शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

वीस दिवस उलटूनही फेरीवाल्यांना दमडीचीही मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST

दिरंगाई : शासनाकडून मदतीच्या निधीबाबत कुठलेही उत्तर आल्यामुळे विलंब जळगाव : गेल्या महिन्यात संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने ...

दिरंगाई : शासनाकडून मदतीच्या निधीबाबत कुठलेही उत्तर आल्यामुळे विलंब

जळगाव : गेल्या महिन्यात संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र, ही घोषणा होऊन १५ दिवस उलटूनही शहरातील फेरीवाल्यांना दीड हजार रुपये मिळालेले नाहीत. तर ही मदत वाटपाबाबत निधी मनपाने मंजूर करायचा की शासनाकडून थेट लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, याबाबत शासनाकडून कुठल्याही सूचना न आल्यामुळे निधी वाटपाला विलंब होत असल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली.

राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गेल्या महिन्यात १५ एप्रिल रोजी राज्य शासनाने राज्यभरात १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. तसेच या लॉकडाऊनची आता १५ मे पर्यंत मुदतवाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रकारच्या फेरीवाल्यांना लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्याने त्यांना शासनाकडून दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. या मदतीच्या घोषणेमुळे फेरीवाल्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पंधरा दिवस उलटूनही जळगाव शहरातील एकाही फेरीवाल्याला आर्थिक मदत करण्यात आली नसल्याचे मनपातर्फेच सांगण्यात आले. दुसरीकडे मदत न मिळाल्याने शहरातील फेरी वाल्यांकडून राज्य शासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

निधीच्या वाटपाबाबत मनपा प्रशासनात संभ्रम

राज्य शासनातर्फे फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर, त्याबाबत शासनातर्फे मनपा प्रशासनाला मदत देण्याबाबत पत्रही पाठविण्यात आले. मात्र, ही मदत देण्याबाबत लागणारा निधी मनपाने मंजूर करायचा, की थेट राज्य शासनातर्फे फेरीवाल्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार,याबाबत कुठलीही माहिती या पत्राद्वारे कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे मनपा प्रशासन या निधीच्या मंजुरीबाबत संभ्रमात आहे. त्यामुळे शहरातील फेरीवाले या मदतीपासून अद्यापही वंचित आहेत.

इन्फो :

फेरीवाल्यांना आर्थिक मदत करण्याबाबतची योजना ही शासनाची आहे. त्यानुसार शासनातर्फेच ही मदत दिली जाईल. शासनाकडून मदत आल्यावर ती फेरीवाल्यांना दिली जाईल.

सतीश कुलकर्णी, आयुक्त, जळगाव, मनपा

इन्फो :

फेरीवाल्यांमध्ये नाराजीचा सूर

शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतरही, फेरीवाल्यांना ही मदत अद्याप मिळाली नसल्याने त्यांच्यामधून या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाच्या सूचनेनुसार आम्ही दिलेल्या वेळेत व्यवसाय करून, नियमांचे पालन करीत आहोत. तरी देखील शासनाकडून अद्याप ही मदत न मिळाल्याने हे सरकार फक्त घोषणाबाज सरकार असल्याचा सूरही फेरीवाल्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.