शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

उद्योजकांचा विचार की केवळ निवडणुकांवर लक्ष?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केलेल्या घोषणा म्हणजे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोकळ आश्वासने आहे, असा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केलेल्या घोषणा म्हणजे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोकळ आश्वासने आहे, असा आरोप विविध मुद्यांवरून केला जात आहे. याची प्रचिती जळगावच्या बाबतीतही येत असून येथील आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे विरोधकांकडून व उद्योजकांकडूनही सांगितले जात आहे. यात भुसावळचा कंटेनर डेपो बंद करण्यासह रेल्वे इंजिन कारखाना, उत्तर भारताशी व्यापारवाढीसाठी सोयीचा ठरणाऱ्या भुसावळ-भोपाळ तिसऱ्या रेल्वे मार्गाकडे होणारे दुर्लक्ष ही मोठी उदाहरणे असून आता भुसावळ-खरगपूर कॉरिडॉरची घोषणा हेदेखील पोकळ आश्वासन असल्याचा आरोपही केला जात आहे.

भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळाचे आगार (डेपो) बंद झाल्याने याचा उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. या निर्णयानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात काही सकारात्मक घोषणा होतील, अशी अपेक्षा उद्योजकांना होती. मात्र आयात-निर्यातीसाठी पूरक ठरतील, अशी घोषणा जिल्ह्यासाठी तरी नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

कॉरिडॉर स्वप्न ठरू नये

अर्थसंकल्पात भुसावळ-खरगपूर काॅरिडॉरची घोषणा झाली असली तरी यामुळे केवळ देशांतर्गत व्यापाराला लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. यातही हा कॉरिडॉर कधी साकारला जाईल व त्याचा उपयोग कधी होईल, या विषयीदेखील साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण ज्या भागाशी खान्देशला जोडण्याची घोषणा झाली आहे, त्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने त्या डोळ्यासमोर ठेवूनच हे गाजर दाखविले गेले असावे, असे सांगितले जात आहे. हा कॉरिडॉर प्रत्यक्षात साकारला जावा, ते केवळ स्वप्न ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

व्यापारवाढीकडे दुर्लक्ष, पश्चिम मार्गाला झुकते माप

भुसावळात असलेला रेल्वे इंजिनचा कारखाना स्थलांतरित होण्यापाठोपाठ कंटेनर डेपो बंद झाला तरी या विषयी जिल्ह्यातील राजकीय मंडळींकडून हवा तसा पाठपुरावा होऊ शकला नाही व हे दोन्ही प्रकल्प जिल्ह्यातून गेले. या सोबतच जळगावातील केळी असो अथवा इतर औद्योगिक उत्पादनांची मोठी वाहतूक असलेल्या उत्तर भारताकडील रेल्वे मार्गाकडे कानाडोळा होत आहे. यात भुसावळ ते भोपाळ तिसरा रेल्वे मार्ग झाल्यास दिल्ली केवळ १२ तासात गाठता येईल व हे प्रवाशांसह उद्योग, व्यापार वाढीसाठी सोयीचे ठरणारे आहे. मात्र हा मार्ग झाल्यास पश्चिम रेल्वे मार्गाचे महत्त्व कमी होईल व गुजरात मार्गावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने या कडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणकारांनी सांगितले. इतकेच नव्हे भुसावळ येथे प्रस्तावित असलेला रेल्वेचा कारखानाही देण्यास सरकारकडून टाळाटाळ होत आहे, असा आरोप होत आहे. या सर्व घडामोडी पाहता भुसावळ-खरगपूर कॉरिडॉर केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार असल्याने येथील जनतेसाठी केवळ हा देखावा असल्याचाही आरोप केला जात आहे.

—————-

भुसावळ-खरगपूर कॉरिडॉर हे केवळ पोकळ आश्वासन आहे. भुसावळातील इंजिन कारखाना, कंटेनर डेपो येथून गेले. भुसावळ-भोपाळ तिसऱ्या रेल्वेमार्गाकडे दुर्लक्ष व रेल्वे कारखान्यासाठी काही हालचाली नसताना पश्चिम बंगालमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार केवळ दिशाभूल करीत आहे.

- डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार.

भारतीय कंटेनर महामंडळाचा डेपो भुसावळातच राहावा, यासाठी आपण प्रयत्न केले. मात्र आता त्याला भुसावळ-खरगपूर कॉरिडॉरमुळे पर्यायी व्यवस्था होणार असल्याने ती सोयीची होईल. ती व्यवस्था झाली नसती तर आपण आणखी कठोर भूमिका घेतली असती.

- उन्मेष पाटील, खासदार.

भुसावळातील कंटेनर महामंडळाचा डेपो बंद झाल्याने त्याचा आयात-निर्यातीवर मोठी परिणाम होत आहे. आता भुसावळ-खरगपूर कॉरिडॉर होणार आहे, त्याचे स्वागत आहे. मात्र यामुळे केवळ देशांतर्गत व्यापार वाढ होऊ शकते.

- रवींद्र लढ्ढा, अध्यक्ष, जळगाव पाईप मॅन्युफॅक्चर इंडस्ट्री असोसिएशन.