शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

महामारीत लाखो लोकांचे पोट भरले, अनुदानासाठी अनेक वेळा करावी लागते प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST

स्टार ८५९ जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंध काळात अनेकांच्या हाताला काम नसल्याने ते उपाशी राहू नये, यासाठी मोफत ...

स्टार ८५९

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंध काळात अनेकांच्या हाताला काम नसल्याने ते उपाशी राहू नये, यासाठी मोफत शिवभोजन थाळीचे वितरण केले जात असून आतापर्यंत जिल्ह्यात तीन लाख २८ हजार थाळींचा गरजूंना आधार मिळाला आहे. यामध्ये गरजूंचे पोट भरले गेले, मात्र राज्यस्तरावरून अनुदान येण्यास विलंब झाल्यास केंद्रचालकांना अनुदानासाठी अनेक वेळा प्रतीक्षा करावी लागत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील थाळींची संख्या कमी न होता ती कायम असून मोफत शिवभोजन थाळी १५ जुलैपर्यंत मोफत देण्यास मुदतवाढ मिळाली आहे.

जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० रोजी या योजनेचा शुभारंभ झाला. सुरुवातीस जिल्ह्यासाठी ७०० थाळ्यांचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये हा इष्टांक दुप्पट म्हणजेच १४०० थाळी करण्यात आला. त्यानंतर तालुका स्तरावर शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात येऊन जिल्ह्याचा इष्टांक ३ हजार ५०० थाळींपर्यंत वाढविण्यात आला होता. त्यानंतर त्यात पुन्हा दीडपट वाढ करण्यात आली.

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली व कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ एप्रिलपासून विशेष निर्बंध लागू करण्यात आले. या काळात कोणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, याकरिता शिवभोजन थाळी मोफत दिली जात असून जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून दररोज पाच हजार १२५ थाळींचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तीन लाख २८ हजार लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतला.

३८ शिवभोजन केंद्रांवरून दररोज वितरण

जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण ३८ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी शहरी भागात १६ व ग्रामीण भागात २२ केंद्र आहेत. या केंद्रांवर दररोज गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ दिला जात आहे.

प्रति थाळी ४० रुपये अनुदान

शिवभोजन योजना राबवित असताना केंद्र चालकांना सरकारतर्फे अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी १० रुपये प्रति थाळीचे दर पाच रुपयांवर आणले होते. त्यानंतर कोरोना काळात ही थाळी पूर्णपणे मोफत दिली जात आहे. यासाठी केंद्र चालकांना प्रति थाळी ४० रुपये अनुदान दिले जाते.

अनुदानास विलंब झाला तरी थाळींची संख्या कायम

केंद्र चालकांना दिले जाणारे अनुदान काही वेळा राज्यपातळीवरूनच उशिरा येते. त्यामुळे कधी-कधी केंद्र चालकांना ते मिळण्यास प्रतीक्षा करावी लागते. जिल्ह्यातील केंद्रांना अनुदान मिळण्यास विलंब झाला तरी तो १५ दिवस ते एक महिन्यापेक्षा जास्त नसल्याची माहिती देण्यात आली. विलंब झाला तरी जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांची संख्या कायम आहे. शहरी भागात १६ केंद्रामधून १ हजार २५० थाळ्या तसेच ग्रामीण भागात २२ केंद्रामधून २ हजार १७५ थाळ्या वितरीत करण्यात येतात.

—————————

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विशेष निर्बंध लागू असल्याने शासनाने शिवभोजन केंद्रांचा इष्टांक दीडपटीने वाढवून दिला. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३८ शिवभोजन केंद्रांवरून थाळीचा लाभ दिला जात आहे. यासाठीचे अनुदान सहसा थांबत नाही. काही कारणास्तव अनुदान थांबले तरी ते १५ दिवस ते एक महिन्यापेक्षा जास्त वेळ थांबत नाही.

- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी.

दररोज शिवभोजन थाळीचे वितरण सुरू आहे. यामध्ये १५ दिवसांचे बिल सादर केल्यानंतर अनुदान मिळते. कधी-कधी विलंब झाला तर १५ दिवसांचे अथवा एक महिन्याचे अनुदान थांबते.

- एक शिवभोजन केंद्र चालक.

जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र - ३८

आता किती जणांनी घेतला लाभ - ३,२८,०००