शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पारोळा तालुक्यातील महिलांना रोजगार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 20:33 IST

माय ओपिनियन-

पारोळा नगरीची ओळख झाशीच्या राणीचे माहेरघर अशी आहे़ येथे सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदताना दिसतो़ पूर्वीच्या काळी या भागात पाण्याचा गंभीर प्रश्न होता़ दुष्काळी स्थितीमुळे या भागातील महिलांचे जीवन सुकर नव्हते. पण ही समस्या जाणून येथील लोकनेतृत्वाने ती सोडविली. तसेच तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून घेऊन येथील महिला कौशल्याचा ठसा उमटवीत आहेत.तत्कालीन आमदार भास्करराव राजाराम पाटील यांच्या दूरदृष्टीने व अथक प्रयत्नाने बोरी धरणाची निर्मिती झाली व पाण्याचा प्रश्न सुटला़ तसेच त्यांच्या शैक्षणिक सुधारणेच्या दृष्टीकोनातून किसान कॉलेजची निर्मिती झाली आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली़ त्यानंतर तंत्रशिक्षण महाविद्यालयाची निर्मिती झाल्याने महिलांसाठी रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध झाली आहे. पूर्वी पारोळयात बरेच हातमाग होते़ त्यामुळे खादी कपडे तयार करण्याचा रोजगार महिलांकडे होता. मात्र पुढे लघुउद्योकांना खीळ बसल्याने तो लोप पावला. तरीही येथील महिलांची कष्टाळू वृत्ती आजही कायम आहे. शेवया, पापड, कुरडया, लोणची आदी पदार्थ बनवून विक्री करण्याकडे कल वाढत गेला. त्यातून आज बचतगटामार्फत महिला उद्योजक तयार होत आहेत़ पूर्वीच्या अनिष्ट चालीरीतींना फाटा देत आजा महिला-मुली शिक्षणामुळे समाजविकासात हातभार लावताना दिसतात. भौतिक सुधारणा होऊन तसेच राहणीमान सुधारून महिला सर्व बाबतींत सुधारल्या असे म्हणता येणार नाही. खरी गरज ती वैचारिक सुधारणेची़ त्यासाठी ग्रमीण भागातील प्रत्येक मुलगी उच्चशिक्षित व्हावी, सुसंस्कृत व्हावी यासाठी पालकांनी जागृत होणे गरजेचे आहे.

-प्रा़ शुभांगी एन.मोहरीर,पारोळा