शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली वादळात झालेल्या नुकसानाची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

२० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८० कोटी जमा : मार्चमध्ये आलेल्या वादळात झाले होते नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - ...

२० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८० कोटी जमा : मार्चमध्ये आलेल्या वादळात झाले होते नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत वादळात नुकसान झाल्यामुळे जिल्हाभरातील सुमारे २० हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ८० कोटींची रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम डिसेंबर महिन्यापर्यंत मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य शासनाने आपल्या हिश्श्यातील हप्ता न भरल्यामुळे ही रक्कम मिळण्यास उशीर झाला होता. मात्र, दिनांक २ व ३ फेब्रुवारी रोजी ही रक्कम शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाली आहे. यंदा हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल ३५५ कोटींची रक्कम मिळाली आहे.

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात तापमानामुळे नुकसान झाल्याने सुमारे २७५ कोटींची रक्कम ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांना प्राप्त झाली होती. मात्र, मार्च २०२०मध्ये आलेल्या वादळी पावसात व जून महिन्यात निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नव्हती. अखेर वर्षभरानंतर का होईना, ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांना ८० कोटींची नुकसानभरपाई मिळाली आहे.

आतापर्यंत मिळालेली सर्वोच्च रक्कम

जिल्ह्यातील ४२ हजार ५०० शेतकऱ्यांनी यंदा हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. त्यात शेतकऱ्यांनी मिळून ३६ कोटींचा हप्ता भरला होता. यामध्ये केंद्र व राज्य शासनाने देखील आपला हिस्सा टाकला होता. ऑक्टोबर महिन्यात तापमानामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना २७५ कोटींची रक्कम मिळाली होती. तर आता वादळामुळे झालेल्या नुकसानभरपाईची ८० कोटींची रक्कम मिळाली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना एकूण ३५५ कोटींची मदत मिळाली असून, केळी पीक विम्यांतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली आतापर्यंतची ही सर्वोच्च रक्कम आहे.

पुढीलवर्षी नुकसानभरपाईची रक्कम मिळणेही कठीण

यंदा जरी शेतकऱ्यांना सर्वात जास्त रक्कम मिळाली असली, तरी पुढील वर्षी फळपीक विम्याच्या बदललेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे कठीण आहे. तापमानाची मर्यादा ही १५ दिवसांपर्यंत करण्यात आली आहे तर वादळाबाबतदेखील निकषात बदल करण्यात आले आहेत. यामुळे यंदा फळपीक विम्यासाठी केवळ २० हजार शेतकऱ्यांनीच अर्ज केला होता. यंदाचे निकष अधिक जाचक असल्याने केळीचे नुकसान झाले तरीही नुकसानभरपाईची रक्कम मिळणे कठीणच आहे. त्यामुळे शासनाने पुढीलवर्षी तरी हे निकष बदलावेत, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधी डॉ. सत्वशील जाधव यांनी केली आहे.