शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महामारीत लाखो लोकांचे पोट भरले, अनुदानासाठी अनेक वेळा करावी लागते प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST

स्टार ८५९ जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंध काळात अनेकांच्या हाताला काम नसल्याने ते उपाशी राहू नये, यासाठी मोफत ...

स्टार ८५९

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंध काळात अनेकांच्या हाताला काम नसल्याने ते उपाशी राहू नये, यासाठी मोफत शिवभोजन थाळीचे वितरण केले जात असून आतापर्यंत जिल्ह्यात तीन लाख २८ हजार थाळींचा गरजूंना आधार मिळाला आहे. यामध्ये गरजूंचे पोट भरले गेले, मात्र राज्यस्तरावरून अनुदान येण्यास विलंब झाल्यास केंद्रचालकांना अनुदानासाठी अनेक वेळा प्रतीक्षा करावी लागत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील थाळींची संख्या कमी न होता ती कायम असून मोफत शिवभोजन थाळी १५ जुलैपर्यंत मोफत देण्यास मुदतवाढ मिळाली आहे.

जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० रोजी या योजनेचा शुभारंभ झाला. सुरुवातीस जिल्ह्यासाठी ७०० थाळ्यांचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये हा इष्टांक दुप्पट म्हणजेच १४०० थाळी करण्यात आला. त्यानंतर तालुका स्तरावर शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात येऊन जिल्ह्याचा इष्टांक ३ हजार ५०० थाळींपर्यंत वाढविण्यात आला होता. त्यानंतर त्यात पुन्हा दीडपट वाढ करण्यात आली.

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली व कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ एप्रिलपासून विशेष निर्बंध लागू करण्यात आले. या काळात कोणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, याकरिता शिवभोजन थाळी मोफत दिली जात असून जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून दररोज पाच हजार १२५ थाळींचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तीन लाख २८ हजार लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतला.

३८ शिवभोजन केंद्रांवरून दररोज वितरण

जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण ३८ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी शहरी भागात १६ व ग्रामीण भागात २२ केंद्र आहेत. या केंद्रांवर दररोज गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ दिला जात आहे.

प्रति थाळी ४० रुपये अनुदान

शिवभोजन योजना राबवित असताना केंद्र चालकांना सरकारतर्फे अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी १० रुपये प्रति थाळीचे दर पाच रुपयांवर आणले होते. त्यानंतर कोरोना काळात ही थाळी पूर्णपणे मोफत दिली जात आहे. यासाठी केंद्र चालकांना प्रति थाळी ४० रुपये अनुदान दिले जाते.

अनुदानास विलंब झाला तरी थाळींची संख्या कायम

केंद्र चालकांना दिले जाणारे अनुदान काही वेळा राज्यपातळीवरूनच उशिरा येते. त्यामुळे कधी-कधी केंद्र चालकांना ते मिळण्यास प्रतीक्षा करावी लागते. जिल्ह्यातील केंद्रांना अनुदान मिळण्यास विलंब झाला तरी तो १५ दिवस ते एक महिन्यापेक्षा जास्त नसल्याची माहिती देण्यात आली. विलंब झाला तरी जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांची संख्या कायम आहे. शहरी भागात १६ केंद्रामधून १ हजार २५० थाळ्या तसेच ग्रामीण भागात २२ केंद्रामधून २ हजार १७५ थाळ्या वितरीत करण्यात येतात.

—————————

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विशेष निर्बंध लागू असल्याने शासनाने शिवभोजन केंद्रांचा इष्टांक दीडपटीने वाढवून दिला. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३८ शिवभोजन केंद्रांवरून थाळीचा लाभ दिला जात आहे. यासाठीचे अनुदान सहसा थांबत नाही. काही कारणास्तव अनुदान थांबले तरी ते १५ दिवस ते एक महिन्यापेक्षा जास्त वेळ थांबत नाही.

- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी.

दररोज शिवभोजन थाळीचे वितरण सुरू आहे. यामध्ये १५ दिवसांचे बिल सादर केल्यानंतर अनुदान मिळते. कधी-कधी विलंब झाला तर १५ दिवसांचे अथवा एक महिन्याचे अनुदान थांबते.

- एक शिवभोजन केंद्र चालक.

जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र - ३८

आता किती जणांनी घेतला लाभ - ३,२८,०००