर्णत: ठप्प झाल्या होत्या. एसटी, रेल्वे व विमानसेवेची प्रवासी सेवा बंद झाल्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये एसटी महामंडळाच्या तिजोरीत कर्मचाऱ्यांच्या पगारासाठींही पैस नव्हते. परिणामी महामंडळाची प्रवासी सेवा पूर्ववत होईपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला रखडतच राहिले. यावर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासी सेवाव्यतिरिक्त लालपरीचे ट्रकमध्ये रूपांतर करून एप्रिलपासून मालवाहतुकीला सुरुवात केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांप्रमाणे एसटीच्या ट्रकमधून व्यापारी व उद्योजकांचा माल पोहोचविण्यात येत आहे. खाजगी मालवाहतुकीपेक्षा महामंडळाचे भाडे कमी असल्यामुळे व्यापारी व उद्योजकांचा या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद असून, जळगाव विभागाने आतापर्यंत मालवाहतुकीत दोन कोटींहून अधिक उत्पन्न मिळविले आहे.

रेल्वे प्रशासनानेही लॉकडाऊनमुळे इतर राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी एप्रिलमध्ये स्वतंत्रपणे मालवाहतूक सेवा सुरू केली होती. या रेल्वेने ज्वारी, बाजरी, किराणा माल, फळे आदी जीवनावश्यक वस्तूंसह विविध ठिकाणी औषधांचा साठाही पाठविण्यात आला. रेल्वेेने मालवाहतुकीतून आतापर्यंत ५.६५ दशलक्ष टनाची वाहतूक करीत कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

कोरोनानंतरही प्रवाशांच्या प्रतिसादाने विमानाची पुन्हा झेप

कोरोनामुळे एसटी व रेल्वेसह जळगावची विमानसेवाही पूर्णत: ठप्प होती. देश-विदेशातून विमानाने आलेल्या प्रवाशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आढळून येत असल्याने, पुन्हा विमानसेवेला प्रवाशी मिळतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, राज्यासह देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची लाट कमी झाल्याने, प्रवाशी विमानसेवेकडे वळले आहेत. परिणामी सध्या सुरू असलेल्या अहमदाबाद - जळगाव व जळगाव - मुंबई विमानसेवेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभत असून, विमानसेवेने पुन्हा झेप घेतली आहे.

सचिन देव, जळगाव