शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

वीस दिवस उलटूनही फेरीवाल्यांना दमडीचीही मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST

दिरंगाई : शासनाकडून मदतीच्या निधीबाबत कुठलेही उत्तर आल्यामुळे विलंब जळगाव : गेल्या महिन्यात संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने ...

दिरंगाई : शासनाकडून मदतीच्या निधीबाबत कुठलेही उत्तर आल्यामुळे विलंब

जळगाव : गेल्या महिन्यात संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र, ही घोषणा होऊन १५ दिवस उलटूनही शहरातील फेरीवाल्यांना दीड हजार रुपये मिळालेले नाहीत. तर ही मदत वाटपाबाबत निधी मनपाने मंजूर करायचा की शासनाकडून थेट लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, याबाबत शासनाकडून कुठल्याही सूचना न आल्यामुळे निधी वाटपाला विलंब होत असल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली.

राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गेल्या महिन्यात १५ एप्रिल रोजी राज्य शासनाने राज्यभरात १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. तसेच या लॉकडाऊनची आता १५ मे पर्यंत मुदतवाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रकारच्या फेरीवाल्यांना लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्याने त्यांना शासनाकडून दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. या मदतीच्या घोषणेमुळे फेरीवाल्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पंधरा दिवस उलटूनही जळगाव शहरातील एकाही फेरीवाल्याला आर्थिक मदत करण्यात आली नसल्याचे मनपातर्फेच सांगण्यात आले. दुसरीकडे मदत न मिळाल्याने शहरातील फेरी वाल्यांकडून राज्य शासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

निधीच्या वाटपाबाबत मनपा प्रशासनात संभ्रम

राज्य शासनातर्फे फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर, त्याबाबत शासनातर्फे मनपा प्रशासनाला मदत देण्याबाबत पत्रही पाठविण्यात आले. मात्र, ही मदत देण्याबाबत लागणारा निधी मनपाने मंजूर करायचा, की थेट राज्य शासनातर्फे फेरीवाल्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार,याबाबत कुठलीही माहिती या पत्राद्वारे कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे मनपा प्रशासन या निधीच्या मंजुरीबाबत संभ्रमात आहे. त्यामुळे शहरातील फेरीवाले या मदतीपासून अद्यापही वंचित आहेत.

इन्फो :

फेरीवाल्यांना आर्थिक मदत करण्याबाबतची योजना ही शासनाची आहे. त्यानुसार शासनातर्फेच ही मदत दिली जाईल. शासनाकडून मदत आल्यावर ती फेरीवाल्यांना दिली जाईल.

सतीश कुलकर्णी, आयुक्त, जळगाव, मनपा

इन्फो :

फेरीवाल्यांमध्ये नाराजीचा सूर

शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतरही, फेरीवाल्यांना ही मदत अद्याप मिळाली नसल्याने त्यांच्यामधून या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाच्या सूचनेनुसार आम्ही दिलेल्या वेळेत व्यवसाय करून, नियमांचे पालन करीत आहोत. तरी देखील शासनाकडून अद्याप ही मदत न मिळाल्याने हे सरकार फक्त घोषणाबाज सरकार असल्याचा सूरही फेरीवाल्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.