शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

भूगोल विषयात विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी भूगोल परिषदेची स्थापना-प्रा.भरत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 14:34 IST

संडे स्पेशल मुलाखत

संजय पाटील

अमळनेर : मानवी जीवन भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे. भूगोल हे गतिमान शास्र आहे. असे असतानाही विद्यार्थी भूगोल विषयाला फारसे महत्व देत नाहीत. इंजिनियरिंगला जाणारे विद्यार्थी भूगोल विषय घेत नाहीत, तर वैद्यकीय क्षेत्रात जाणारे नावाला भूगोल विषयाचा अभ्यास करतात. त्यामुळे भूगोल विषयात विद्यार्थ्यांना आवड, रुची निर्माण व्हावी, त्यातील सखोल ज्ञान मिळण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. परिषदेचा उद्देश सर्वसामान्यांना कळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेची स्थापना केल्याचे कोषाध्यक्ष प्रा.भरत पाटील यांची ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

प्रश्न- तुम्ही स्वतः शिक्षण घेताना भूगोल विषय का निवडासा वाटला?

उत्तर- आधीपासूनच पर्यावरण, निसर्गाची आवड होती. निसर्गातील विविधतता आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी भूगोल विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

प्रश्न - कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषद स्थापन करण्याची गरज का भासली ?

उत्तर- वरिष्ठ महाविद्यालयीन परिषदेत कनिष्ठ प्राध्यापकांचा समावेश नव्हता आणि सर्वाधिक भूगोल शिकणारे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात आहेत. अकरावी, बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही शाखांत भूगोल विषय शिकवला जातो म्हणून भूगोलाचा प्रभाव मुलांवर पडण्यासाठी प्रा.सतीश शिर्के, प्रा.युवराज खुळे, प्रा.मनोज देशमुख व मी मिळून भूगोल परिषदेची स्थापना केली.

प्रश्न- भूगोल परिषदेच्या माध्यमातून कोणती कार्ये करण्यात येणार आहेत?

उत्तर- निसर्ग (पर्यावरण) हीच मोठी भूगोलाची प्रयोगशाळा आहे. युद्ध, व्यापार, शेती, उद्योग हे भौगोलिक अभ्यास करूनच विकसित केले जातात. त्यामुळे राष्ट्र सक्षम होण्यासाठी भूगोलाचे ज्ञान विद्यार्थी व युवकांमध्य रुजवण्यासाठी परिषदेमार्फत चर्चासत्रे, व्याख्याने, शोधनिबंध, सहली असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

प्रश्न- पूर्वीचा अभ्यासक्रम आणि आताचा अभ्यासक्रम यात काय बदल आहेत?

उत्तर- पूर्वी पारंपरिक पद्धतीने सर्वेक्षण अथवा भूगोलाचा अभ्यास केला जात होता आता जिओ ऍपद्वारे मोबाईलमधून शेतकरी कुटुंबाचा सर्वे, आर्थिक सर्वे केला जातो.

प्रश्न- भूगोलाची आवड निर्माण करण्यासाठी नव्याने काय बदल अपेक्षित आहेत?

उत्तर- विज्ञान विषयाप्रमाणे भूगोल विषयात प्रात्यक्षिक तासिका असाव्यात, दहावीपर्यंत भूगोल विषय १०० गुणांचा करणे, एच.एस.सी. परीक्षेत विज्ञान विषयाप्रमाणे ७०-३० पॅटर्न राबवण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार आहे.

टॅग्स :interviewमुलाखतAmalnerअमळनेर