शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भूगोल विषयात विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी भूगोल परिषदेची स्थापना-प्रा.भरत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 14:34 IST

संडे स्पेशल मुलाखत

संजय पाटील

अमळनेर : मानवी जीवन भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे. भूगोल हे गतिमान शास्र आहे. असे असतानाही विद्यार्थी भूगोल विषयाला फारसे महत्व देत नाहीत. इंजिनियरिंगला जाणारे विद्यार्थी भूगोल विषय घेत नाहीत, तर वैद्यकीय क्षेत्रात जाणारे नावाला भूगोल विषयाचा अभ्यास करतात. त्यामुळे भूगोल विषयात विद्यार्थ्यांना आवड, रुची निर्माण व्हावी, त्यातील सखोल ज्ञान मिळण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. परिषदेचा उद्देश सर्वसामान्यांना कळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेची स्थापना केल्याचे कोषाध्यक्ष प्रा.भरत पाटील यांची ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

प्रश्न- तुम्ही स्वतः शिक्षण घेताना भूगोल विषय का निवडासा वाटला?

उत्तर- आधीपासूनच पर्यावरण, निसर्गाची आवड होती. निसर्गातील विविधतता आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी भूगोल विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

प्रश्न - कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषद स्थापन करण्याची गरज का भासली ?

उत्तर- वरिष्ठ महाविद्यालयीन परिषदेत कनिष्ठ प्राध्यापकांचा समावेश नव्हता आणि सर्वाधिक भूगोल शिकणारे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात आहेत. अकरावी, बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही शाखांत भूगोल विषय शिकवला जातो म्हणून भूगोलाचा प्रभाव मुलांवर पडण्यासाठी प्रा.सतीश शिर्के, प्रा.युवराज खुळे, प्रा.मनोज देशमुख व मी मिळून भूगोल परिषदेची स्थापना केली.

प्रश्न- भूगोल परिषदेच्या माध्यमातून कोणती कार्ये करण्यात येणार आहेत?

उत्तर- निसर्ग (पर्यावरण) हीच मोठी भूगोलाची प्रयोगशाळा आहे. युद्ध, व्यापार, शेती, उद्योग हे भौगोलिक अभ्यास करूनच विकसित केले जातात. त्यामुळे राष्ट्र सक्षम होण्यासाठी भूगोलाचे ज्ञान विद्यार्थी व युवकांमध्य रुजवण्यासाठी परिषदेमार्फत चर्चासत्रे, व्याख्याने, शोधनिबंध, सहली असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

प्रश्न- पूर्वीचा अभ्यासक्रम आणि आताचा अभ्यासक्रम यात काय बदल आहेत?

उत्तर- पूर्वी पारंपरिक पद्धतीने सर्वेक्षण अथवा भूगोलाचा अभ्यास केला जात होता आता जिओ ऍपद्वारे मोबाईलमधून शेतकरी कुटुंबाचा सर्वे, आर्थिक सर्वे केला जातो.

प्रश्न- भूगोलाची आवड निर्माण करण्यासाठी नव्याने काय बदल अपेक्षित आहेत?

उत्तर- विज्ञान विषयाप्रमाणे भूगोल विषयात प्रात्यक्षिक तासिका असाव्यात, दहावीपर्यंत भूगोल विषय १०० गुणांचा करणे, एच.एस.सी. परीक्षेत विज्ञान विषयाप्रमाणे ७०-३० पॅटर्न राबवण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार आहे.

टॅग्स :interviewमुलाखतAmalnerअमळनेर