शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
5
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
6
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
7
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
8
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
9
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
10
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
11
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
12
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
13
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
14
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
16
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
17
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
18
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
19
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
20
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'

जळगाव जिल्ह्यात ३६ दिवस उलटूनही ‘पणन’ च्या केंद्रावर कापसाचे एक बोंडही खरेदी नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 4:55 PM

शासनाकडून जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर ३६ दिवस उलटूनही एक बोंडही कापसाची खरेदी झालेली नाही.

ठळक मुद्देखाजगी केंद्रांवर ४ लाख गाठींची खरेदी अटी शिथिलनंतर ‘नाफेड’च्या केंद्रावर कडधान्यांची खरेदी जोरातबोंड अळीमुळे कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव,दि.१-शासनाकडून जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर ३६ दिवस उलटूनही एक बोंडही कापसाची खरेदी झालेली नाही. त्या उलट खासगी कापूस केंद्रावर आतापर्यंत ४ लाख गाठींची खरेदी झाली आहे. यंदा कापसाला हवा तसा भाव न मिळाल्याने शेतक-यांनी ‘पणन’च्या केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. तर ‘नाफेड’च्या केंद्रांवर कडधान्य खरेदीच्या अटी शिथिल केल्यानंतर जोरात खरेदी सुरु झाली आहे.

जिल्ह्यात यंदा साडे चार लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती. त्या दृष्टीने ‘पणन’कडून जळगावविभागात ८ केंद्र सुरु करण्यात आली आहेत. तर सीसीआयकडून देखील १० केंद्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र खासगी बाजारापेक्षा शासनाकडून कापसाला हमीभाव कमी  व खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणीची डोकेदुखी असल्याने शेतकºयांनी पणनच्या केंद्रावर पाठ फिरविली आहे.

बोंड अळीमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यताजिल्'ातील ९० टक्के कापूस क्षेत्रावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी कापूस उपटून फेकत आहे. त्यामुळेही यंदा ‘पणन’च्या केंद्रावर ठणठणाटच राहण्याची शक्यता आहे.  खान्देशात खासगी कापूस केंद्रावर १२ ते १३ लाख गाठींचे उदिष्ट आहे. मात्र बोंड अळीमुळे उत्पादनात घट होईल.

‘नाफेड’च्या केंद्रावर २ हजार क्विंटल उडीदची खरेदीशहरातील बाजार समितीत सुरु असलेल्या नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतक-यांचा ओघ वाढू लागला असून, आतापर्यंत २ हजार ३०० क्विंटल उडीदची खरेदी झाल्याची माहिती खरेदी केंद्र प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. सुरुवातीला नाफेडच्या केंद्रावर उडीद, मुग मध्ये १२ टक्के पेक्षा कमी ओलसरपणा असल्यावरच खरेदी केली जात होती. मात्र  शेतकºयांनी अटी शिथिल करण्याची मागणी केल्यानंतर या ठिकाणी नाफेडच्या वतीने शेतक-यांचा माल मध्ये प्रतवारी केल्यामुळे शेतकºयांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक शेतकºयांनी उडीद विक्री केला आहे. २३६ क्विंटल मूगाची तर १७५क्विंटल सोयाबीनची खरेदी नाफेड केंद्रावर झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी सुट्टी असल्यावर देखील नाफेड केंद्रावर कडधान्याची खरेदी सुरु होती.