शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

वीस दिवस उलटूनही फेरीवाल्यांना दमडीचीही मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST

दिरंगाई : शासनाकडून मदतीच्या निधीबाबत कुठलेही उत्तर आल्यामुळे विलंब जळगाव : गेल्या महिन्यात संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने ...

दिरंगाई : शासनाकडून मदतीच्या निधीबाबत कुठलेही उत्तर आल्यामुळे विलंब

जळगाव : गेल्या महिन्यात संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र, ही घोषणा होऊन १५ दिवस उलटूनही शहरातील फेरीवाल्यांना दीड हजार रुपये मिळालेले नाहीत. तर ही मदत वाटपाबाबत निधी मनपाने मंजूर करायचा की शासनाकडून थेट लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, याबाबत शासनाकडून कुठल्याही सूचना न आल्यामुळे निधी वाटपाला विलंब होत असल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली.

राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गेल्या महिन्यात १५ एप्रिल रोजी राज्य शासनाने राज्यभरात १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. तसेच या लॉकडाऊनची आता १५ मे पर्यंत मुदतवाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रकारच्या फेरीवाल्यांना लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्याने त्यांना शासनाकडून दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. या मदतीच्या घोषणेमुळे फेरीवाल्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पंधरा दिवस उलटूनही जळगाव शहरातील एकाही फेरीवाल्याला आर्थिक मदत करण्यात आली नसल्याचे मनपातर्फेच सांगण्यात आले. दुसरीकडे मदत न मिळाल्याने शहरातील फेरी वाल्यांकडून राज्य शासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

निधीच्या वाटपाबाबत मनपा प्रशासनात संभ्रम

राज्य शासनातर्फे फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर, त्याबाबत शासनातर्फे मनपा प्रशासनाला मदत देण्याबाबत पत्रही पाठविण्यात आले. मात्र, ही मदत देण्याबाबत लागणारा निधी मनपाने मंजूर करायचा, की थेट राज्य शासनातर्फे फेरीवाल्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार,याबाबत कुठलीही माहिती या पत्राद्वारे कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे मनपा प्रशासन या निधीच्या मंजुरीबाबत संभ्रमात आहे. त्यामुळे शहरातील फेरीवाले या मदतीपासून अद्यापही वंचित आहेत.

इन्फो :

फेरीवाल्यांना आर्थिक मदत करण्याबाबतची योजना ही शासनाची आहे. त्यानुसार शासनातर्फेच ही मदत दिली जाईल. शासनाकडून मदत आल्यावर ती फेरीवाल्यांना दिली जाईल.

सतीश कुलकर्णी, आयुक्त, जळगाव, मनपा

इन्फो :

फेरीवाल्यांमध्ये नाराजीचा सूर

शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतरही, फेरीवाल्यांना ही मदत अद्याप मिळाली नसल्याने त्यांच्यामधून या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाच्या सूचनेनुसार आम्ही दिलेल्या वेळेत व्यवसाय करून, नियमांचे पालन करीत आहोत. तरी देखील शासनाकडून अद्याप ही मदत न मिळाल्याने हे सरकार फक्त घोषणाबाज सरकार असल्याचा सूरही फेरीवाल्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.