शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना रोजगार, शेतकऱ्यांचा झाला हलका भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST

या मजुरांमध्ये युवकांचा सहभाग अधिक असून सध्या जळगाव जिल्ह्यात बागायती पिकांना पाणी भरणे, बैलांच्या सहाय्याने औत हाकणे, फवारणीसाठी, ...

या मजुरांमध्ये युवकांचा सहभाग अधिक असून सध्या जळगाव जिल्ह्यात बागायती पिकांना पाणी भरणे, बैलांच्या सहाय्याने औत हाकणे, फवारणीसाठी, खते टाकण्यासाठी, सरी ओढण्यासाठी, ऊस लागवडीसाठी सर्वच कामे ही मंडळी करीत असतात तर काही हंगामी मजूर ही जागेवर येऊन शेतकरी या मजुरांना शेतातील कामांसाठी घेऊन जात आहेत. शेतीतील कामे करणे हा एकमेव रोजगार या आदिवासी बांधवांना मिळतो. आदिवासी बांधव ट्रॅक्टर चालवण्यापासून शेतातली मिळेल ती कामे आणि गाई-म्हशींचे दूध काढणे यासह सर्वच कामे करत असतात.

बहुतांश मजूर हे पूर्वी स्थायिक झालेल्या आदिवासींकडे येऊन राहतात आणि मजुरी काम करून उदरनिर्वाह करत आहेत. सध्या आदिवासी भागात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने सर्व आदिवासी हे गाव आणि शहराकडे वळलेले दिसून येतात.

हजारो आदिवासी कुटुंबांचे गैर आदिवासी गावात बस्तान

दरवर्षी उशिरा होणाऱ्या आदिवासी मजुरांचे रोजगारासाठीचे स्थलांतर यंदा एप्रिल आणि मे महिन्यात सुरू झाले आहे. या स्थलांतरित आदिवासी भागातील मजुरांना एकमेव शेती व्यवसायामुळे रोजगार मिळत असतो.

सालदार म्हणून आहेत आदिवासीच

दरम्यान, तालुक्यातील उत्तरेस असलेल्या अनर नदीकाठावरील महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील गावे, पाडे येथून आदिवासी बांधव शहर आणि गावाकडे आले आहेत. गावांमध्ये शेती व्यवसायासाठी संपूर्ण कामे हे सध्या आदिवासी तरुण, युवक आणि महिला यांच्यामुळेच आवरला जात आहे. सध्या गावातील खूप कमी प्रमाणात युवक आता सालदार (घरगडी) म्हणून काम करतात. त्यांची उणीव या आदिवासी तरुण, युवक यांनी भरून काढली आहे. सध्या शेतकरी मजुरांच्या तुटवडा आणि चणचणअभावी शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. मात्र हा शेती व्यवसाय केवळ आदिवासी बांधवांच्या येण्यामुळे शक्य झालं आहे.

रोजंदारीवरही महिला मजूर

चोपडा तालुक्यातील मोठ्या गावांच्या चौकात दररोज शिरपूर तालुक्यातून रोहिणी भुईटेक, महादेव दोंदवाडे, हिगाव, खामखेडे, धावडी विहीर, जामाण्या पाडा, कालापणी, चिलारे, जोयदा, तर मध्य प्रदेशमधून धवली, देवी दुगानी, वलवाडी आणि चोपडा तालुक्यातील खाऱ्यापाडा, बोरमळी, देव्हारी, देवगिरी, कर्जाने, मेलाने, वैजापूर, उमर्टी, कुंड्यापाणी, मालापुर, मोरचिडा, मुळ्यावतार या गावातून त्यांच्या वाहनातून महिला, तरुण व युवक आदिवासी मजुरांचे टोळके त्यांना जागेवर येऊन शेतकरी कामाचा रोजगार ठरवतात. स्वतःच्या वाहनाने शेतवस्तीवर निवासी ठेवून त्यांच्याकडून शेतीची दैनंदिन कामे करून घेतली जातात. यामध्ये बहुतेक मजुरांचे गटाचे प्रमुख त्यांचे रोजगार ठरवतो तर काही मजूरच कामाच्या नुसार आपला रोजगार ठरवतात. या आदिवासी मजुरांमध्ये बहुतेक शाळकरी मुले व युवक आणि महिला असतात. सोबत लाकूडफाटा किंवा गॅस सिलेंडर, किराणा, धान्य, पोटापाण्याचे साहित्य, अंथरूण, पांघरूण, कपडे घेऊन ही मंडळी रोजगारासाठी आपले गाव सोडून कामाला शहर किंवा मोठ्या गावात शेत वस्तीवर चार ते सहा महिने येत असतात.

280721\28jal_14_28072021_12.jpg

चहार्डी, (ता. चोपडा) येथे वेले रस्त्यालगत झोपड्या करून शेकडो आदिवासी बांधवांच्या जोरावर शेतीव्यवसाय सुरू आहे.