शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अखेर केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली वादळात झालेल्या नुकसानाची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

२० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८० कोटी जमा : मार्चमध्ये आलेल्या वादळात झाले होते नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - ...

२० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८० कोटी जमा : मार्चमध्ये आलेल्या वादळात झाले होते नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत वादळात नुकसान झाल्यामुळे जिल्हाभरातील सुमारे २० हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ८० कोटींची रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम डिसेंबर महिन्यापर्यंत मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य शासनाने आपल्या हिश्श्यातील हप्ता न भरल्यामुळे ही रक्कम मिळण्यास उशीर झाला होता. मात्र, दिनांक २ व ३ फेब्रुवारी रोजी ही रक्कम शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाली आहे. यंदा हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल ३५५ कोटींची रक्कम मिळाली आहे.

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात तापमानामुळे नुकसान झाल्याने सुमारे २७५ कोटींची रक्कम ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांना प्राप्त झाली होती. मात्र, मार्च २०२०मध्ये आलेल्या वादळी पावसात व जून महिन्यात निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नव्हती. अखेर वर्षभरानंतर का होईना, ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांना ८० कोटींची नुकसानभरपाई मिळाली आहे.

आतापर्यंत मिळालेली सर्वोच्च रक्कम

जिल्ह्यातील ४२ हजार ५०० शेतकऱ्यांनी यंदा हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. त्यात शेतकऱ्यांनी मिळून ३६ कोटींचा हप्ता भरला होता. यामध्ये केंद्र व राज्य शासनाने देखील आपला हिस्सा टाकला होता. ऑक्टोबर महिन्यात तापमानामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना २७५ कोटींची रक्कम मिळाली होती. तर आता वादळामुळे झालेल्या नुकसानभरपाईची ८० कोटींची रक्कम मिळाली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना एकूण ३५५ कोटींची मदत मिळाली असून, केळी पीक विम्यांतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली आतापर्यंतची ही सर्वोच्च रक्कम आहे.

पुढीलवर्षी नुकसानभरपाईची रक्कम मिळणेही कठीण

यंदा जरी शेतकऱ्यांना सर्वात जास्त रक्कम मिळाली असली, तरी पुढील वर्षी फळपीक विम्याच्या बदललेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे कठीण आहे. तापमानाची मर्यादा ही १५ दिवसांपर्यंत करण्यात आली आहे तर वादळाबाबतदेखील निकषात बदल करण्यात आले आहेत. यामुळे यंदा फळपीक विम्यासाठी केवळ २० हजार शेतकऱ्यांनीच अर्ज केला होता. यंदाचे निकष अधिक जाचक असल्याने केळीचे नुकसान झाले तरीही नुकसानभरपाईची रक्कम मिळणे कठीणच आहे. त्यामुळे शासनाने पुढीलवर्षी तरी हे निकष बदलावेत, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधी डॉ. सत्वशील जाधव यांनी केली आहे.