शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ सुरू होणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

जळगाव : दोन महिन्यानंतर बाजारपेठ पुन्हा एकदा सुरू होणार असल्याने व्यापारीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ...

जळगाव : दोन महिन्यानंतर बाजारपेठ पुन्हा एकदा सुरू होणार असल्याने व्यापारीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतलेल्या या निर्णयाचे व्यापारी संघटनांनी स्वागत केले आहे.

गेल्या दोन महिन्यापासून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद असल्याने व्यापारनगरी असलेल्या जळगावातील करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. यामध्ये व्यापारीवर्गासह त्यांच्याकडे कामाला असलेल्या कर्मचारी, कामगारांचे मोठे हाल होत होते. इतकेच नव्हे तर अर्थचक्र थांबल्याने सर्वच घडी विस्कटली होती. मात्र आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यातील व्यापार पुन्हा सुरू होणार असल्याच्या आदेशामुळे व्यापारीवर्ग उत्साहित झाला आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकानांना परवानगी मिळावी, यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कॅट, फाम, जिल्हा व्यापारी महामंडळ यासह इतरही व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

नियमांचे पालन महत्त्वाचे

पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना आपली दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र व्यापार करीत असताना शासन, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वच व्यापारी, व्यावसायिकांनी व ग्राहकांनी देखील पालन करावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बारिया, उपाध्यक्ष युसूफ मकरा, अनिल कांकरिया, कॅट संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा यांनी केले आहे.