शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

भूगोल विषयात विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी भूगोल परिषदेची स्थापना-प्रा.भरत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 14:34 IST

संडे स्पेशल मुलाखत

संजय पाटील

अमळनेर : मानवी जीवन भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे. भूगोल हे गतिमान शास्र आहे. असे असतानाही विद्यार्थी भूगोल विषयाला फारसे महत्व देत नाहीत. इंजिनियरिंगला जाणारे विद्यार्थी भूगोल विषय घेत नाहीत, तर वैद्यकीय क्षेत्रात जाणारे नावाला भूगोल विषयाचा अभ्यास करतात. त्यामुळे भूगोल विषयात विद्यार्थ्यांना आवड, रुची निर्माण व्हावी, त्यातील सखोल ज्ञान मिळण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. परिषदेचा उद्देश सर्वसामान्यांना कळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेची स्थापना केल्याचे कोषाध्यक्ष प्रा.भरत पाटील यांची ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

प्रश्न- तुम्ही स्वतः शिक्षण घेताना भूगोल विषय का निवडासा वाटला?

उत्तर- आधीपासूनच पर्यावरण, निसर्गाची आवड होती. निसर्गातील विविधतता आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी भूगोल विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

प्रश्न - कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषद स्थापन करण्याची गरज का भासली ?

उत्तर- वरिष्ठ महाविद्यालयीन परिषदेत कनिष्ठ प्राध्यापकांचा समावेश नव्हता आणि सर्वाधिक भूगोल शिकणारे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात आहेत. अकरावी, बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही शाखांत भूगोल विषय शिकवला जातो म्हणून भूगोलाचा प्रभाव मुलांवर पडण्यासाठी प्रा.सतीश शिर्के, प्रा.युवराज खुळे, प्रा.मनोज देशमुख व मी मिळून भूगोल परिषदेची स्थापना केली.

प्रश्न- भूगोल परिषदेच्या माध्यमातून कोणती कार्ये करण्यात येणार आहेत?

उत्तर- निसर्ग (पर्यावरण) हीच मोठी भूगोलाची प्रयोगशाळा आहे. युद्ध, व्यापार, शेती, उद्योग हे भौगोलिक अभ्यास करूनच विकसित केले जातात. त्यामुळे राष्ट्र सक्षम होण्यासाठी भूगोलाचे ज्ञान विद्यार्थी व युवकांमध्य रुजवण्यासाठी परिषदेमार्फत चर्चासत्रे, व्याख्याने, शोधनिबंध, सहली असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

प्रश्न- पूर्वीचा अभ्यासक्रम आणि आताचा अभ्यासक्रम यात काय बदल आहेत?

उत्तर- पूर्वी पारंपरिक पद्धतीने सर्वेक्षण अथवा भूगोलाचा अभ्यास केला जात होता आता जिओ ऍपद्वारे मोबाईलमधून शेतकरी कुटुंबाचा सर्वे, आर्थिक सर्वे केला जातो.

प्रश्न- भूगोलाची आवड निर्माण करण्यासाठी नव्याने काय बदल अपेक्षित आहेत?

उत्तर- विज्ञान विषयाप्रमाणे भूगोल विषयात प्रात्यक्षिक तासिका असाव्यात, दहावीपर्यंत भूगोल विषय १०० गुणांचा करणे, एच.एस.सी. परीक्षेत विज्ञान विषयाप्रमाणे ७०-३० पॅटर्न राबवण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार आहे.

टॅग्स :interviewमुलाखतAmalnerअमळनेर