शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

२०२०-२०२१ वर्षापूर्वी प्रवेशित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्न व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जागेवरील प्रवेश फेरी अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्न व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जागेवरील प्रवेश फेरी अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. मात्र, शासनाने सदर निर्णयात दुरुस्ती करत सन २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षापूर्वी प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा शासन निर्णय घेतला आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जागेवरील प्रवेश फेरी अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला होता. यासंदर्भात अभाविपच्या वतीने सातत्याने शासनाकडे शिष्यवृत्ती सुरू करण्यासंदर्भात निवेदने, आंदोलनांच्या माध्यमातून मागणी केली जात होती. याची दखल घेत शासनाने सदर निर्णयात दुरुस्ती करत सन २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षापूर्वी प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अभाविप महाराष्ट्र स्वागत करते; परंतु या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू नाही. त्यामुळे सध्याच्या व आगामी काळामध्ये कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शासन शैक्षणिक नुकसान करत आहे. त्यामुळे शासनाने निर्णयात फेरबदल करत कायमस्वरूपी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातचा निर्णय घ्यावा, अशी मागणी, अभाविप प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी केली आहे.

काय म्हटले आहे शासन निर्णयात...

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पूर्वी चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी संपल्यानंतर रिक्त जागांवरील प्रवेश फेरीद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांची पदवी पूर्ण होईपर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, सदर लाभ हा सन २०२०-२१ पासून लागू राहणार नाही, असेही शासनाच्या निर्णयात म्हटले आहे.