शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

बाह्यसंस्थेमार्फत शिक्षकांचे मूल्यमापन सेवाशर्ती नियमावलीला छेद देणारे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तीस कोटी रुपये खर्च करून बाह्यसंस्थेकडून मूल्यमापन करण्याचा घाट शालेय शिक्षण विभागाकडून घातला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तीस कोटी रुपये खर्च करून बाह्यसंस्थेकडून मूल्यमापन करण्याचा घाट शालेय शिक्षण विभागाकडून घातला आहे. बाह्यसंस्थेच्या माध्यमातून मूल्यमापन करण्याचा शिक्षण विभागाचा हा निर्णय शासनाच्या सन १९७७, १९७८ आणि १९८१च्या सेवाशर्ती नियमावलीला छेद देणारा असल्याने शिक्षक संघटनांकडून विरोध केला जात आहे. शिक्षकांवर एकप्रकारे अविश्वास दाखविण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यातच परीक्षांचा गोंधळ सुरू आहे. त्यात आता भरीसभर म्हणून शिक्षकांच्या मूल्यमापनाचा प्रश्न समोर आला आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा किंवा चाचणीतील कामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याबाबतच्या हालचाली शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. आधी दरवर्षी शालेय तपासणीमधून शिक्षणाधिकारी किंवा विस्तार अधिकारी यांच्यामार्फत तसेच मुख्याध्यापकांद्वारा शिक्षकांचे मूल्यमापन होतच असते. तरीही बाह्यसंस्थेमार्फत विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन शिक्षकांचे मूल्यमापन करणे ही बाब सेवा-शर्ती नियमाला धरून नाही. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनांकडून देण्‍यात आला आहे.

========

-स्वतंत्र प्रणालीचे नियोजन...

शिक्षण विभागाने शिक्षकांच्या प्रशिक्षण आणि मूल्यांकनासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी निविदा मागविल्या आहेत. शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांची माहिती संकलित करणाऱ्या सरल प्रणालीतील माहितीशी ही नवी प्रणाली जोडण्यात येईल. विद्यार्थीसंख्या, विद्यार्थ्यांचे गुण यांची नोंद प्रणालीत होईल. त्यानुसार त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे कामाचे मूल्यमापन केले जाईल. त्यादृष्टीने प्रशिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचीही यंत्रणा असावी, अशी गरज निविदेत स्पष्ट करण्यात आली आहे. परंतु, शिक्षण विभागाच्या या धोरणाला विविध संघटनांकडून विरोध होत आहे.

========

शासनाने शिक्षकांचा पगार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी असून, यामुळे शिक्षणक्षेत्रात बाजारीकरण वाढण्याची भीती आहे. मुळातच विद्यार्थ्यांच्या गुणांना हेरून त्याला विविध उपक्रम, नावीन्यपूर्ण साहित्य वापरून चालना देण्याचे काम नि:स्वार्थीपणे शिक्षक करत आहेत. गरिबांची मुले शिकवावी हा शिक्षकांचा प्रामाणिक हेतू असतो. पण या हेतूवरच शासनाने शंका घेतली आहे. त्यामुळे हा अन्यायकारक आणि अवैध मार्गाला खतपाणी घालणारा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा.

- डॉ.विजय बागुल, अध्यक्ष, पदवीधर शिक्षक संघ

======

शिक्षकांचे वेतन हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार देण्याचा शासनाचा मानस या विषयावर सध्या समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. वर वर अतिशय आदर्श वाटणारा हा विषय मात्र मुळीच व्यवहार्य नाही. ज्या अधिकारी अथवा पदाधिकारी यांना ही कल्पना सुचली असेल सर्वप्रथम त्यांनी आपल्या स्वतःच्या विभागासाठी ‘कामाच्या गुणवत्तेनुसार वेतन’ याचा आग्रह शासनाकडे करून स्वतःच्या विभागासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवावा. त्या विभागातील यशापयश पाहूनच इतर विभागांना आणि शिक्षण विभागासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन व वेतन हा निकष शिक्षकांसाठी लागू करावा.

- संदीप पवार, जिल्हा कार्याध्यक्ष, शिक्षकसेना

======

त्रयस्त यंत्रणेमार्फत मूल्यमापन करून त्याआधारे शिक्षकांचे वेतन निश्चिती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या विचाराधीन असल्याची त्याबाबत निविदा मागविल्याची चर्चा आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने अशा पद्धतीचा अन्यायकारक निर्णय घेण्यात येणार असेल तर त्याला शिक्षक भारती संघटनेकडून विरोध करण्यात येईल. तसेच तो निर्णय महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी नियमावली १९७७, १९७८ आणि १९८१ मधील सेवाशर्ती, अधिनियम व तरतुदी यांचे उल्लंघन करणारी ठरेल. शिक्षकांवर दाखविण्यात येणारा अविश्वास आणि विद्यार्थ्यांवर गुणांचा दबाव वाढवून मानसिक दडपण वाढविणे हे चुकीचे आहे. त्यामुळे अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा.

- सोमनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती