शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

कोरोनानंतरही मालवाहतुकीची यंत्रणा अधिक झाली सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

कोरोनामुळे प्रवासी उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्यामुळे, एसटी आणि रेल्वेने मालवाहतुकीला सुरुवात केली. रेल्वेची पूर्वीपासूनच मालवाहतूक सेवा असली तरी, कोरोनाकाळात ...

कोरोनामुळे प्रवासी उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्यामुळे, एसटी आणि रेल्वेने मालवाहतुकीला सुरुवात केली. रेल्वेची पूर्वीपासूनच मालवाहतूक सेवा असली तरी, कोरोनाकाळात जीवनावश्यक वस्तूंचीही मालवाहतूक करून आणखी एक उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे, खासगी मालवाहतुकीची साधने पूर्ववत सुरू होऊनही, एसटी व रेल्वेच्या मालवाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही. उत्पन्नात दिवसागणिक वाढ होऊन मालवाहतूक यंत्रणा अधिकच सक्षम झाली आहे. तसेच दुसरीकडे दळणवळणाचा भाग असलेल्या विमानसेवेने कोरोनानंतर पुन्हा उभारी घेतली असून, विमानतळावरही करोडो रुपयांच्या विकासकामांची पाया भरणी झाली आहे.

कोरोनामुळे राज्यासह देशभरातील दळणवळणाच्या सुविधा पूर्णत: ठप्प झाल्या होत्या. एसटी, रेल्वे व विमानसेवेची प्रवासी सेवा बंद झाल्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये एसटी महामंडळाच्या तिजोरीत कर्मचाऱ्यांच्या पगारासाठींही पैस नव्हते. परिणामी महामंडळाची प्रवासी सेवा पूर्ववत होईपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला रखडतच राहिले. यावर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासी सेवाव्यतिरिक्त लालपरीचे ट्रकमध्ये रूपांतर करून एप्रिलपासून मालवाहतुकीला सुरुवात केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांप्रमाणे एसटीच्या ट्रकमधून व्यापारी व उद्योजकांचा माल पोहोचविण्यात येत आहे. खाजगी मालवाहतुकीपेक्षा महामंडळाचे भाडे कमी असल्यामुळे व्यापारी व उद्योजकांचा या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद असून, जळगाव विभागाने आतापर्यंत मालवाहतुकीत दोन कोटींहून अधिक उत्पन्न मिळविले आहे.

रेल्वे प्रशासनानेही लॉकडाऊनमुळे इतर राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी एप्रिलमध्ये स्वतंत्रपणे मालवाहतूक सेवा सुरू केली होती. या रेल्वेने ज्वारी, बाजरी, किराणा माल, फळे आदी जीवनावश्यक वस्तूंसह विविध ठिकाणी औषधांचा साठाही पाठविण्यात आला. रेल्वेेने मालवाहतुकीतून आतापर्यंत ५.६५ दशलक्ष टनाची वाहतूक करीत कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

कोरोनानंतरही प्रवाशांच्या प्रतिसादाने विमानाची पुन्हा झेप

कोरोनामुळे एसटी व रेल्वेसह जळगावची विमानसेवाही पूर्णत: ठप्प होती. देश-विदेशातून विमानाने आलेल्या प्रवाशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आढळून येत असल्याने, पुन्हा विमानसेवेला प्रवाशी मिळतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, राज्यासह देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची लाट कमी झाल्याने, प्रवाशी विमानसेवेकडे वळले आहेत. परिणामी सध्या सुरू असलेल्या अहमदाबाद - जळगाव व जळगाव - मुंबई विमानसेवेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभत असून, विमानसेवेने पुन्हा झेप घेतली आहे.

सचिन देव, जळगाव